Tag: शिवसेना ठाकरे गट

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

    चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

    News34 chandrapur

    गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि.(२८) गुरुवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्यानंतर तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात सरपंचा सह महिलांना मारहाण करण्यात आली. तारडाचे शिवसेना (उबाठाचे) सरपंच तरुण गंगाराम उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.

     

    गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करत रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

     

    स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टीच्चून रेती तस्करी केल्या जात आहे.जिल्हा प्रशासनाने रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची(३१) डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. मात्र अनेक घाटावर स्टॉक शिल्लक नव्हता मिळालेल्या परवानगीच्या आधारावर संधीचा फायदा घेत स्टॉक व्यतिरिक्त पुन्हा नदीपत्रातून रेती उपसा करने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.

     

    नदीपात्रात जेसीबी, हायवा, पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली.शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले.रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली असून हल्लेखोरांनी घटस्थळावरून पळ काढला.

     

     

    जखमींच्या बयानानुसार ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे, आरोपीना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

     

    या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सरपंच तरुण उमरे हे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहे व विशेष बाब म्हणजे पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्यासहित दोघांवर गुन्हे दाखल केले आहे, सदर प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

     

    याबाबत गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आरोपी स्वप्नील काशीकर हे सध्या पसार झाले आहे त्यांना पकडण्यासाठी पथक निघाले आहे, महत्वाची बाब म्हणजे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की ज्यावेळी हा वाद मारहाण झाली त्यावेळी मी तिथे नव्हतो याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे देखील आहे, मला या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    ठाणेदार राजगुरू यांना कदाचित काशीकर यांची लोकेशन मिळत नसेल अन्यथा पोलीस विभाग मोबाईल लोकेशन घेऊन सुद्धा आरोपीना अटक करतात, फक्त गोंडपीपरी पोलीस याला अपवाद ठरली आहे, जिल्ह्यात अवैध रेती माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे,  प्रशासनाच्या संमतीने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे, प्रशासनाची संमती असल्याशिवाय अवैध वाळू माफिया इतकी हिम्मत करु शकत नाही.

  • पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

     

    वेळवा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच सिमा निमसकार यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत वेळवा माल कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

     

    यावेळी सरपंच पदासाठी जितेंद्र मानकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमरदिप खोडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी जितेंद्र मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनियुक्त सरपंच यांनी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,गणेश वासलवार निलेश लोणारे यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र मानकर यांनी दिली आहे.

     

    यावेळी शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार ,नगरसेवक बालाजी मेश्राम,माजी सरपंच सीमा निमसकार, सदस्य अतुल जाधव, सुरेखा कुडमेथे, निता येरमे, ममता जाधव,रमेश कुडमेथे, समीर लोणारे, मुना लोणारे, वनवासू येरमे माजी सरपंच, मधुकर मेश्राम,विलास कामिडवार,अनिल निमसकार,भाऊजी कुडमेथे प्रशांत कावटवार,अनिल मडावी,सतीश लोणारे,विनोद खोब्रागडे,प्रशिक मानकरयांची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरात युवासेना (उबाठा) गटात युवकांची इनकमिंग सुरू

    चंद्रपुरात युवासेना (उबाठा) गटात युवकांची इनकमिंग सुरू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशात अन् राज्यात राजकारणात मोठी उलथापालथ होतांना कायमच आपल्याला दिसते.अशातच शिवसेना ऊबाठा गटातील नेतृत्वावर विश्वास ठेवत चंद्रपुरात युवकांची मोठी फळी युवासेनेत प्रवेश करतानाचे चित्र दिसत आहे.

    चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे विक्रांत सहारे यांनी घेताच त्यांनी युवकांची मोठी फळी चंद्रपुरात तयार केली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात विक्रांत सहारे हे पक्ष संघटन बांधणीत आगेकूच करीत आहे.

     

    आज दिनांक २५ डिसेंबर २०२३ शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे व प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेनेचे शिवा मिलिंद वझरकर, शाहबाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य युवकांनी युवासेनेत प्रवेश केला.

    येत्या काळात चंद्रपुरात शिवसेनेच्या उबाठा गटाला युवकांच्या माध्यमातून बळ मिळतांना नक्कीच दिसेल.

