Tag: Nana patole

  • मॅच फिक्सींगचा काळ गेला, बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार काँग्रेसचा होणार – नाना पटोले

    News34 गुरू गुरनुले

    मूल : भुतकाळाचा विचार आता करू नका, प्रवाहाचा विरूध्द दिशेने पोहुनही आपण कित्येक वर्षापासुन काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न करीत आहात. याचा अभिमान असुन आता मँच फिक्सींग होणार नाही. तो काळ गेला असुन क्षेञाचा पुढील आमदार काँग्रेसचा राहील. यासाठी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले.

     

    काँग्रेसच्या वतीने काढण्यात येत असलेल्या जनसंवाद याञेनिमित्य जिल्ह्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले काल चंद्रपूर येथुन गडचिरोली कडे जात असताना राञो ९.४५ वा. दरम्यान त्यांचे स्थानिक गांधी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. आ. पटोले यांच्या आगमना निमित्य काँग्रेस भवन येथे मार्गदर्शनाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे संघटक नाना गावंडे, वडसा येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी उपस्थित होते.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तालुका काँग्रेसच्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रावत मित्र परिवार सहका-यांच्या वतीने आ. नाना पटोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आल्यानंतर संतोषसिंह रावत यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना बोलुन दाखवतांना आपले पायगुण चांगले असल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याने पाऊस मिळाला. असे म्हणत नानाभाऊच्या नेतृत्वात पक्षकार्याची प्रशंसा केली.

    Chandrapur rular congress
    नाना पटोले यांचा मूल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करताना

    क्षेञात भाजपाचा आमदार आणि मंञी असतांना तालुक्यात काँग्रेस आघाडीवर आहे. परंतु सत्ता नसल्याने प्रशासनाकडून सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. अशी खंत व्यक्त करतांना भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याला नेतृत्वाची संधी द्यावी. अशी आग्रही विनंती संतोषसिंह रावत यांनी बोलुन दाखविली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या भारत जोडो याञेचे अनुकरण करत आपण जनसंवाद याञेचे नियोजन केले असल्याचे सांगतांना याञेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेतल्यास राज्यात यावेळी सत्तांतर अटळ असल्याचे सांगितले.

     

    सध्याची स्थिती काँग्रेस करीता अनुकुल असुन मत आणि मनभेद दुर ठेवुन काम करा. संधी न गमवता संधीचे सोने करा, अन्यथा आपल्या सारखे कपाळ करंटे लोक नाही. हे लक्षात घेवुन कामाला लागा. असे आवाहन केले.

     

    शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी संचलन आणि गुरू चौधरी यांनी आभार मानले. यावेळी कांग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, सोसायटी अध्यक्ष संदीप कारंमवार, सरपंचं संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, महीला अध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडेपवार, युवक अध्यक्ष पवन निलवार, संचालक किशोर घडसे, राहुल मुरकुटे,हसन वाढई, योगेश शेरकी, दिपक वाढई, दशरथ वाकुडकर,जालिंदर बांगरे,भगवान ढोरे,बंडू गुरनुले, शांताराम कामडे, कैलाश चलाख, प्रशांत उराडे, रुपाल रावत, लिना फुलझेले, केदारनाथ कोटगले, संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, छोटू रावत, शामला बेलसरे, राधिका बुक्कावार,समता बंसोड, आर. टी.गुरनुले, भाऊजी लेनगुरे, यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी तालुका युवक आणि महीला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

  • कांग्रेसची जनसंवाद यात्रा हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्याची दुसरी लढाई – नाना पटोले

    News34

    चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी राज्यात जनसंवाद यात्रेचा कांग्रेस ने शुभारंभ केला, जनसंवाद यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केले.

    चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेची सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात 5 सप्टेंबर ला नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.

     

    कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, जनसंवाद यात्रा मागील हेतू काय? कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या यात्रेबाबत माहिती दिली.

     

    नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की वर्ष 2014 मध्ये मोदी सरकार मतदारांना थापा व खोटे आश्वासन देत सत्तेत आले.

    आज देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुकूमशाही, महागाईने सध्या नागरिक त्रस्त झाले आहे. आम्ही नागरिकांना जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धीर देण्याचं काम करीत आहो, सामान्य नागरिकांशी संवाद साधताना इतकंच जाणवतं की आता परिवर्तन हवं.

    जालण्यात झालेला लाठीचार्ज हा शासन पुरस्कृत होता अशी चर्चेमार्फत आम्हाला माहिती मिळाली, मात्र फडणवीस-शिंदे व पवार सरकारने आंदोलनकर्त्यांची माफी मागितली म्हणजेच सरकारचे कुठेतरी चुकले.

    विशेष म्हणजे आंदोलन कर्त्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले आहे, मराठ्यांना आरक्षण व त्यांना न्याय फक्त कांग्रेस पक्ष देऊ शकतो, मात्र ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देणं म्हणजे एकाच्या तोंडाचा घास दुसऱ्याच्या तोंडात टाकण्याची ही भाषा आहे.

    राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपला आहे, मात्र निवडणूक अद्यापही सरकारने घेतली नाही, कारण सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेचा कौल असून सरकार निवडणुकीला घाबरत आहे.

    निवडणूक उद्या घेतल्यास कांग्रेस पक्ष हुकूमशाही सरकार विरोधात लढायला तयार बसली आहे.

