Tag: महायुती सरकार

  • Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

    Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

    Shiv premi सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या घटनेचा राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला.


    Shiv premi आज 4 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजकीय, सामाजिक संघटना यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्च्यात करण्यात आली.

    अवश्य वाचा : पूर रेषेच्या आत बांधकाम करणार तर गुन्हे दाखल होणार


    हजारो शिवप्रेमी यांनी सदर मोर्च्यात महायुती सरकारचा निषेध नोंदविला, महायुती सरकारने पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप यावेळी करण्यात आला.
    शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा शहराचे भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचला, महायुती सरकारचा निषेध म्हणून शिव प्रेमींनी काळा पोशाख परिधान केला होता.

    शिवप्रेमींचा मोर्चा


    यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे म्हणाले की भ्रष्टाचार करीत महायुती सरकारने हा पुतळा उभारला, आणि केवळ 8 महिन्यातच पुतळा कोसळला, याचा आम्ही निषेध करतो भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कमिशन खोरी मुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला असा आरोप गिर्हे यांनी यावेळी केला. आयोजित निषेध मोर्च्यात हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

  • राज्यात सुरू झालेली लेक लाडकी योजना काय आहे?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती, आता ती योजना प्रत्यक्षात लागू करण्यात आली आहे, सदर योजना लागू केल्याबद्दल भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहे.

    काय आहे लेक लाडकी योजना?

    राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०२३ पासून पुढे जन्मलेल्या मुलींना सरकार लखपती करणार आहे.

     

    एका कुटुंबात एक मुलगी असो किंवा दोन मुली जन्माला येवो.. त्या दोघींनाही हा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रु., पहिलीला गेली की ६ हजार रु., सहावीला गेली की ७ हजार रु. अकरावीला गेली की ८ हजार रु. आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रु. असा लाभ मिळत या पद्धतीने एकूण १ लाख १ हजार रु. मिळवत आपल्या राज्यातल्या या लाडक्या लेकी लखपती होणार आहेत.

     

    मार्च २०२३ अर्थसंकल्पिय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री आमचे नेते-राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या ‘लेक लाडकी योजनेची’ घोषणा केली होती.. आणि आता ही योजना अंमलात येतेय.

    यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे चित्रा वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

  • हिंगणघाट जळीत कांडाची 3 वर्षांनी पुन्हा चर्चा

    News34 chandrapur

    वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे, महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं जळीत कांडातील पीडित कुटुंबाला मदतीच्या नावावर निव्वळ आश्वासन देण्यात आले होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.

    ३ फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. ८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने 10 फेब्रुवारीला निर्भयाचा मृत्यू झाला होता.

    ही घटना वर्धा निर्भया प्रकरण व हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले. याच घटनेमुळे शक्तीकायदयाचे सुतोवाच झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश निर्माण झाला होता.

    संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते.

    मात्र उध्दव ठाकरे आणि मविआ त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही, २.५ वर्ष कसलीही काहीही मदत केली नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

     

    महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या जळीतकांडाचा महाविकास आघाडीलाच विसर पडला होता, अखेर महायुतीच्या सरकारकडून
    पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    अडीच वर्ष सत्तेत असनार ठाकरे सरकारने फक्त घोषणाबाजीच केली होती प्रत्यक्ष मदत मात्र शुन्य, अखेर पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल पुढे करीत पिडीत कुटूंबियाला जाहिर मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

    तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून नुसतीच घोषणाबाजी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात मदत ही महायुती सरकारने केली.

     

    मात्र दिनांक २५ सप्टेबर, २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सदर निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली

    निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे असे चित्राताई वाघ म्हणाल्या.

    निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला.