Tag: राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार

  • राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

    राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

    Marathi news

    चंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षणमुखानंद सभागृह येथे प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महिला निर्धार मेळावा आयोजित केला आहे.

     

    सदर मेळाव्यात मा. अजितदादा पवार साहेब, प्रफुल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण मंत्री व जेष्ठ नेते उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

     

    या मेळाव्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चना ताई बुटले तथा शहर जिल्हाध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात मुंबई करिता रवाना झाल्या आहे.

     

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत मुंबई जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दाखवून बसेस मुंबई करिता रवाना करण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चनाताई बुटले, शहर कार्याध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

  • भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा

    भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा

    News34 chandrapur

    भद्रावती:- बरांज मोकासा येथील गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांसह कामगाराच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा बरांज येथील महिलांनी १४ डिसेंबर पासून घेतला असुन आंदोलनाची प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही असा आंदोलनकारी महिलांनी आरोप करीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

     

    याबाबतची तक्रार महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभाध्यक्ष विलास नेरकर यांना दिली असता नेरकर यांनी भद्रवती चे तहसीलदार यांचेशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासकिय हालचालींना वेग आला. तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेशी चर्चा करण्यासाठी प्रकल्पग्रस्त महिलांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणत्याही स्वरूपाचा ठोस निर्णय न देता उपाययोजने बाबत देखील चर्चा न झाल्याने प्रकल्पग्रस्त महिलांनी आमरण उपोषण सुरू ठेवलेले आहेत.

     

    महिलांच्या आंदोलनाचा आजचा २८ वा दिवस सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना माहिती देण्यात आली तेव्हा लगेच आंदोलन करण्याऱ्या महिलांच्या मंडपाला भेट देउन मागण्यांबद्दल जाणून घेतले. यावेळी वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुकाध्यक्ष राजू बोरकर, शहराध्यक्ष गीतेश सातपुते, तिमोटी बंडावार, रोशन फुलझेले, गणेश बावणे यांचेसह इतर कार्यकर्त उपस्थित होते.

     

    आंदोलन कर्त्यां महिलांनी बरांज गावात जाऊन बघा असे सांगितल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी गावाची पाहणी केली असता पहिली ते सातवी पर्यंतच्या जिल्हापरिषद शाळेत जाऊन बघितले असता अक्षरशः शाळेला लागूनच १५ फुटावर कोलमईन्सचा खोल दरी दिसून आली. उत्खनन केलेल्या खदानीला कंपनीतर्फे कोणत्याही पद्धतिने संरक्षित केलेले नसल्याने जीवित हानी देखील होऊ शकते. पुनर्वसन्नाच्या च्या संबंधाने सुरुवातीला करण्यात आलेल्या करारातील प्रमुख मुद्यांना कंपनीतर्फे केराची टोपली दाखविण्यात आली. अनेकांना जमीनींचा, घराचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याने काही कुटुंब तेथेच राहत आहे.

     

    कंपनीतर्फे होणार्या ब्लास्टिंग मुळे बऱ्याच घरांना भेगा पडलेल्या आहे. रोजगारा संबंधाने केलेले करार सुद्धा कंपनीने पाळले नसल्याने गावात बेरोजगारांची संख्या देखील मोठी असल्याचे आंदोलनकारी महिलांनी निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करीत आपल्यावर झालेला अन्याय तथा आंदोलनाच्या संबंधातील रास्त मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडून यांच्या माध्यमातुन सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांनी आंदोलक महिला तथा गाववासियांना दिले.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- 7 जानेवारीला चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी व बूथ आढावा बैठक महेश भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करणे व पक्षाचा विस्तार करुन बूथनिहाय बांधणी करणे यासंदर्भात चर्चा करून जिल्हयातील आढावा घेण्यात आला.

     

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या व विकासाच्या मुद्द्यावर कार्य करीत आहे. राज्याचे उमुख्यमंत्री मंत्री ना.श्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.श्री प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे हे आपण सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन लवकरात लवकर प्रत्येक बूथ वर कमिट्या तयार कराव्यात. यात सर्व घटकाचा समावेश करून प्रामुख्याने युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. पक्ष संघटन मजबूत असेल तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा पक्ष लढवेल याची ग्वाही माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली. पक्षाची वाढ व विस्तार करण्यासाठी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते जिल्हयातील युवक, विद्यार्थी, महिला, ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभागाच्या काही तालुकानिहाय नियुक्ती पत्र देण्यात आले.

