Tag: पीकविमा

  • crop insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला हायकोर्ट तर्फे नोटीस

    crop insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला हायकोर्ट तर्फे नोटीस

    crop insurance गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात पाऊस पडला नसल्याचे कारण पुढे करून पाच हजाराच्या वर शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज दि. ओरिएंटल इन्शुरन्स या पिक विमा कंपनीने रिजेक्ट केले. त्यामुळे मुल सावली तालुक्यातील सर्व शेतकरी पिक विमा मदत निधी मिळण्यासाठी अपात्र ठरले. काही ठराविक निवडक शेतकऱ्यांना पिक विमा निधी देऊन कंपनीने आपली जबाबदारी झटकली.

    Crop insurance अवश्य वाचा : उभ्या ट्रक ला चारचाकी वाहनाची धडक, 4 युवकांचा मृत्यू

    याबाबतच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यानी केल्या. उदा. मुल तालुक्यातील मौजा येरगाव येथील विमा धारक शेतकरी मोहन विश्वनाथ नागपुरे यांचे कुटुंबातील १९०,२४७, यांना विम्याचे पैसे देण्यात आले. परंतु याच शेतीला लागून एकच धुरा असलेल्या सर्व्हे नंबर १३१,२७३, १८५,९०, हा नंबर असलेल्या मोहन नागपुरे यांना विक विम्यापासून वगळण्यात आल्याचे प्रत्यक्ष कागद पत्राची तपासणीत लक्षात आले.असे हजारो शेतकरी संतप्त असून पिक विमा कंपनीचे अधिकारी शुभम बनसोड यांचेशी संपर्क साधला असता.ते “नॉट रिचेबल”झाले.


    Crop insurance सहकार सोसायटी तर्फे व प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपयात काढण्याचे आदेश शासनाने दिले. चंद्रपूर जिल्हा पीकविमा नोंदणीत आघाडी घेतली.
    पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र, धानपट्ट्यात अजूनही पाहिजे त्या प्रमाणावर धान उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्याने पिक विमा मिळाला पाहिजे म्हणून मुल सावली कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. व न्यायालयीन लढा, देण्यासाठी मुल, सावली, पोंभूर्णा तालुक्यातील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांकडून हजारो आनलाईन विमा पावत्या जमा केल्या.

    नागपूर हायकोर्ट तर्फे एड.अजय एम.घारे यांचे मार्फतीने दिनांक ७/८/२०२४ ला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, मुख्य कार्यालय,नागपूर यांना शेतकऱ्यांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी नोटीस बजावले.त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे धाबे दणाणले असून विमा देण्यासाठी धावपळ करीत आहे.

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.

     

    धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी , घाटे अळी मुळे सुधा शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे प्रत्येक्षात शेतात जाऊन , नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला पाहिजे ते न करता ऑफिस मध्ये बसून निवडक शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लिहले जातात. खरा गरीब नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी.

     

    पीक विमा दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता , तो अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही. ज्यांना पाठविलं त्याठी काही तोकडी रक्कम जमा केल्या जाते. ज्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यांना आपणाकडून कडक निर्देश द्यावेत. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सुधा पीक विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसांनाच्या बरोबरीत द्यावे, शेतकऱ्यांची थट्टा करू नये.

     

    शेतकऱ्यांच्या पिकाची वन्य प्राण्यांच्या मुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई देण्यात यावी. परसोडा येथील शेतकऱ्यांना घेऊन आर.सी.सी.पी.एल. कंपनीशी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बैठक करून मार्ग काढून द्यावा. या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

     

    यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ , विद्यार्थी सेना ता.अध्यक्ष विवेक धोटे. केतन ताग्रम, मयूर मदनकर, कोरपना शेतकरी सुधाकर कुंभारे ,पुलगामवार , बोकले पाटील , आणि मनसैनिक उपस्थित होते.

    येत्या दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी दिला आहे.