Tag: congress news

  • जनसंवाद पदयात्रेचा इफेक्ट

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेने काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मुल तालुक्यातील कोसंबी, मारोडा, आदर्षखेडा, उषराळा, भादूर्णी, मरेगाव, चीतेगाव, बेलगाटा, चिखली, गांगलवाडी, डोंगरगाव, राजोली, ताडाळा, चीचाळा, हळदी, भेजगावं, येरगाव, चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भू), बाबराळा, बेबाळ, बोंडाळा, नांदगाव, जानाळा, फूलझरी ,कांतापेठ, टोलेवाही, चिरोली, हेटी, खालवसपेठ, उठलपेठ, नलेश्र्वर, सुशी, केळझर इत्यादी गावात पदयात्रा काढून काँग्रेसचे पदाधिकारी, महिला,पुरुष व युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवादल काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी होऊन केंद्र व राज्य सरकारने चालवलेली हुकूमशाही, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार ,विजेचे वाढते दर, शेतकरी दुष्काळ, मानवावर वन्य प्राण्यांचे हल्ले, लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, विजेचे वाढीव दर, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, खोटे खटले दाखल करुन लोकशाहीची हत्या करणे अशा महत्वाच्या समस्याची जाणीव चर्चेतून सर्व सामान्य जनतेशी संवाद साधून समजाऊन सांगण्यात आली. Congress party news

     

    पदयात्रेत काँग्रेसने सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक, ३४ ग्राम पंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्य, माजी नगरसेवक, सहकारी सोसायट्यानचे अध्यक्ष व सदस्य, तालुकाचे अध्यक्ष व पदाधिकारी युवक कांग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी, महिला काँग्रेसचे अध्यक्षा व पदाधिकारी, महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा व पदाधिकारी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदाधिकारी, ओबीसी सेल, किसान सेल पदाधिकारी, औद्योगिक सेलचे पदाधिकारी, व तालुक्यातील कांग्रेस प्रेमी पदयात्रेत सहभागी झाले. यात्रेत असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

     

    बेंबाळ येथे भाजप व वंचीत कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    बेंबाळ यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे गंगाधर आनंदराव बोरकर व वंचीत आघाडीचे प्रमोद वाळके, साजिद उराडे यांनी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यात्रेचे नेतृत्व सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंहरावत यांनी प्रवेश करणाऱ्यांचे पुष्प गुच्छ व गळ्यात काँग्रेस दुपट्टा घालून स्वागत केले अभिनंदन केले.

     

    याप्रसंगी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी तालुकाध्यक्ष व संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पाटील वाढई, राजू पा. मारकवार, सरपंच चांगदेव केमेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, प्रशांत उराडे, उपसरपंच देवाजी ध्यांनबोइंनवार, माजी सरपंच विजय बॉम्मावार,किशोर नंदीग्रामवार, विनोद वाढई, गणेश नीलमवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी दीपक कोटगले, ज्येष्ठ कांग्रेस नेते नत्थु पा.आरेकर, बंडूभाऊ गुरनुले,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सेवादलाचे नामदेवराव गावतुरे, संचालक सुमित आरेकर, युवा नेते मनी बुग्गावार, पं.स.माजी उपसभापती. दशरथ वाकुडकर, सरपंच हिमानी वाकुडकर, बाजार समिती संचालक योगेश शेरकी, जालिंदर बांगरे, सरपंच धीरज गोहने, संतोष चावरे, संदीप मोहबे, तालुका महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, शशिकला गावतूरे ,शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे,सीमा भसारकर, समता बनसोड, लता निंदेकर यांचेसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे – नाना पटोले

    News34

    चंद्रपूर : स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढावं लागेल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, आणि काँग्रेस कार्यकर्त्याची जास्त जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ते सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेत बोलत होते.