     

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले असुन आबिद अली, रंजना पारशिवे, राकेश सोमानी, विलास नेरकर, महेंद्रसिंग चंदेल, अविनाश राऊत, मंगेश पोटवार, विनोद नवघडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     

    यावेळी राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, गोंदिया रायुकाँ जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, प्रदेश सचिव आबिद अली, नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल, महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, जेष्ठ नेते मनोहर काच्छेला, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अर्चना बुटले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश राऊत, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, वैद्यकीय मदत जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, महिला शहर अध्यक्षा चारुशीला बारसागडे, हेमांगीनी विश्वास, राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राज्य संघटक अमोल बावणे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी उपसभापती हर्षवर्धन पिपरे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष नौशाद शेख, चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, बल्लारपूर तालुकाध्यक्ष महादेव देवतळे, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष दरेकर, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत, सिंदेवाही तालुकाध्यक्ष दामोदर ननावार, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष नोगेश बगमारे, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, चिमूर तालुकाध्यक्ष योगेश ठूने, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, भद्रावती तालुका अध्यक्ष राजू बोरकर, कोरपणा तालुका अध्यक्ष धनराज जिवणे, कार्याध्यक्ष तनवीर शेख, कुतुब सिटी, आकाश येसनकर, गीतेश सातपुते, चंद्रकांत कुंभरे, रवी डीकोंडा, सलीम पठाण, जहीर खान, नासिर शेख, प्रशांत घुमे, ओमकार गेडाम, अश्विन उपासे, ऍड मंगेश काळे उपस्थित होते.

  • राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.

     

    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी पत्रकार गणेश यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    जोगी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांनी शिष्टमंडळासहित पोलीस अधिक्षकांची भेट घेतली, यावेळी घडलेला सर्व प्रकार लोंढे यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितला, कारवाई होणार असे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी दिले.

     

    जर जोगी यांच्यावर कारवाई झाली नाही तर सत्तेचा माज असलेल्या नेत्याविरोधात ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक होत एकजुटतेने याविरोधात आंदोलन करणार असा इशारा सोलापन यांनी यावेळी दिला.

  • चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्याला आला सत्तेचा माज, पत्रकाराला केली मारहाण

    चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्याला आला सत्तेचा माज, पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    गडचांदूर :- गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस{AP}चे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.
    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी अगोदरच राजुरा येथील काही पत्रकार बसून होते.

     

    पत्रकार गणेश, यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    मोबाईल फुटल्यामुळे जवळपास 20 हजाराचे नुकसान सुद्धा झाले.!प्रतिक्रिया देण्याच्या बहाण्याने बोलावून अशाप्रकारे मारहाण करतील याची पूसटशीही कल्पना गणेश यांना नव्हती. यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत शरद जोगीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.शरद जोगीवर यापुर्वी सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे कळते? त्याच्या विरोधात कोणी जर बातमी टाकली तर तो,त्याने महिनेवारी पद्धतीने पोसलेल्या काही तथाकथित पत्रकारांना बोलावून आपल्या मनाप्रमाणे उलट बातम्या लावायला सांगतो,हे मात्र विशेष.!

     

    शरद जोगीवर गुन्हे दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, सत्तेच्या जोरावर पत्रकारांना मारहाण म्हणजे ही लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची एकप्रकारे केलेली हत्या आहे, आणि या वृत्तीला समर्थन करणारे सुद्धा दोषी आहे, गरज पडली तर आम्ही जोगी विरोधात आंदोलन करीत पत्रकारांची ताकद दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी दिली आहे.

  • तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.

