Tag: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

    मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

    News34 chandrapur

    नागपूर :- दोन वर्ष उलटून सुद्धा वर्ष २०२१-२०२२ मधील मुंबई पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील हजारो उमेदवार नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलन पुकारले असता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना पोलीस सेवेत भरती करण्याची मागणी सभागृहा समक्ष लावून धरली.

     

    मुंबई पोलीस भरतीमधील निवड यादीतील हजारो उमेदवार हे नागपूर अधिवेशनावर आंदोलनाला बसले असून यात अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला.

     

    गृह विभागात भरपूर प्रमाणात रिक्त पदे असतांना सुद्धा पोलीस भरती होत नसल्याने पोलीस विभागावर कामाचा ताण येत आहे. मुंबई पोलीस दलात तब्बल २६ हजार पर्यंत शिपाई पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलीस विभागाने १० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता , मात्र ७०७६ पदांची भरती राबविली म्हणजे ७० टक्के पदांची भरती प्रक्रिया राबविली गेली . हि भरती प्रक्रिया १०० टक्के नसून त्यामध्ये अजूनही ३ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत . तसेच त्यावेळी प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांची कागद पत्रे पडताळणी व पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आले . परंतु त्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नसून त्यांची वयोमर्यादा संपत असल्याने त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे. याबाबत आमदार महोदयांच्या वतीने सभागृहाला अवगत करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री -देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.

     

    तसेच वर्ष २०२२ व २०२३ मधील पोलीस भरतीतील अजूनही पदे रिक्त असल्याने मुंबई पोलीस दलावर खूप ताण निर्माण होत आहे. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलीस भरती २०२१ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा निवड यादीत समावेश करून त्यांना संधी देण्यात यावी , जेणेकरून उमेदवारांना न्याय मिळेल व पोलीस दलावरील ताण कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबई पोलीस भरती २०२१ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती कधी देणार ? व त्यांची पोलीस भरती कधी करणार ? असा प्रश्न आमदार महोदयांच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात आला.

     

    यावर सभागृहासमक्ष उत्तर देतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की , ज्यांची निवड झाली आहे ,त्यांची वयोमर्यादा संपणार नाही , प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवत असून एक -एक बॅच आपण तयार करून प्रक्रिया पूर्ण करत आहोत . मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे प्रतीक्षा यादी एका वर्षाच्या वर राहत नसल्याने त्यांना घेता येत नाही . मात्र ज्यांची थेट निवड झाली त्यांना चिंता करण्याची गरज नसून त्यांना शंभर टक्के नोकरी मिळणार असल्याचे गृहमंत्री महोदयांनी सभागृहात स्पष्ट केले.

     

    तसेच मुंबई पोलीस भरती २०२१-२२ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्राची तपासणी झाली असल्याने त्यांचे वैद्यकीय पडताळणी करून पोलीस विभागात संधी देण्याच्या मागणीचे पत्र सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. यावर सर्व बाबीने पडताळणी व तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उमुख्यमंत्रीमहोदयांच्या वतीने देण्यात आले .

  • चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

    चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

     

     

    स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नरेश डाहूले यांना ऑनलाइन गेम, जुगार व शेअर मार्केटचा चांगलाच छंद जडला होता, मात्र या छंदात त्यांनी लाखो रुपये गमावले, 22 लाखांचे कर्ज झाल्यावर आता ते फेडायचं कसं हा विचार त्याच्या मनात आला, आणि त्याने पोलीस वर्दीत राहून गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

     

    रात्री एकटं निघायचं आणि रेकी करायचं असा प्रकार डाहूले यांनी सुरू केला, त्यानंतर बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरात एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा प्रवेश करीत रोख व सोन्याचे दागिने चोरायचे, असा प्रकार सुरू झाला.

     

    पहिल्या गुन्ह्यात मिळालेले यश डाहूले यांना दुसऱ्या पराक्रमासाठी कामी आलं, त्यानंतर त्यांनी घरफोडीचा सपाटा सुरू केला, मात्र रामनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नजरेत डाहूले आले आणि त्यांना अटक झाली.

     

    विशेष म्हणजे डाहूले यांचा घरफोडी गुन्ह्यात सहभाग आहे ही बाब आधीच पोलिसांच्या कानात आली होती, मात्र त्यांना वॉर्निंग देऊन सोडण्यात आले, त्याचा फायदा डाहूले यांनी घेतला.