    आनंदवन चौकातून सकाळी सहा वाजता ही पदयात्रा निघाली. पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जनसंवाद यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक नाना गावंडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, कामगार नेते केके सिंग, विनोदजी अहिरकर, तानाजी सावंत, संजय महाकाळकर, माजी सभापती दिनेश चोखारे, पत्रकार बाळ कुळकर्णी, चंद्रपूर शहर महीला अध्यक्षा चंदाताई वैरागडे,प्रशांत भारती आदींसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

    पदयात्रा रेल्वे स्टेशन रोड, डॉक्टर जाजू हॉस्पिटल, सद्भावना चौक, डाॅ.आंबेडकर चौक, मेन रोड वरोरा, मिलन चौक येथून पुढे शगुन हाॅल येथे समारोप झाला.

    यावेळी नानाभाऊ पटोले यांनी भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे.

    पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर लढणार आहे. पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे.

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनीही मार्गदर्शन केले.

    वरोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. हेमंत खापणे,माजी सभापती छोटुभाई शेख,विधानसभा युवक अध्यक्ष शुभम चिमूरकर ,माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग, प्रविण काकडे,माजी नगरसेवक राजू महाजन,सन्नी गुप्ता, राहुल देवडे, महिला काँग्रेस अध्यक्ष ऐश्वर्या खामकर, शहराध्यक्ष दिपाली माटे,रत्ना अहिरकर, भद्रावती तालुकाध्यक्ष वर्षा ठाकरे, शहराध्यक्ष सरिता सूर,मनोज दानव,निलेश भालेराव, सुभाष दांदडे,फिरोज पठाण,काँग्रेस पदाधिकारी सुधीर मुळेवार, रवींद्र धोपटे, हरीश जाधव ,चंदू दानव, ईस्तेखां पठाण,सुरेश टेकाम,अमर गोंडाणे, पुरुषोत्तम पावडे, सुनंदा जीवतोडे, धम्मकन्या भालेराव, चेतना शेट्ये,देवानंद मोरे,अनिल चौधरी, पद्माकर कडूकर, मनोहर स्वामी,किशोर डुकरे,उमेश देशमुख, अमोल सेलकर, सलिम पटेल, अरुण बर्डे, सुजीत कष्टी, प्रकाश शेळकी, योगेश खामनकर,गिरीधर कष्टी,दिवाकर निखाडे ,पुरुषोत्तम निखाडे, ग्यानिवंत गेडाम, सारिका धाबेकर, देवानंद मोरे ,रुपेश तेलंग, अनिरुद्ध देठे,मयुर विरूटकर, सुरज बावणे, विलास गावंडे, महादेवाचे आसेकर, पुरुषोत्तम कुडे, गणेश मडावी,गणेश काळे यांच्यासह शेकडो पदाधीकारी सहभागी झाले होते.

  • गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखासंघ मुल येथून निघणार जनसंवाद पदयात्रा

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत देशाचे जन नायक खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर जनसंवाद यात्रा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. Congress news

     

    त्या अनुषंगाने विधान सभेचे विरोधी पक्षनेते व माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिलेल्या आदेशानुसार मुल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पदयात्रेचा शुभारंभ काँग्रेस नेते सी. डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात व शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाग विदर्भ चरखासंघ मुल येथून ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६-०० वाजता निघणार आहे. Bharat jodo

    पदयात्रेच्या माध्यमातून मुल तालुक्यातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अत्याचार व शेतकऱ्यांचा दुष्काळ, लोकशाहीची हत्या अशा अन्य समस्यांवर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून जनभावना जाणून घेणे या पदयात्रेचा उद्देश आहे.

    ही पदयात्रा तालुक्यातील सर्व गावांना यात्रेच्या माध्यमातून भेटी देऊन संवाद साधणार आहे.करीता तालुक्यातील काँग्रेसच्या युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस, शहर काँग्रेस,महिला काँग्रेस,महिला शहर कांग्रेस, ओबीसी सेल काँग्रेस, किसान सेल काँग्रेस, एन. टी .काँग्रेस सेल, सेवादल काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे.

     

    तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व समस्त संचालक, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,संचालक, आदर्श खरेदी विक्री सह.सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक आणि काँग्रेस समर्पित ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनीही बहु संख्येनी यात्रेत आवर्जून सहभागी व्हावे. अशी विनंती तालुका कांग्रेस कमिटी मधील सर्व फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.