     

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झालेले माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला, मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रपुरातील 2 पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले असून त्याचा आपल्या पक्षावर परिणाम पडला का या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दोन्ही पदाधिकारी नितीन भटारकर व राजीव कक्कड यांच्यावर मिश्किल टोला लगावत दोघांनी स्वतः मनपा निवडणुकीच्या मैदानात उभे रहावं, जनता तुमचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही, असे न झाल्यास मी जे बोललो ते खोटं असं समजावे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून अजित पवारांनी काढता पाय घेत वेगळा गट स्थापन करून ते शिंदे-भाजप सरकारमध्ये गेले, त्यानंतर चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत त्यामध्ये सामील झाले होते.

     

    अनिल देशमुख यांच्या आव्हानाला उत्तर देत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, अनिल देशमुख हे जेष्ठ नेते आहे त्यांचा आम्ही आदर करतो, आम्ही जर निष्क्रिय असतो तर पक्षातील 90 टक्के कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा नसता, आपण राज्याचे जरी नेते असले तर स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील नगर परिषदेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा फडकविण्यास अयशस्वी का ठरले? त्याचं कधी चिंतन केलं का? विशेष म्हणजे मंत्री असताना सुद्धा कधी नागपूर जिल्हा परिषद व नगर परिषदेवर ते अयशस्वी का ठरले याबाबत त्यांनी आधी विचार करावा.

     

    आम्ही मनपा निवडणूक लढावी असा त्यांचा आग्रह आहे, याआधी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे चंद्रपुरातील राजकारण सांभाळायला आम्ही सक्षम आहो.

  • राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

    राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कार्य करणारे चंद्रपूर महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटात नुकतेच सामील झालेले राजीव कक्कड हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रियपणे काम करीत आहे.

     

    शहरातील विविध समस्यांना वाचा फोडत ते शासन दरबारी मांडण्याचे काम कक्कड यांनी केले आहे, जिल्हा असो की शहरातील विविध नियोजनात्मक कामाचा त्यांना चांगला अनुभव असून आता ते जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची धुरा सांभाळणार आहे.

     

    राजीव कक्कड यांच्या नियुक्तीमुळे मित्र परिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करीत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

  • चंद्रपूर शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील मुख्य रसत्यावर विविध ठिकाणी वाहन कायमचे उभे ठेवून वाहतूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार, कायदा भंग करणाऱ्या व्यक्ति विरूद्ध मोटर वाहन अधिनियमांच्या तरतूदींसह भारतीय दंड संहितेच्या कलम 283 अंतर्गत सुद्धा कारवाई होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

     

    चंद्रपूर शहरात प्रशासना कडून वाहतूक नियंत्रण व सुव्यवस्था कायम ठेवन्याकरिता बरेच प्रयत्न करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रशासन द्वारे मुख्य मार्गाच्या दोनही बाजूला फुटपाथचे निर्माण, मार्गाच्या दोनही बाजूला पांढऱ्या रेशाने पार्किंगची जागा निश्चित करून वाहनांची रहदारी करिता रोड मोकळे करून देण्यात आले होते.

     

    परंतु मागिल काही महिन्यापासून असे दिसून येत आहे की बरेच ठिकाणी फुटपाथ आणि पार्किंगच्या जागेवर कायमचे वाहन उभे ठेवून काही बेजबाबदार व कायदा भंग करणारे समृद्ध लोक / व्यवसायिक लोकांनी अतिक्रमण करून घेतले आहे आणि त्यामुळे मुख्य मार्ग असो किंवा गल्ली असो सर्व ठिकाणी वाहतूकीत इतक्या मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होउ लागला आहे की ज्यावरून शहरातील व चंद्रपूर शहराच्या बाहेर जाणान्या मुख्य मार्गांवर सुद्धा दिवसभर ट्रैफिक जाम ची दशा कायम दिसत राहते.

     

    नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मुख्यमार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड आणि महात्मा गांधी रोड हया मेन रोड वर दोनही बाजूला प्राईवेट बस मालकांनी, टॅक्सी धारकांनी, वाहन शोरूम मालकांनी, वाहन रिसेल कारणारे व्यवसायिकांनी मोठे व्यवसायिक कॉम्पलेक्स मधे व्यवसाय करणारे गाळे धारकांनी, मेन रोड वर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका द्वारा चंद्रपूर शहरात रोड वर मार्किंग करून दिलेल्या पांढऱ्या रेशांच्या बाहेर आपली वाहने उभे ठेवून वाहतूकित अडथळा निर्माण केला आहे.

