चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा न्यायालयात झालेल्या मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य न्यायाधीशांना तक्रार दिली आहे.
तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, दोन अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सचे काम करण्यात आले. हे काम करोडो रुपयांचे आहे. या कामात बिल्डिंग मेंटेनन्स, टाइल्स लावणे, कलर करणे यासोबत अनेक कामे करण्यात आली होती. मात्र, या दोन वर्षातच या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे.
तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, संपूर्ण लावण्यात आलेले टाइल्स अनेक ठिकाणावरून निघून खाली पडले आहेत. अनेक ठिकाणच्या टाइल्स निघण्याच्या तयारीत आहेत. टाइल्सच्या आत मध्ये मटेरियल लोकल क्वालिटीचे वापरल्यामुळे ही टाइल्स भिंतीला चिपकवण्यात आलेली नाहीत. तसेच, भिंतीचा कलर कामात सुद्धा लोकल कॉलिटी चे पेंट मारले असल्यामुळे ते पेंट सुद्धा भिंतीवरून उघडत चाललेले आहे.
राईकवार यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून परंतु ही एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे हा प्रश्नचिन्ह आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.
प्रदर्शनातील उपस्थित जनतेकडून सांगण्यात आले की खिचडी अर्धी सुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते तेथील जनता सकाळी दहा वाजता पासून तरी पाच वाजेपर्यंत या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती परंतु त्या सर्व जनतेच्या वाटेला निराशा आली.
कारण संबंधित स्टॉल वर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉल कडे बघून निराशेने परत जाताना बोलत होता जर द्यायचेच नव्हते तर बॅनर लाऊन स्टाईल मारायची काय गरज होती.अशातच जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलवले परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉल पर्यंत पोहोचलीच नाही नेमकी खिचडी किती किलोची बनली हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का असा प्रश्न चंद्रपूरची जनता करू लागली आहे.म्हणून आपने या चंद्रपुरातील खिचडी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला.
ढिसाळ नियोजनाची खिचडी?
खिचडी बनल्यावर कृषी महोत्सव स्थळी नागरिकांची गर्दी उसळली, आधी रांगेत नागरिकांनी खिचडीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी जास्त असल्याने नागरिक ऐकायला तयार नव्हते, खिचडी मिळाली मात्र चम्मच चा त्या ठिकाणी अभाव आढळला, अनेक नागरिक जमिनीवर बसून खिचडी खाऊ लागले होते, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाचा अखेर अभाव दिसून आला. विविध प्रभागात नागरिक खिचडी ची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या पदरी निराशा पडली.