Tag: रस्ता रोको आंदोलन

  • Aap Chandrapur : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे रस्ता रोको आंदोलन

    Aap Chandrapur : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर-बायपास मार्गावरील जीवघेणा रेल्वे ओवरब्रिज वर टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने काम न केल्याने आज 20 फेब्रुवारीला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. Chandrapur district

     

    आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

     

    चंद्रपूर-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वर्ष 2023 ला भीषण अपघात झाला होता त्या अपघातामध्ये 4 नागरिकांचा बळी गेला, त्या ओवरब्रिज वर काम करण्याची परवानगी वर्ष 2021 ला मिळाली होती, मात्र प्रशासनाने ते काम केलं नाही, विशेष बाब म्हणजे सदर पुलाचे काम टोल कंपनीला करायचे होते, मात्र काम न करता टोल कंपनीने अस्तित्वात नसलेल्या पुलाची टोल वसुली सुरू केली. Road block movement

     

    याविरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी विरुद्ध आम आदमी पार्टीतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
    परिस्थिती चिघळत असताना पोलिसांनी आंदोलकांना डिटेन केले. Aam Aadmi Party

     

    यावेळी आंदोलक राजू कुडे यांनी सांगितले की प्रशासनाने आमचे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, आज झालेलं रस्ता रोको ही सुरुवात आहे, यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन व त्यानंतर टोल कंपनी विरोधात आंदोलन उभारणार अशी माहिती दिली.

    आंदोलनात आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सुनील मुसळे व आप च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा जवळील बायपास रोड पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताच्या प्रत्युत्तरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या अपघातात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, आता आप पीडितांना न्याय देण्याची मागणी करत आहे. Aam Aadmi Party

     

     

    वर्षभरापूर्वी बायपास रोडवर दुसरा पूल बांधण्यासाठी रेल्वे विभागाने टोल कंपनीला परवानगी दिली होती. मात्र, वेळ उलटूनही पुलाचे काम अपूर्णच आहे. प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी, अस्तित्वात नसलेल्या पुलासाठी टोलवसुली आधीच सुरू झाली आहे. Road stop movement

     

     

    या रस्त्यावर घडलेला अपघात हा टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेल्या निष्काळजीपणाचा स्पष्ट परिणाम आहे. चार निष्पाप जीव गमावले, आणि जबाबदार असलेल्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले जाणे अत्यावश्यक आहे. युवक जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ने टोल कंपनी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. Demand justice

     

     

    आप ने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा उद्देश या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी आहे. संबंधित नागरिकांना एकत्र आणून आणि टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल जागरुकता वाढवून, AAP अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यासाठी दबाव आणेल अशी आशा करते. Negligence

     

     

    अपूर्ण पूल बांधकाम आणि अस्तित्वात नसलेल्या पुलासाठी टोलवसुली सुरू करणे ही गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराची स्पष्ट उदाहरणे आहेत. न दिलेल्या सेवेसाठी नागरिकांना पैसे देण्यास भाग पाडले जात आहे, हे अस्वीकार्य आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आम आदमी पार्टीची मागणी हे न्याय मिळवण्याच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे. Tragic accident

     

     

    अष्टभुजाजवळील बायपास रोडवर घडलेल्या अपघातासारखा दु:खद अपघात हा जनतेच्या सुरक्षेला आणि हिताला प्राधान्य देण्यासाठी अधिकाऱ्यांना जागृत करणारा आहे. निष्पाप जीव गमावणे हे हलके घेतले जाऊ नये आणि अशा अपघातांना जबाबदार असलेल्यांना त्यांच्या निष्काळजीपणाचे परिणाम भोगावे लागतील.

     

     

    AAP ने आयोजित केलेले रस्ता रोको आंदोलन हे नागरिकांसाठी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. समोरच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करतात याची खात्री करण्याचा हा एक शांत पण शक्तिशाली मार्ग आहे.
    आंदोलनात सामील होऊन एकजुटीने उभे राहून चंद्रपूरचे नागरिक टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कडक संदेश देऊ शकतात. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडून पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याची वेळ आली आहे. शिवाय, अस्तित्वात नसलेल्या पुलाची टोलवसुली त्वरित थांबवली पाहिजे.

     

     

    अष्टभुजाजवळ झालेल्या या भीषण अपघाताचा समाजावर कायमचा परिणाम झाला आहे. दोषी सदोष हत्या प्रकरणाची AAP ची मागणी गांभीर्याने आणि सखोल चौकशी करणे महत्वाचे आहे. न्याय मिळालाच पाहिजे आणि अपघाताला जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे.

     

     

    ‘आप’ने 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन हे नागरिकांसाठी एकत्र येण्याची आणि पीडितांना न्याय मागण्याची संधी आहे. हे कृतीचे आवाहन आहे आणि स्मरणपत्र आहे की जनतेच्या सुरक्षिततेशी आणि कल्याणाशी कधीही तडजोड केली जाऊ नये. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल जबाबदार धरले पाहिजे आणि भविष्यात असे दुर्दैवी अपघात होऊ नयेत यासाठी पावले उचलली पाहिजेत.