     

    याआधी सुद्धा पोलीस दलात असे प्रकार घडले…

    पोलीस एखाद्या गुन्ह्यात सहभागी आणि त्याला अटक झाली हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, मात्र अश्या अनेक गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग आढळला, मात्र त्याची तक्रार झाली नाही, याबाबत News34 च्या हाती संपूर्ण माहिती मिळालेली आहे.

     

    यामध्ये चंद्रपुरातील एका भागात जुगार खेळताना काहींवर कारवाई झाली मात्र त्या खेळातील रक्कम परस्पर लाटण्यात आली, दुसऱ्या प्रकारात 26 जानेवारीला शहरातील एका घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड मारण्यात आली, जुगार खेळणाऱ्यांची नावे नोंदविली, रक्कम जवळ ठेवली मात्र त्या गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली नाही. सदर बाब News34 ने उघडकीस आणली होती हे विशेष.

     

    असे अनेक कर्मकांड आहे ज्यामध्ये पोलिसांचा सहभाग आढळला आहे, मात्र त्याबाबत तक्रार कुठेही करण्यात आली नाही, पोलिसांचा सेनापती मजबूत असेल तर असे प्रकार घडायला नको, मात्र सेनापती कमजोर असेल तर अशे प्रकार जिल्ह्यात अविरत सुरुचं राहतील.

  • मराठा आरक्षण हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – गृहमंत्री फडणवीस यांचा आदेश

    News34 chandrapur

    मुंबई – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

     

    अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, 2 हेक्टर च्या निकष काढत आता 3 हेक्टर करण्यात आला आहे.

     

    मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे, मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षणबाबत योग्य पाऊल उचलत आहे, मात्र आज या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे, ते अत्यंत चुकीचे असून सरकार हिंसाचार सहन करणार नाही.

    कुटुंब घरी असताना घराची जाळपोळ करणे म्हणजे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न आहे, याबाबत आता अशी हिंसा करणाऱ्या विरुद्ध कलम 307 अंतर्गत कारवाई करणार असल्याचे आदेश पोलीस विभागाला दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    या हिंसाचाराचा काही राजकीय पुढारी वयक्तिक लाभ घेत आल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे, त्याबाबत पोलीस विभाग आपलं काम करीत आहे, आता हिंसा करणाऱ्या विरोधात पोलीस विभाग कठोर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा

    News34 chandrapur

    मुंबई/वृत्तसेवा – राज्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, मात्र मदतीच्यावेळी जेव्हा कुणी समाजमाध्यमाची मदत घेतात त्यावेळी त्यांना काय अनुभव येतो हे एका ताज्या उदाहरणातून समोर आलेले आहे.

     

    दिव्यांग तरुणी विवाह करण्यासाठी नोंदणी कार्यालयात गेली पण कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, जाण्यासाठी लिफ्ट नव्हती, विवाह नोंदणी च्या कागदपत्रांवर सही त्या तरुणीचे हस्ताक्षर हवे मात्र खाली यायला कुणी तयार नव्हते, त्यावेळी त्या तरुणीने ट्वीटर आताचे x ची मदत घेतली आणि तात्काळ त्या तरुणीच्या समस्येवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेत तात्काळ यंत्रणेला कामाला लावले.

     

    16 ऑक्टोम्बर ला मुंबई भागातील खार येथील विवाह नोंदणी कार्यालयात गेलेल्या वीराली मोदी या तरुणीला हा अनुभव आला, विराली ही दिव्यांग मॉडेल म्हणून काम करते, ती व्हीलचेअर वर विवाह नोंदणी कार्यालयातील इमारतीजवळ दाखल झाली, मात्र नोंदणी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, कार्यालयात जाण्यासाठी लिफ्ट ची व्यवस्था नव्हती.

     

    विवाहासाठी विराली च्या हस्ताक्षराची गरज होती, मात्र वर जाण्यासाठी होत असलेला त्रास बघता कार्यालयातून कागदपत्रे खाली आणावे व हस्ताक्षर घेण्यात यावे अशी मागणी विराली ने केली मात्र कुणी यायला तयार नव्हते.

     

    विराली ने होत असलेल्या त्रासाची तक्रार थेट ट्विट करीत x वर राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत केली, आधी वाटलं की गृहमंत्री उत्तर देतील काय? मात्र एक जनप्रतिनिधींचा संवेदनशील पणा काय असतो याचा अनुभव काही क्षणात विराली ला आला.