     

    ज्यामुळे दिवसात सर्वसामान्य जनतेला रोड वर आपली वाहन चालविणे अवघड झाले आहे. इतकेच नव्हेतर जाम ची कायम स्थिति उदभवत असल्याने पायदळ जाणारे लोक सुद्धा त्रास भोगत आहे. अनेक ठिकाणी अव्यवस्थित पार्किंग असल्याने दररोज दूर्घटना होत आहे त्यात जीवहानि होण्याचे सुद्धा अनेक प्रसंग निर्माण झाले आहे.

     

    हा गंभीर विषय आहे. सर्व सामान्य जनता आपले वाहन घेउन आता मुख्य मार्ग असो किंवा चंद्रपूर शहरच्या बाहेर जाणारे महामार्ग असो त्यावर आपले दुचाकी व चारचाकी वाहन चालवितांना घाबरतात कारण त्यांच्या वाहनांच्या येण्या-जाण्याचे मार्गच उरले आहे. सर्व ठिकाणी काही खास लोक आपले वाहन दिवसरात्र अव्यस्थितपणे लावून रोडचे त्यांनी कायमचे अतिक्रमण करून घेतले आहे. याबाबत अनेकांनी तक्रार केली आहे की नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड, मेन रोड हया मार्गावर बरेच लोक आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवतात आणि त्यांचा विरोध केल्यावर ते शिवीगाळ करून वाहतूक व्यवस्थेत आम्ही अडथळा निर्माण केल्यावरही आमच्या विरूद्ध प्रशासन काहीच करू शकत नाही अशी धमकी देण्याचे स्तरावर गेले आहे.

     

    सर्व सामान्य जनता त्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना जाब देण्याऐवजी आपला त्रास स्वतः भोगून शांत निघून जाते परंतू कधी कधी आपसात मारामारीची परिस्थिति निर्माण होते ज्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.

    या परिस्थितीतून कायमची मुक्तता मिळण्याकरिता आपल्या मार्फत अधिकाऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले असेल परंतू स्थिति मधे काहीही सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या कडे शासनाने कायदा व सुव्यवस्था लागू करण्याची जबाबदारी दिली आहे आणि कायद्यात मोटर वाहन अधिनियम अंतर्गत दंड व सक्तीचे प्रयोजन, रोड वर अतिक्रमण केल्यास दंड व सक्तीचे प्रयोजन सह वाहन जप्ती करण्याचे सुद्धा अधिकार दिले आहे तर त्याचे योग्यपणे वापर होणे गरजेचे आहे.

     

    तसेच वारंवार सूचना देउन सुद्धा जसे मुख्यमार्ग आणि महामार्ग वर अव्यवस्थितपणे वाहन लावून अडथळा निमार्ण करणाऱ्या किंवा मुख्यमार्ग व महामार्ग वर मनपाकडून पांढया रंगाने चिन्हित करून दिलेल्या पार्किंग झोनच्या बाहेर दिवसरात्र आपले वाहन कायमचं
    उभे ठेवणाऱ्या लोकांविरूद्ध सक्तीची कारवाई करण्याकरिता भारतीय दंड संहितेच्या कलम 283 मधे सुद्धा आपणास असे अधिकार देण्यात आले आहे की ज्यावरून आपण सार्वजनिक मुख्य मार्ग, महामार्ग वर अतिक्रमण करणाऱ्या लोकांविरुद्ध जप्तीची कारवाई करू शकतात.

    तरी सर्व सामान्य जनतेचा हा प्रश्न आम्ही आपल्या समक्ष ठेवून आपणास विनंती करू इच्छितो की आपण चंद्रपूर शहर च्या सर्व मुख्य रस्त्यांवर आपली वाहने अव्यस्थितपणे किंवा दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणारे लोका विरूद्ध 7 दिवसात कडक मोहीम राबवून त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 283 अंतर्गत कारवाई करत त्यांचे वाहन जप्तीची कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून प्रशासनाने सामान्य लोकांच्या येण्या-जाण्याकरिता उपलब्ध करून दिलेल्या सार्वजनिक रोड वर आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणाऱ्या लोकांमधे नियमांची व कायद्याची धाक बसेल आणि आपल्या शहरात वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत थोडी फार सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

     

    ह्या विषयाचे स्मरणपत्र दिनांक 27 ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक ह्यांना देण्यात आले, ह्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि ह्या विषयावर एक अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाल्याचे चर्चे दरम्यान सांगण्यात आले व येत्या काही दिवसात ह्या वाहूतुक अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने कडक कायदा करण्याचा अध्यादेश काढण्यात येईल व मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांना देण्यात आले.

