Tag: Jansamvad padyatra congress

  • भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे – नाना पटोले

    News34

    चंद्रपूर : स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढावं लागेल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, आणि काँग्रेस कार्यकर्त्याची जास्त जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ते सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेत बोलत होते.

    आनंदवन चौकातून सकाळी सहा वाजता ही पदयात्रा निघाली. पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जनसंवाद यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक नाना गावंडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, कामगार नेते केके सिंग, विनोदजी अहिरकर, तानाजी सावंत, संजय महाकाळकर, माजी सभापती दिनेश चोखारे, पत्रकार बाळ कुळकर्णी, चंद्रपूर शहर महीला अध्यक्षा चंदाताई वैरागडे,प्रशांत भारती आदींसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

    पदयात्रा रेल्वे स्टेशन रोड, डॉक्टर जाजू हॉस्पिटल, सद्भावना चौक, डाॅ.आंबेडकर चौक, मेन रोड वरोरा, मिलन चौक येथून पुढे शगुन हाॅल येथे समारोप झाला.

    यावेळी नानाभाऊ पटोले यांनी भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे.

    पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर लढणार आहे. पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे.

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनीही मार्गदर्शन केले.

    वरोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. हेमंत खापणे,माजी सभापती छोटुभाई शेख,विधानसभा युवक अध्यक्ष शुभम चिमूरकर ,माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग, प्रविण काकडे,माजी नगरसेवक राजू महाजन,सन्नी गुप्ता, राहुल देवडे, महिला काँग्रेस अध्यक्ष ऐश्वर्या खामकर, शहराध्यक्ष दिपाली माटे,रत्ना अहिरकर, भद्रावती तालुकाध्यक्ष वर्षा ठाकरे, शहराध्यक्ष सरिता सूर,मनोज दानव,निलेश भालेराव, सुभाष दांदडे,फिरोज पठाण,काँग्रेस पदाधिकारी सुधीर मुळेवार, रवींद्र धोपटे, हरीश जाधव ,चंदू दानव, ईस्तेखां पठाण,सुरेश टेकाम,अमर गोंडाणे, पुरुषोत्तम पावडे, सुनंदा जीवतोडे, धम्मकन्या भालेराव, चेतना शेट्ये,देवानंद मोरे,अनिल चौधरी, पद्माकर कडूकर, मनोहर स्वामी,किशोर डुकरे,उमेश देशमुख, अमोल सेलकर, सलिम पटेल, अरुण बर्डे, सुजीत कष्टी, प्रकाश शेळकी, योगेश खामनकर,गिरीधर कष्टी,दिवाकर निखाडे ,पुरुषोत्तम निखाडे, ग्यानिवंत गेडाम, सारिका धाबेकर, देवानंद मोरे ,रुपेश तेलंग, अनिरुद्ध देठे,मयुर विरूटकर, सुरज बावणे, विलास गावंडे, महादेवाचे आसेकर, पुरुषोत्तम कुडे, गणेश मडावी,गणेश काळे यांच्यासह शेकडो पदाधीकारी सहभागी झाले होते.

  • मूल कांग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चारखासंघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

    मुल येथून निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसचे महिला,पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

    लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत मुल ,कोसंबी, मारोडा, आदर्श खेडा, उष्रळा, भादुर्णी लोकांशी संवाद साधला.भादूर्णी येथे पदयात्रेचे विक्रम गुरनुले यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी धूम धडाक्यात स्वागत करुन चौकात सभा घेण्यात आली. सभेला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले ,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी,यांनी नागरिकांशी संवादात्मक मार्गदर्शन केले.

     

    मंगेश बत्तुलवार यांनी आभार मानले. पदयात्रेत काँग्रेस नेते संतोष सिंह रावत, कृ. ऊ.बा.स.सभापती राकेश रत्नावार, संचालक व माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, सेवादलाचे ज्येष्ठ नामदेवराव गावतूरे, शशिकला गावतूरे, संचालक संदीप कारमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, ग्रामीण काँग्रेसचे राजू पाटील मारकवार, माजी सभापती दशरथ वाकुडकर , युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, दीपक पा. वाढई, सरपंच चांगदेव केमेकर, संचालक हसन वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,संचालक किशोर घडसे, लहू कडस्कर, विनोद कांमडे, औद्योगिक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, राजेंद्र वाढई, गुलाब पठाण, शहरउपाध्यक्ष संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, शहर महासचिव कैलास चलाख, गंगाधर घुगरे, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्या फर्जणा शेख, नाजुका लाटकर,समता बनसोड, व इतर महिला,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पल्लकवार व दहा युवकांची टीम,चीचाळा येथील मंकीवार व त्याची टीम, चंदू चटारे, रामदास गुरनुले,भाऊजी लेनगुरे,संदीप वाढई, छोटू रावत, राजेश गावतुरे, गुज्जनवार, विनोद कामडे, सरपंच रवी कामडे, उपसरपंच साहिल येनगनटीवार, शेख, संचालक जवादे, यांचेसह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते. पदयात्रेची सांगता कोसंबी सरपंच रवींद्र कामडे यांनी दिलेल्या भोजनाने झाली.