Tag: भारतीय संविधान

  • Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

    Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : मनुस्मृतीला गाडून निर्माण करण्यांत आलेली राज्यघटना अलीकडील काळात धोक्यात आली असून मोदी सरकार लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य उदयास आणण्याचे कारस्थान रचत आहे. असे झाल्यास स्वतंत्र भारताच्या नागरीकांना पुन्हा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल. हे लक्षात घेवून प्रत्येक नागरीकांनी सजग राहणे काळाची गरज झाली आहे. असे मत अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
    आम्ही भारताचे लोक तालुका मूल या संस्थेच्या वतीने स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजीत अमृतकाळात भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर आयोजीत व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. Indian democracy

     

    स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाचा अभ्यास आणि विचार करून अथक प्रयत्नाने लिहीण्यांत आलेल्या सर्वसमावेश अश्या राज्यघटनेतील कलम आणि अधिनियमांद्वारे देशाचा कारभार सुरळीत सुरू असतांना मागील काही वर्षापासून काही मंडळी राज्यघटनेला डावलुन देशात सांप्रदायीक वातावरण निर्माण करून नागरीकांनामध्यें द्वेष, असुरक्षीतता, भावना चेतवुन दंगली घडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप प्रा. श्याम मानव यांनी केला. Threat to Constitution

     

    डार्वीनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत शालेय अभ्यासक्रमामधून वगळण्याचे कारस्थान करणारे विद्यमान शासनकर्ते अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत असलेल्या धिरेंद्र महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणारा गोडसेचे गोडवे गाणा-या कालीचरण महाराज, गांधीना मुस्लीमांची औलाद म्हणणा-या संभाजी भिडे या दुस-यांच्या जीवनात चिवडा चिवड करणा-या मंडळीना प्रौत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे सांगतांना प्रा.श्याम मानव यांनी न्याय हक्काकरीता आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांवर वेगवेगळया आयुधांचा वापर करून शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणारे मोदी असंवेदनशील असल्याचा आरोप केला. Modi government

     

    राज्य आणि देशात कंत्राटी नोकर भरतीची पध्दत अंमलात आणून सुशिक्षीत बेरोजगारांची मस्करी केल्या जात आहे. महागाईनेही डोके वर काढले आहे, जाती धर्माचे राजकारण करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचे कारस्थान रचल्या जात असल्याचे सांगतांना प्रा. श्याम मानव यांनी कारवाईच्या भितीपोटी देशातील न्याय व्यवस्था प्रचंड दबावात असून निवडणुक आयोग, गृहविभाग व इतरही प्रशासकिय यंञणा शासनकर्त्यानी पट्टे बांधुन ठेवल्याचे सांगीतले. Manusmriti

     

    नोटबंदी आणि कोविड काळात मोदींनी घेतलेले निर्णय अत्यंत चुकीचे असून ईडी आणि सीआयडी च्या नांवाने दबाव तंत्राचा वापर करून करण्यांत येत असलेले पक्ष फोडीचे राजकारण लोकशाहीला घातक ठरणारे आहे. त्यामूळे स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाला लोकशाही अस्तित्वात ठेवायची असेल तर मोदी हटाव-देश बचाव हा नारा जोपासला पाहिजे. असे आवाहन केले. सामाजीक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ञ डाॅ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.अनिता वाळके यांचे हस्ते झाले. Equally and justice

     

    यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमूरे, धनगर समाज संघर्ष समितीचे विदर्भ अध्यक्ष डाॅ. तुषार मर्लावार, साहित्यीक प्रब्रम्हानंद मडावी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, व्हाॅईस आँफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु गेडाम, प्राचार्य अशोक झाडे, गंगाधर कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. वासीम राजा, संपत कन्नाके, डेव्हीड खोब्रागडे, संजीवनी वाघरे, जयश्री चन्नुरवार, गुरू गुरनूले आदि मंचावर उपस्थित होते. यावेळी डाॅ. अनिता वाळके, डाॅ. अभिलाषा गावतुरे आणि सुरेश झुरमूरे यांनी मनोगत व्यक्त केले. हिरालाल भडके यांनी प्रास्ताविक, नंदकिशोर शेरकी यांनी संचलन तर साक्षी गुरनूले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येनी उपस्थित होती.

  • Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

    Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

    News34 Chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या पटांगणात दिनांक 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत बहुजन विकास मंच चंद्रपूर द्वारा बहुजन समाजातील नागरिकांकरिता विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे सादरीकरण 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच शिवराय ते भिमराय असा प्रवास सांगणारा मी वादळवारा हा कार्यक्रम अनिरुद्ध वनकर यांच्यातर्फे सादर करण्यात आला. Upcoming election

     

    24 फेब्रुवारी रोजी निर्भय बनो या शीर्षकाखाली डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान डॉक्टर विश्वंभर चौधरी म्हणाले की, 2014 पासून देश हुकूमशाही कडे चाललेला दिसून येत आहे, लोकशाही जर बळकट करायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मोदी व शहांचा पराभव होणे आवश्यक आहे. Bahujan vikas manch

     

    आज भारतीय जनता पार्टी घाबरली असून त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांची गरज भासत आहे. देशातल्या अनेक स्वायत्त संस्था हाताशी घेऊन विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव केंद्रातील सरकार करीत आहे. समाजा समाजात द्वेष निर्माण करून हे सरकार सामाजिक असंतोष निर्माण करीत आहे. dr.Vishwambhar Chaudhary

     

    देशातील अनेक संस्था अदानी व अंबानीला विकून त्यांना आर्थिक बळकट करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशात आर्थिक असमतोल निर्माण होत आहे. एकीकडे देश बळकट होत चालल्याचे सांगून दुसरीकडे ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य देत असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहे हा विरोधाभास असून आज याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. Constitution

     

    यावेळी प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, आज या देशात संविधान टिकवायचे असेल तर हे हुकूमशाहीचे सरकार घालून बहुजनांचे नवीन सरकार आणण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षातील विविध माजी नगरसेवक व मान्यवरांचा  सत्कार देखील करण्यात आला.यावेळी मंचावर आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गोपाल अमृतकर अँड. प्रीतीशा साधना, तसेच बहुजन विकास मंचातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.