  • आक्रमक शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा असाही संवेदनशीलपणा

    आक्रमक शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा असाही संवेदनशीलपणा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 17 डिसेंम्बर ला चंद्रपुरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यासाठी पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

     

    मात्र या मेळाव्यापुर्वी एक दुःखद घटना घडली, मेळाव्याला येताना संजय नगर येथे राहणारा युवासेनेचा कार्यकर्ता 29 वर्षीय रवि निषाद चा अपघात झाला, या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    18 डिसेंम्बरला ही बाब आमदार भास्कर जाधव यांना कळली असता त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत रवि निषाद च्या तब्येतीची विचारपूस केली, त्यावेळी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, रवि च्या उपचारात हलगर्जीपणा नको असे सांगत स्वतः रवि ला 25 हजार रुपयांची रोख रक्कम देत मदत केली, पुन्हा काही मदत लागल्यास सांगा व आपली काळजी घ्या असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. रवीला सध्या नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आमदार जाधव यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचा कार्यकर्त्यांप्रति असलेला संवेदनशीलपणा पुढे आलेला आहे.
    भाषणात आक्रमक असलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी दाखविलेला संवेदणशिलपणाची शिवसैनिकात जोरदार चर्चा रंगली होती.

  • चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

    चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरात 17 डिसेंम्बरला शिवसेनेचे पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव पक्षाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले.

     

    गडचिरोली दौरा आटोपताच सायंकाळी जाधव चंद्रपुरात पोहचले, शहरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याला जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना-भाजप युतीचा इतिहास सांगितला, वर्ष 86-87 मध्ये जेव्हा युती झाली त्यावेळी भाजपला राज्यात कुणी ओळखत नव्हतं त्यासाठी शिवसैनिक राबला, आज भाजप दिल्लीच्या तखतवर बसला आहे ते फक्त शिवसेनेमुळे, शिवसैनिक नसता तर राज्यात तुमची बिकट परिस्थिती असती मात्र भाजपने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी-कांग्रेस पक्षासोबत युती करीत सत्ता स्थापन केली पण आपल्या गद्दारानी भाजप सोबत जात ठाकरे साहेबांना धक्का दिला, ते म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादि व कांग्रेस सोबत गेलात म्हणून आम्ही वेगळे झालो मात्र अडीच वर्षे मंत्रिपद घेताना या गद्दाराना लाज वाटली नाही.

     

    कार्यक्रमापूर्वी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या भव्य बाईक रॅली ने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले, सदर बाईक रॅली शहराचे भ्रमण करीत मातोश्री विद्यालयात कार्यक्रम स्थळी दाखल झाली.

     

    आयोजित कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, युवासेना सरचिटणीस रोहिणी पाटील, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हाप्रमुख उज्वला नलगे, प्रमोद पाटील, सुरेश पचारे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

  • त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

    त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

    News34 chandrapur

    भद्रावती : माणुसकीला धर्म जात नसते आणि सेवेला भिंती नसतात, आलेल्या प्रत्येक रंजल्या गांजलेल्या मदत करणे हाच खरा धर्म समजून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविंद्र शिंदे वरोरा विधानसभा क्षेत्रात काम करीत आहेत. रविंद्र शिंदे यांच्या राजकारणाची दिशा व मार्ग हा प्रचलित नसून वेगळा आहे. त्यांचे राजकारण हे सेवाधर्म व मदतकार्य यास प्राथमिकता देवून सुरू आहे. एक चांगला आदर्श ते त्यांच्या कार्यातून समाजाला देत आहे.

     

    अशीच एक घटना नुकतीच पाहायला मिळाली. स्थानिक डोलारा येथील चंडिका वार्ड मधे राहणारी गृहिणी अमरीन इकबाल शेख यांचा तीन महिन्याचा मुलगा मोहत्र हसनैन इकबाल शेख याच्या ह्रुदयात छिद्र आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. उपचाराकरीता पैशांची गरज आहे. मात्र तेव्हढी आर्थिक तयारी कुटुंबाची नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेकडे अमरीन शेख यांनी पत्र देवून सहकार्याची अपेक्षा केली. परिस्थिती जाणून घेवून तात्काळ रविंद्र शिंदे यांनी बाळाला रुग्णालयात नियमित ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. नागपूर येथे बाळावर उपचार सुरू आहे. त्यानुसार आता दररोज त्या बाळाला रुग्णालयात ने-आण करण्याची जवाबदारी शिवसेनेने घेतली आहे.

     

    शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुषमा शिंदे तसेच शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल याप्रसंगी उपस्थित होते.

     

    चिमुकल्या हसनैन यांचे उपचार होतपावेतो दर महिण्याला निशुल्क रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याचे वचन विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी रूग्णाचा पालकांना यावेळी दिले.

  • चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले

    चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली.

    महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले होते. या वेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक व नंतर धक्काबुक्की झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मिलिंद दोडके या पोलीस कर्मचाऱ्याला देखील झटापटीत धक्काबुक्की झाली.

