Tag: Maratha reservation

  • मराठा आरक्षणाचा वाद पेटला, जरांगे विरोधात टोंगे यांचं अन्नत्याग आंदोलन

    News34  maratha reservation

    चंद्रपूर – राज्यातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करीत सरकारला मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे, सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र सरकार व पाटलांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला असून चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

     

    ओबीसी समाजाने आजपर्यंत सरकारला जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली मात्र अजूनही त्या मागणीची पूर्तता झाली अनही, अश्यातच मराठा समाजाने आरक्षण मागत जालन्यात आंदोलन सुरू केले.

     

    मराठा समाजाच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने ते आंदोलन प्रकाश झोतात आले, आता मराठा समाजातील मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली, त्यावर सरकारने अध्यादेश काढण्याची तयारी पण सुरी केली आहे, मात्र सरकार व पाटील यांच्या भूमिकेवर ओबीसी समाजाने तीव्र निषेध नोंदवीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी केली आहे.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्टपासून प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वस्तीगृह सुरू करणार अशी घोषणा केली होती मात्र ती घोषणा हवेत राहली, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गाती मूला-मुलींसाठी वस्तीगृह सुरू करावे, स्वाधार योजना सुरू करावी, जातनिहाय जनगणना करावी अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आले की सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास सरकारला आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊ, सरकारने आरक्षणाबाबत योग्य भूमिका घ्यावी.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला जिल्ह्यातील 25 संघटनांनी पाठिंबा दिला आहे, 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

    उपोषण मंडपात यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर व सदस्यांची उपस्थिती होती.

  • राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, आरक्षणाचा वाद चिघळणार

    News34 maratha vs obc

    चंद्रपूर – 17 सप्टेंबर रोजी गांधी चौकातून निघणाऱ्या आगामी ओबीसी महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन तेली समाजाने आपल्या सदस्यांना केले आहे. या मोर्चाचा उद्देश आपल्या राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष देणे हा आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिका येथे नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली, जिथे तेली समाजातील असंख्य सदस्य या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी जमले होते.

     

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसींवर अन्याय

    बैठकीत तेली समाजाचे प्रमुख नेते प्रा.सूर्यकांत खनके यांनी मराठ्यांच्या संभाव्य ओबीसी वर्गीकरणाबाबत चिंता व्यक्त केली. सध्या ओबीसी म्हणून वर्गीकृत नसलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तेली समाजासह इतर समाजावर अन्याय होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. याला प्रत्युत्तर म्हणून तेली समाजाने रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    17 सप्टेंबर च्या महामोर्चात तेली समाजाचा सक्रिय सहभाग

    सर्वानुमते निर्णय घेऊन तेली समाजाच्या पदाधिकार्‍यांनी 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी महामोर्चात सक्रियपणे सहभागी होणार असल्याची घोषणा केली. या जनप्रदर्शनाचा उद्देश तेली समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला आवाहन करणे हा आहे. या बैठकीत तेली समाजाने मांडलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यावर भर देण्यात आला.

     

    याप्रसंगी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके, प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ तेली समाज महासंघ शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, ओमप्रकाश पोटदुखे, रवींद्र जुमडे, प्रा. पांडुरंग मोहरकर, भूपेश गोठे, नरेंद्रजी बुरांडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, गणेश येरणे, यश बांगडे, अशोक रहाटे, चंद्रशेखर घटे, मनीष खनके, नितेश जुमडे, योगेश देवतळे, सचिन किरमे, गणेश तिघारे, पुरुषोत्तम मोगरे, अजय खनके, गोपीभाऊ खोब्रागडे, हरिदास नागपुरे, संजय कुकडे, सुनील बुटले, भूपेंद्र खनके, भरत कुंडले, संजय बिजवे, गणेश पोहाणे, विनोद निखाते, अक्षय किरमे, ॲड. मुरलीधरराव बावनकर, उमेश मोगरे, कैलास राहटे, ओमप्रकाश पोटदुखे, प्रा. पांडुरंग मोहरकर, महेश टीपले, मनीष तपासे, सुभाष निखाते यांची उपस्थिती होती.