    फडणवीस-शिंदे सरकारमध्ये पुन्हा एक A जोडण्यात आला आहे आता हे येड्यांची सरकार बनली आहे, राज्यात सध्या सुरू असलेल्या पदभरती मध्ये बेरोजगार युवकांकडून फी च्या नावाखाली लूटमार करणे सुरू आहे, आमची सत्ता आल्यास प्रत्येक पदभरती साठी एकच व कमी शुल्क आकारू.

    पत्रकार परिषदेत जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, दिनेश चोखारे यांची उपस्थिती होती.

  • भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे – नाना पटोले

    News34

    चंद्रपूर : स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढावं लागेल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, आणि काँग्रेस कार्यकर्त्याची जास्त जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ते सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेत बोलत होते.

    आनंदवन चौकातून सकाळी सहा वाजता ही पदयात्रा निघाली. पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जनसंवाद यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक नाना गावंडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, कामगार नेते केके सिंग, विनोदजी अहिरकर, तानाजी सावंत, संजय महाकाळकर, माजी सभापती दिनेश चोखारे, पत्रकार बाळ कुळकर्णी, चंद्रपूर शहर महीला अध्यक्षा चंदाताई वैरागडे,प्रशांत भारती आदींसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

    पदयात्रा रेल्वे स्टेशन रोड, डॉक्टर जाजू हॉस्पिटल, सद्भावना चौक, डाॅ.आंबेडकर चौक, मेन रोड वरोरा, मिलन चौक येथून पुढे शगुन हाॅल येथे समारोप झाला.

    यावेळी नानाभाऊ पटोले यांनी भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे.

    पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर लढणार आहे. पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे.

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनीही मार्गदर्शन केले.

    वरोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. हेमंत खापणे,माजी सभापती छोटुभाई शेख,विधानसभा युवक अध्यक्ष शुभम चिमूरकर ,माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग, प्रविण काकडे,माजी नगरसेवक राजू महाजन,सन्नी गुप्ता, राहुल देवडे, महिला काँग्रेस अध्यक्ष ऐश्वर्या खामकर, शहराध्यक्ष दिपाली माटे,रत्ना अहिरकर, भद्रावती तालुकाध्यक्ष वर्षा ठाकरे, शहराध्यक्ष सरिता सूर,मनोज दानव,निलेश भालेराव, सुभाष दांदडे,फिरोज पठाण,काँग्रेस पदाधिकारी सुधीर मुळेवार, रवींद्र धोपटे, हरीश जाधव ,चंदू दानव, ईस्तेखां पठाण,सुरेश टेकाम,अमर गोंडाणे, पुरुषोत्तम पावडे, सुनंदा जीवतोडे, धम्मकन्या भालेराव, चेतना शेट्ये,देवानंद मोरे,अनिल चौधरी, पद्माकर कडूकर, मनोहर स्वामी,किशोर डुकरे,उमेश देशमुख, अमोल सेलकर, सलिम पटेल, अरुण बर्डे, सुजीत कष्टी, प्रकाश शेळकी, योगेश खामनकर,गिरीधर कष्टी,दिवाकर निखाडे ,पुरुषोत्तम निखाडे, ग्यानिवंत गेडाम, सारिका धाबेकर, देवानंद मोरे ,रुपेश तेलंग, अनिरुद्ध देठे,मयुर विरूटकर, सुरज बावणे, विलास गावंडे, महादेवाचे आसेकर, पुरुषोत्तम कुडे, गणेश मडावी,गणेश काळे यांच्यासह शेकडो पदाधीकारी सहभागी झाले होते.

  • नाना पटोले यांच्या स्वीय सहायकाला अटक?

    News34

    Nana patole personal assistant

    नागपूर – काय म्हणता? कसे आहात? मी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक आहे, असे म्हणत एकाने तब्बल 2 वर्षे हॉटेलमध्ये फुकटच्या जेवणावर ताव मारला.

    मात्र हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर या तोतया पीए ने चालकांवर चाकूने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी या पीए ला अटक केली, चौकशी मध्ये तो नाना पटोले यांचा तोतया पीए असल्याचे निष्पन्न झाले.

    विज्ञानाच्या आधुनिक युगात फसवणुकीचे प्रकारात आजही वाढ होत आहे, नवीन टेक्नॉलॉजी आली असली तरी सुद्धा मानवी बुद्धी समोर ती काहीच नसते.

    असाच एक प्रकार नागपुरात घडला 33 वर्षीय ललित अग्निहोत्री या तोतया पीए ला पोलिसांनी अटक केली आहे.

    अग्निहोत्री यांनी नाना पटोले यांचा पीए असल्याची खोटी बतावणी करीत

    बसस्थानक पुढे असलेले दुर्गाप्रसाद पांडे यांचे हॉटेल अंबिका व ब्रिज इन हॉटेल आहे, अग्निहोत्री यांनी मागील 2 वर्षांपासून पांडे यांना कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करीत फुकटच्या जेवणावर ताव मारत होता, अग्निहोत्री यांची उधारी 50 हजार रुपये झाल्यावर पांडे यांनी पैश्याची मागणी केली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

    पांडे यांना अग्निहोत्री वर संशय आला होता, 2 वर्षांपासून अग्निहोत्री यांनी आपल्या मित्रांना सुद्धा पांडे यांच्या हॉटेलमध्ये पार्टी दिली होती, पांडे यांनी पैश्याची विचारणा केली असता दोघात वाद झाला अग्निहोत्री यांनी पांडे वर चाकूने हल्ला केला.

    हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी वाद सोडविला व अग्निहोत्री यांना पोलीस येई पर्यंत पकडून ठेवले, पोलीस पोहचताच चौकशीमध्ये तो तोतया पीए असल्याचे निष्पन्न झाले.