Tag: Chandrapur political corruption

  • Vaibhav Pimpalshende extortion case update । वाळूघाट बंद करण्याच्या धमक्या, २.४३ लाखांची खंडणी, वैभव पिंपळशेंडे वर खंडणीचा गुन्हा

    Vaibhav Pimpalshende extortion case update : चंद्रपूर ३ डिसेंबर (News३४) – वाळूचा उपसा, वाहतुकीच्या कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे नेते वैभव पिंपळशेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    निवडणूक : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    दोन दिवसांपूर्वी वैभव पिंपळशेंडे व शिवा कोरेवार यांच्यामधील संभाषणाची क्लिप चंद्रपूर जिल्ह्यात व्हायरल झाली होती, कोरेवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिली या आशयावर सदर क्लिप व्हायरल करण्यात आली मात्र खंडणी प्रकरणामुळे त्या संभाषणावर पडदा पडला आहे, वैभव पिंपळशेंडे यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    वाळूघाट बंद पाडण्याच्या धमक्या

    तालुक्यातील चेकवेळवाचा वाळूघाट लिलावात चंद्रपुरातील शिवकुमार शंकर कोरेवार यांना मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंपळशेंडे याने घाटातून वाळूचा उपसा, वाहतुकीच्या कामात अडथळे निर्माण करणे सुरू केले होते. घाट बंद पाडण्याच्या धमक्या त्याने शिवकुमार कोरेवार यांना दिल्या होत्या. पिंपळशेंडे यांच्या त्रासाला कंटाळून शिवकुमार कोरेवार यांनी ऑनलाइन पद्धतीने विविध तारखांना एकूण १ लाख ४३ हजार रुपये इतकी रक्कम दिली. Vaibhav Pimpalshende extortion case update

    याशिवाय वाळूघाटावर असलेल्या सुपरवायझरकडून एक लाख रुपये पिंपळशेंडे यांनी घेतल्याचे कोरेवार यांनी तक्रारीत म्हटले. आतापर्यंत वैभव पिंपळशेंडे याने २ लाख ४३ हजार रुपयाची खंडणी घेतल्याची माहिती फिर्यादीने रामनगर पोलिसांना आपल्या तक्रारीत दिली. तक्रार मिळताच चंद्रपूर रामनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले.याप्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलिसांकडून सुरू आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहाराची शहानिशा करण्यात येत आहे. या प्रकरणाची पोंभूर्णा तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.

  • विकास थांबला, तस्करी वाढली? आमदाराच्या मतदारसंघात ‘रेती व कोळसा राजा’ सक्रिय

    politician and sand mafia partnership

    politician and sand mafia partnership : चंद्रपूर: नैसर्गिक संपत्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष आहे. परंतु, जिल्ह्यातील एका आमदाराच्या कार्यशैलीवर गंभीर चर्चा सुरू आहेत.

    या आमदाराने विकास, बेरोजगारी, प्रदूषण आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आश्वासने दिली होती. याउलट, आता त्यांच्यावर ‘स्वार्थी राजकारण’, ‘दबावतंत्र’ आणि ‘माफियांशी आर्थिक संबंध’ अशा आरोपांची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    • रेती तस्करीला राजकीय छत्र?
      • जिल्ह्यात रेती तस्करीला या आमदाराचे राजकीय पाठबळ मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे.
      • शिवाय, या भागीदारीमुळे प्रशासनही संभ्रमात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
      • स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदारांवर कोळसा तस्करीतही ‘हात काळा’ असल्याचा आरोप केला आहे. परिणामी, राजकीय वातावरण तापले आहे.

    या आमदारांचे काही कोल माफिया, रेत माफिया आणि बडे उद्योगपतींशी ‘विशेष संबंध’ असल्याच्या चर्चांना राजकीय पातळीवर वेग आला आहे.

    हे वाचा – ५ वर्षांपासून पोलिसांच्या तावडीतून पसार चोर गुन्हे शाखेच्या हातात लागला, आणि झाला धक्कादायक खुलासा

    विरोधकांचे गंभीर आरोप: विकासकामे, कंत्राटे, वाढीव दर, टक्केवारी आणि प्रत्येक योजनेत ‘हिशेब’ मागितला जात असल्याचे विरोधक म्हणत आहेत.

    नागरिकांमध्ये नाराजी: जनप्रतिनिधींनी नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करायचे असते. मात्र, आमदारांच्या कथित भोंगळ कारभारामुळे याच संपत्तीची लूट होत आहे. या ‘दादागिरी’ करणाऱ्या आमदार महोदयांवर नागरिकांची नाराजी वाढू लागली आहे.

    ‘पारस’ची रेती तस्करीत दादागिरी वाढली!

    चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्करीचे प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे.

    • आमदारांचे पाठबळ, कार्यकर्त्याचा दबदबा: आमदार महोदयांच्या मूळ गावातील काही जुन्या कार्यकर्त्यांना रेती तस्करीसाठी राजकीय पाठबळ मिळत आहे.
    • त्यामुळेच संबंधित कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. गावात आता त्याची दादागिरी उघडपणे ऐकू येत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

    वर्धा नदीवर ताबा: या कार्यकर्त्याच्या गावातून वर्धा नदी वाहते. आणि तर, त्याने नदीवरील रेती उपसा आणि वाहतुकीवर पूर्ण ताबा मिळवल्याची कुजबुज गावभर सुरू आहे.

    स्थानिक नागरिकांचा आरोप: नदीला ‘पारस’ मानून तिची बेकायदेशीर लूट सुरू आहे. म्हणूनच या सर्व कारभारामागे “दादाचा राजकीय आशीर्वाद” असल्याची चर्चा वारंवार होत आहे.

    प्रशासनालाही आव्हान:

    • “दादाच्या भरोशावरच हा पारस दादागिरी करत आहे; प्रशासनालाही आव्हान देण्याइतका त्याचा आत्मविश्वास वाढला आहे,” असे गावात बोलले जात आहे.