  • येत्या निवडणुकीत सरकारला जागा दाखवू – ओबीसी महापंचायत

    News34

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

     

    जालन्यातील झालेला लाठीचार्ज याचा ओबीसी समाजाने निषेध केला आहे, सरकारने निजामशाही मधील कुणबी समाजाचे दाखले द्या व कुणबी प्रमानपत्र देणार मात्र मराठा समाजाकडे निजामशाही चा पुरावा नसल्याने त्यांनी ओबीसी समाजात सामील करावे अशी मागणी केली.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले, या महापंचायतीमध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये असे ठराव मांडण्यात आले.

     

    मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या, आधीच ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाही चे दाखले पुरावे असतील तर त्यांना आरक्षण द्या पण सरसकट नको, मराठा समाजाने आजपर्यंत मोठे मोर्चे काढले आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली आहे.

     

    ओबीसी समाजाला मोठा मोर्चा काढायचा आहे यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठका लावा, मोर्च्यांचे नेतृत्व आपल्याला करायचं आहे.

     

    ओबीसी महापंचायतीमध्ये सोमवार 11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे. 17 सप्टेंबर ला ओबीसी समाजाचा महामोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार आहे.

    ओबीसी महापंचायती मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तेली महासंघ, माळी महासंघ व विविध राजकीय पदाधिकारी सहित एकूण 20 संघटना सामील झाल्या होत्या.पंचायत मध्ये बबनराव फंड, अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर ,माजी देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, संदीप गिरे, सतीश भिवगडे, पुरुषोत्तम सातपुते, अरुण तीखे,शाम लेडे, रजनी लेडे, डॉ संजय घाटे, अनिल धानोरकर, सूर्यकांत, खनके मनीषा बोबडे, गणेश आवारी, अविनाश पाल ,निलेश बेलखेडे, रवींद्र टोंगे, राजेंद्र खांडेकर, अजय बलकी, हितेश लोडे, अनिल डहाके आदींची उपस्थिती होती.

  • मराठा आरक्षणावरून विदर्भ तेली महासंघाने सरकारला दिला इशारा

    News34

    चंद्रपूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला दिला आहे.

     

    यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे यांची उपस्थिती होती.

     

    जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे (ता. अंबड) या गावी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी उपस्थित जमावावर दि. २ सप्टेंबर, २०२३ रोजी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्याचा विदर्भ तेली समाज महासंघाने यावेळी निषेध केला.

     

    सन १९९३ पासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, मागासलेपणाच्या निकषात ते बसत नसल्याने न्या. खत्री व न्या, बापट कमिशनने त्यांना आरक्षण नाकारले होते. श्री. नारायण राणे कमिटीचा (२०१२) अहवाल असंविधानिक असल्याने उच्च न्यायालयात त्याला स्थगिती दिली गली. न्या. गायकवाड आयोगाने मराठा समाजासाठी शिफारस केलेले १२ % (शिक्षण) व १३% (नोकरी) आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.

     

    संविधानाच्या कलम १५(४) व कलम १६(४) नुसार या समाजाला अपवादात्मक परिस्थितीच्या कारणास्तवसुद्धा ५०% च्यावरील आरक्षण देता येणार नाही. असे मान. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या दि. ५ मे, २०२१च्या निकालात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होईल.

     

    त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. हे दिल्यास फक्त कुणबी समाजावरचा अन्याय होणार नसून संपूर्ण ओबीसी समाजावर हा अन्याय आहे. त्यामुळे हा अन्याय तेली समाज कदापि सहन करणार नाही. या विरोधात तेली समाज रस्त्यावर उतरेल, तसेच राज्यपातळीवर बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा. आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा.

     

    राज्य सरकारने ओबीसींविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरतील. आणि ओबीसीविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वच पक्षांच्या विरोधात आगामी निवडणूकांत मतदान करील, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाचे यांनी दिला आहे.