     

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्या ट्विट ची दखल घेत, विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना कामाला लावत संपूर्ण यंत्रणा हलवून टाकली, अधिकारी तात्काळ विराली जवळ पोहचत त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल माफी मागत विवाह नोंदणी प्रक्रिया पार पाडली.

     

    गृहमंत्री फडणवीस यांनी आधी नम्रपणे विराली ला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागत यापुढे असा त्रास कुणाला होऊ नये याची पुढे दखल घेतल्या जाणार असे आश्वासन दिले, त्यांनतर विराली ने विवाह प्रक्रिया पार पडल्यावर लग्नाचे फोटो पुन्हा ट्विट करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

    फडणवीस यांनी विराली ला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, पुढे याबाबत काळजी घेतल्या जाणार असे आश्वासन सुद्धा दिले.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा

    News34 chandrapur

    चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले.

     

    या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर तसेच अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉ.संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे ,अनिल शिंदे, अनिल डहाके इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते.

     

    शनिवार दिनांक सकाळी नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात येईल.

    चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संदर्भात सकारात्मक ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात शासनाने दिलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करतो.शासनाने मागण्या मंजूर केल्या असून त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी.

  • हिंगणघाट जळीत कांडाची 3 वर्षांनी पुन्हा चर्चा

    News34 chandrapur

    वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे, महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं जळीत कांडातील पीडित कुटुंबाला मदतीच्या नावावर निव्वळ आश्वासन देण्यात आले होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.

    ३ फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. ८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने 10 फेब्रुवारीला निर्भयाचा मृत्यू झाला होता.

    ही घटना वर्धा निर्भया प्रकरण व हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले. याच घटनेमुळे शक्तीकायदयाचे सुतोवाच झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश निर्माण झाला होता.

    संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते.

    मात्र उध्दव ठाकरे आणि मविआ त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही, २.५ वर्ष कसलीही काहीही मदत केली नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

     

    महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या जळीतकांडाचा महाविकास आघाडीलाच विसर पडला होता, अखेर महायुतीच्या सरकारकडून
    पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    अडीच वर्ष सत्तेत असनार ठाकरे सरकारने फक्त घोषणाबाजीच केली होती प्रत्यक्ष मदत मात्र शुन्य, अखेर पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल पुढे करीत पिडीत कुटूंबियाला जाहिर मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

    तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून नुसतीच घोषणाबाजी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात मदत ही महायुती सरकारने केली.

     

    मात्र दिनांक २५ सप्टेबर, २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सदर निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली

    निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे असे चित्राताई वाघ म्हणाल्या.

    निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला.

  • भाग 2 चंद्रपुरातील या भागात सुरू आहे विना परवाना अवैध बार

    News34 chandrapur भाग 2

    चंद्रपूर – दुर्गापुरात चालतो अवैध सट्टा या पहिल्या सत्रानंतर आता आपण या बातमीत बघणार आहो की दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटी 11 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

     

    या विना परवाना बार मध्ये आपल्याला हॉटेल सारखी व्यवस्था केली जाते, विशेष करून चकना सुद्धा मोफत मिळतो.

     

    पण हे सगळं अवैध व छुप्या पद्धतिने सुरू आहे, विना परवाना अवैध बार धारक काही अंतरावर दारूच्या बॉटल्स लपवून ठेवतात, उर्जानगर येथील कोयना गेट च्या बाजूला तर शक्तीनगर गेट च्या आधी हे दारूचे दुकान थाटण्यात आले आहे.

     

    दुर्गापुरात अनेक ठिकाणी असंख्य घरी दारू मिळते, याबाबत दुर्गापूर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला पुरेपूर माहिती असून सुद्धा यावर कारवाई करण्यास हे दोन्ही विभाग टाळाटाळ करतात.

     

    या अवैध बार मुळे शासनाचा महसूल तर बुडतंच आहे सोबत परवाना धारक बार धारकांकडे आता या कमी किमतीच्या दारूमुळे आता व्यसनाधीन नागरिकांनी पाठ फिरविणे सुरू केले आहे.

     

    नकली दारूमुळे असंख्य नागरिकांचा जीव जातो मात्र तश्या घटनेचा उद्रेक जेव्हा होणार त्यावेळी उत्पादन शुल्क विभाग व दुर्गापूर पोलीस नक्की जागे होतील हे निश्चित….क्रमशः… पुढील भागात नक्की भेटूया…नव्या माहितीसह