Tag: Raksha bandhan

  • रक्षाबंधनासाठी जात असताना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि घडलं दुर्दैवी

    News34

    सिंदेवाही – रक्षा बंधनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणीचा 1 सप्टेंबर ला अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातात मृतक महिलेची 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

    1 सप्टेंबर ला 34 वर्षीय लवकेश रेचनकर, त्याची पत्नी 29 वर्षीय मीनाक्षी रेचनकर व मुलगी 6 वर्षीय मनस्वी हे आज दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पाथरी चक येथे जात होते.

    रक्षा बंधनाला भावाकडे राखी बांधायला मीनाक्षी गेली नसल्याने आज त्या कुटुंबासहित निघाल्या होत्या मात्र सिंदेवाही पासून 3 किलोमीटर अंतरावरील मेंढा माल येथुन जात असताना लवकेश यांना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कुटुंबसहित सर्व रस्त्यावर आदळले.

     

    या अपघातात मीनाक्षी रेचनकर यांचा जागीच मृत्यू झाला तर 6 वर्षीय मनस्वी गंभीर जखमी झाली, सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ मनस्वी व लवकेश यांना रुग्णालयात दाखल केले, मनस्वी ची प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    सिंदेवाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पीआय तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

  • राखी बांधायची कधी? जाणून घ्या योग्य वेळ

    News34 raksha bandhan

    चंद्रपूर – आज दिनदर्शिकेत नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन नमूद आहे मात्र राखी कधी बांधायची हा पेच मुहूर्तामुळे अडकल्याने राखी बांधायची की नाही? हा प्रश्न बहिणीसमोर पडला आहे.

    यंदा 30 व 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे, पौर्णिमा तिथी ही दोन दिवस असल्याने 30 ऑगस्ट पासून सकाळी 11 तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला सकाळी 7.37 पर्यंत असल्याने राखी बांधण्याचे 2 मुहूर्त असणार आहे.

    राखी कधी बांधायची?

     

    30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग देखील आहे, जो खूप खास मानला जातो. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होते आणि 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता पौर्णिमा संपते, त्यामुळे या दरम्यानचा वेळ हा राखी बांधण्यासाठी योग्य आहे.

    परंतु 30 ऑगस्टला रात्री 9.02 वाजेपर्यंत भद्राकाळ असल्याने त्यानंतर रक्षाबंधन साजरं केलं जावू शकतं. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 मिनिटांपर्यंत भावाला राखी बांधता येईल. पण बरेच जण मानतात की, बहिणीचं भावावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो, त्यामुळे अशा दिवशी मुहूर्ताचा सोस कशाला बाळगायचा. त्यामुळे जे लोक मुहूर्ताची परवा बाळगत नाही, ते 30 ऑगस्टला कोणत्याही वेळी भावाला राखी बांधू शकतात.