     

    पोलिसांनी प्रतिमा ठाकूर आणि स्वप्नील काशीकर यांच्यासह दोन्ही गटाच्या ८ लोकांवर ३५३ (शासकीय कामात अडथळा आणणे) चा गुन्हा दाखल केलाय. सोबतच दोन्ही गटांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी २९४, ५०६ आणि ३२३ (शिवीगाळ, धमकी देणे आणि धक्काबुक्की करणे) चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

     

    विशेष म्हणजे तक्रार देण्यासाठी उभे असलेले काशीकर यांच्यावर पोलीस ठाण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अचानक झालेला हा हल्ला सोडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता पोलिसांवर सुद्धा हात उगारण्याचा प्रयत्न झाला.

     

    चंद्रपुरात दिवसेंदिवस राजकीय गुंड प्रवृत्ती फोफावत चालली असून पोलिसांनी आतातरी या वृत्तीवर लगाम घालावा अन्यथाया भविष्यात मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही, जेव्हा पोलीस ठाण्यात हल्ला होतो तेव्हा कुठेतरी कायद्याची वचक तर कमी झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.

     

    सध्यातरी पोलिसांनी प्रकरण शांत केले मात्र ही वृत्ती एकदिवस मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्कीच.

  • चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

    चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

    विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्याकडून देण्यात आला होता.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टीत बाधितचा अहवाल देऊन ही. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.२ लाखच्या वरील हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते.

     

     

    अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजूर करावे. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आला.यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांतभाऊ सहारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव , उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक माजी महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील , तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले ,तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार ,तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वलाताई नलगे, युवतीसेना जिल्हाधिकारी सौ रोहिणीताई पाटील, विनयभाऊ धोबे, सुमितभाऊ अग्रवाल, हेमराज बावणे, बाळूभाऊ भगत, बाबा साहू, राहुलभाऊ वीरूटकर, विकासभाऊ वीरूटकर, सिक्किभाई खान ,महेशभाऊ खंगार, रिझवानभाई पाठव, शहाबाज शेख, शिवा वझरकर , वैभव काळे गिरीशभाऊ कटारे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना असंख्य प्रमाणात उपस्थित होते

  • चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

    चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात विविध उद्योगांचे जाळे पसरले आहे, मात्र अनेक उद्योगात स्थानिक कामगार नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे.

     

    वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी येथे ओव्हरबर्डन काढण्याच्या कामाचं कंत्राट दक्षिण भारतातील कावेरी कंपनीला मिळाले आहे, मात्र या कंपनीने बाहेरून कामगार आणल्याने स्थानिक कामगारांना काम देण्यास कावेरी प्रबंधन टाळाटाळ करीत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कंपनी प्रशासनाला स्थानिक कामगारांना कामावर घ्या असे सुचविले मात्र त्यांच्या या मागणीवर कंपनीने दुर्लक्ष केले.

     

    कावेरी कंपनीच्या विरोधात 11 डिसेंबर 2023 ला कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेना आंदोलन करणार आहे.

    परप्रांतीय कामगारांना कावेरी कंपनीने कामावर घेतले, मात्र त्यांचं कसल्याही प्रकारचे पोलीस व्हेरिफिकेशन, कामगारांची नोंदणी, उत्खनन साठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्यात आली नसून ते बेकायदेशीर पणे वेकोलीच्या क्षेत्रात चालत आहे.

     

    या सर्व बेकायदेशीर कृत्याचा विरोध व स्थानिक कामगारांवर अन्याय करणाऱ्या कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून 11 डिसेंबर ला कंपनी प्रबंधन विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, आंदोलनाबाबत संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली आहे.

     

    सदर आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या आंदोलनात शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

    मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

    News34 chandrapur

    मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता रामायण वाचली असून ते नवे हिंदू बनले आहे, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभीषण म्हटले, मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण आहे पण ते सत्यासोबत उभे आहे, उद्धव ठाकरे हे राज्याचे रावण आहे, ते नेहमी अहंकारात असतात.

     

    राऊत यांनी 2019 मध्ये रामायण वाचली असती तर उद्धव ठाकरे यांना त्यांचे खरे पात्र सांगू शकले असते अशी घनघणाती टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांनी वर्ष 2023 मध्ये रामायणाचे पठण केले, आणि आता ते ज्ञान पाजळत फिरत आहे, आता तरी संजय राऊत यांनी आपली फालतूची पोपटगीरी बंद करावी कारण मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण असल्याचा आम्हाला गर्व आहे.