     

    निवेदन सादर करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, संभाजी खेवले, राहुल वाघ तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष प्रगतीचा आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने बांधणी बाबत झालेल्या प्रगतीचा आढावा सादर करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या व विकास कामांबाबत आणलेल्ले निवेदने मंत्री महोदयांना देत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे किवा बैठक लावावी अशी मागणी केली.

     

    जिल्ह्यातील कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्त, वन्यप्राण्यांमुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, जिवती तालुक्यातील वन कायद्यामुळे विकास कामावर झालेला परिणाम, आदिवासी व मागासवर्गीय समाजातील घरकुल बांधकाम रखडल्या बाबत, ग्रामीण भागातील रस्ते व इतर रखडलेल्या विकास कामाबद्दलचे निवेदने मंत्रिमहोदयानी स्विकारत स्थानिक प्रश्न जिल्हास्तरावर सोडवू व इतर प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्याकडे बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी हमी दिली.

     

    यावेळी काही पदाधिकार्यांच्या नामदार आत्राम यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या. चंद्रपूर, मुल व घुग्गुस येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार असुन पक्षातर्फे ताकत देण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही धर्मराव आत्राम यांनी उपस्थितांना दिली. गोंदिया जिल्हयाच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मा. धर्मराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला.

     

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सहसचिव आबीदजी अली, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, कार्याध्यक्ष तणवीर शेख, भद्रावती शहर अध्यक्ष गितेश सातपुते, हर्षवर्धन पिपरे, रकीब शेख, रवि डिकोंडा, आकाश येसणकर, चंद्रकांत कुंभारे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नौशाद शेख उपस्थित होते.

     

    तसेच पदाधिकारी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, तिमोती बंडावार, माजी सरपंच अमोल ठाकरे, माजी नगरसेवक कुतुबुद्दीन सिटी, दिपक तुरारे, रोशन फुलझेले, समीर शेख, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, किसन झाडे, सुजित कावळे, महेंद्र बाग, योहान इरगुराला, गणेश तामटकर, प्रदीप लांडगे, संजय खेवले, भोजराज शर्मा, प्रशांत झांबरे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, ईश्वर बट्टे, रणजित ठाकूर, पियुष चांदेकर, अमर गोमासे, रोशन ढवळे, मनोज सोनी, राहुल देवतळे, पंकज जाधव, सिहल नगराळे, पवन बंडीवार, राजकुमार खोब्रागडे, सनी शर्मा, निलेश टोंगे, आसिफ शेख, राहुल भगत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  • शरद पवार गटातील राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी अजीत दादा गटात

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक ०८ ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा सभेच्या निमित्ताने राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणी व कार्याचा आढावा घेण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

     

    यामध्ये तालुका व विधानसभा निहायपदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्याला हातभार लावीत पक्ष बांधणीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा हे मार्गदर्शन केले.

     

    या जिल्हा आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोमानी यांनी उपस्थिती दर्शवीत खासदार प्रफुल पटेल व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेंशी समन्वय साधत पक्षाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.

     

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये जाऊन युवक संघटना बांधणी केली. आता त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आजपासुन अजित दादा यांच्या नेतृत्वात काम करण्याचे जाहीर केले. यामुळे सर्वच पदाधिकारी आम्हच्या सोबत आहे हे ओरड करणाऱ्यां शरद पवार गटातील नेत्यांची थोडक्यात पंचाईत झाली.

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या सभेला प्रदेश सहसचिव आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी अध्यक्ष सुजित उपरे, सुनील काळे, विलास नेरकर, महेंद्र चंडेल, शरद जोगी, अविनाश राऊत, अरविंद रेवतकर यांचेसह मोठ्या संख्येंने जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.