Tag: Indian railway

  • त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.

     

    पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

     

    या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर खालील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे:

     

    सिंकदराबाद – दानापूर ट्रेन नं. १२७९१ / ९२, ग्रांड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. १२६१५ / १६, अहिल्यानगरी एक्सप्रेस ट्रेन नं. २२६४५ / ४६, जयपूर एक्सप्रेस ट्रेन नं. १२९७५/७६, राप्ती सागर एक्सप्रेस ट्रेन नं. १२५११ / १२, संघमित्रा एक्सप्रेस ट्रेन नं. १२२९५ / ९६, धनबाद कोल्हापूर दिक्षाभुमी एक्सप्रेस ट्रेन नं. ११०४५/४६, संतरागाछी एक्सप्रेस ट्रे १२७६७/६८ या रेल्वे गाड्यांच्या समावेश आहे.

     

    या व्यतिरिक्त, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१-०२) नागपूरपर्यंत, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, बल्लारपूर – वर्धा पॅसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस (मुंबईसाठी सीधी ट्रेन सुरू होईपर्यंत) या ट्रेनांचा स्टॉपेज पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

     

  • ड्युटी संपली रेल्वे थांबली, महिलांचा आक्रमकपणा बघून रेल्वे प्रशासन नरमले

    News34

    चंद्रपूर – मागील काही दिवसांपासून गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर चालणाऱ्या ट्रेन 23 ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहे, मात्र गोंदिया वरून सायंकाळी 6 वाजता सुटणारी बल्लारपूर जाणारी एकमेव रेल्वे सुरू आहे, ही रेल्वे रात्री 10.30 वाजता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहचते मात्र 20 ऑगस्टला ही रेल्वे तब्बल साडेतीन तास उशिरा पोहचली.

    सायंकाळी गोंदिया वरून सुटणारी ही रेल्वे मूल स्टेशनवर रात्री 12 वाजता दाखल झाली, मात्र तिथून ती रेल्वे पुढे सरकत नव्हती, याबाबत मोटरमन ला प्रवाश्यानी विचारणा केली असता त्याने सांगितले की माझी ड्युटी 11 वाजता संपली आहे, मला लेखी आदेश मिळाल्याशिवाय मी रेल्वे पुढे नेऊ शकत नाही.

    यावर प्रवाश्यानी आक्षेप घेत स्टेशन मास्टर ला जाब विचारणा केली, मात्र त्यांनी आधी काही प्रतिसाद दिला नाही, महिला प्रवासी यावर स्टेशन मास्टर वर चिडल्या आमच्या सोबत काही प्रवासी आहे, त्यांची प्रकृती बरोबर नाही, जर प्रवाश्यांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण असे खडेबोल महिलांनी स्टेशन मास्टर ला सुनाविले.

    दीड तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्टेशन मास्टर ने वरिष्ठांना विचारणा करीत मोटरमन ला लेखी आदेश देत रेल्वे पुढे न्यायला सांगितली, त्यानंतर सदर रेल्वे ही रात्री 2 वाजता चांदा फोर्ट ला पोहचली, रेल्वे प्रबंधनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाश्याना बसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.