     

    अपघातग्रस्त या बायपास मार्गावर सर्व्हिस रोड नाही, जवळच स्मशान भूमी आहे, त्याठिकाणी प्रेत नेताना होणारी गर्दी भविष्यात मोठा अपघात त्या मार्गावर टाळता येणार नाही, याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व WCBTRL टोल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे – राजू कुडे युवा जिल्हाध्यक्ष, आप

  • Independent Vidarbha : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे रस्ता रोको आंदोलन

    Independent Vidarbha : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    गोंडपीपरी – विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज 8 फेब्रुवारीला महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, सदर आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. Independent vidarbha

     

    गुरुवारी दुपारी गोंडपीपरी तालुक्यातील पोळसा पुलावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर माजी आमदार वामनराव चटप व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन विविध मागण्यांसाठी केले.

     

     

    या आंदोलनात प्रमुख मागण्या स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, विजेची दरवाढ तात्काळ राज्यशासनाने मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसा लोडशेडिंग बंद करावी, विदर्भात येणारे 2 औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाच्या बाहेर न्यावे, वैधानिक विकास महामंडळ नको विदर्भ राज्य हवे, अन्न धान्यावरील GST रद्द करावी, बल्लारपूर-सुरजागड रेल्वे मार्गाला मंजुरी देत निधी उपलब्ध करावा अश्या विविध मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने रस्ता रोको आंदोलन केले.

  • शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

    News34 chandrapur

    वरोरा :- राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन हातात आलेले सोयाबीन गेले कापसाला भाव नाही आणि सरकारची मदत सुद्धा नाही.

     

    त्यामुळं शेतकरी गळ्याला फास लावण्याच्या स्थितीत पोहचले आहे. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली होती त्यापासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपर्यंत केली नाही, त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि आता अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान जाहीर करून सुद्धा ते पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दिनांक 12 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टेमुर्डा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

     

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सन 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते, परंतु त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळी झाली नव्हती, त्यामुळे या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांनी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.

     

    दरम्यान कर्जमाफी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करू व त्यांच्या खात्यात पैसे टाकू अशी घोषणा केली होती परंतु आता हिवाळी अधिवेशनात कुठलाही आमदार शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर गंभीर नसल्याने व
    यावर्षी झालेली अतिवृष्टी व पूरबुडाई व पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहचावा व ह्या शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारला जाग यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन येत्या मंगळवार नागपूर चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथे रास्तारोको आंदोलनं करण्यात आले.

     

    या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, संजय रेड्डी, विशाल देठे, राम पाचभाई, रेवती इंगोले, मोहित हिवरकर, प्रशांत बदकी, संजय काटकर, गजू वादाफाळे, मनोज गाठले, राजेंद्र धाबेकर, युगल ठेंगे, धनराज बाटबरवे, सुनील पाझारे, प्रतीक मुडे, महेंद्र गारघाटे, रामा डुकसे, अशोक दाते, भदुजी गिरसावळे. सुधाकर ठाकरे,गुलाब गुळघाणे, शेखर कारवटकर इत्यादींनी केले.

  • चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर च्या वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली.

     

    दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

     

    आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

    अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर तालुक्यातील वांढरी गावातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुकाप्रमुख विकास विरुटकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख उज्वला नलगे,युवासेना उप जिल्हाप्रमुख हेमराज बावणे, युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, युवासेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर लोनगाडगे,चेतन कामडी शाखा प्रमुख चींचाला यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितत वांढरी गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

     

    वांढरी गावातून अनेक कंपन्यांची अवजड वाहतूक सुरू आहे.या जड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या वाहतुकीमुळे वाहन धुळीचे प्रमाण वाढत आहे स्थानिक नागरिकांना वाहक त्रास सहन करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबधित वारंवार निवेदन दिले परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष केले या करिता शिवसेना युवासेना तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि या नंतर सुध्दा ही जडवाहतुक बंद झाली नाही तर समोर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असेही यावेळी सांगण्यात आले.

     

    यावेळी सज्जन सातपुते नागाळा उपसरपंच, रिझवान पठाण,शबाझ शेक,शिवा वाझरकर,अमित पिंपलकर, आकाश पावडे,केतन शरकी, तुषार शेडामे,कपिल शेरकी, चेतन पावडे,शुभम घागर्गुंडे,वर्षा पाल, पुनम तुरांकर ,माधुरी पावडे ,वेणू पोलोज्वार, साधना बहादे, तनेबाई बरडे, अशा पिपरे,सुमन पीपरे,जिजाबाई रेचंकर, माया केडझर,बायाबई शेदमे, सुरेखा पिंपलकर, भारती तूरकर, कलावती काळे,माया ढाकणे, छाया तोडासे, पापिता ढाकणे,सुनीता देशकर, तानी पलधर, भावना देशकर, सुवरणा आसूटकर,अर्चना खंदरकर, राजांना देशकर, सुनीता इंगळे,कल्याणी घुगुल,ताई कांबळे,कल्पना येलमुले, शकुन समस्त गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले.

  • चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना अटक केली. Fight for obc reservation

     

    मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवू नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

     

    मात्र काल बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची हृदयगती, रक्तदाब आणि शुगर पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आज ओबीसी समाजाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

     

    आंदोलनात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड होते. बैठकीला दिनेश चोखारे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. जनता महाविद्यालय चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. काही वेळ वाहतूक
    खोळंबली होती. मात्र यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेणे सुरू केले.

    24 सप्टेंबरला शासन, लोकप्रतिनिधींची प्रेतयात्रा

    २४ सप्टेंबरला आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून प्रेतयात्रा काढण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाईल. त्यानंतर केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर ओबीसी कार्यकर्ते ठिय्या देतील. २५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातीस सर्व तालुकास्तरावर लाक्षणिक आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे.