Tag: नामदार सुधीर मुनगंटीवार

  • Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवून चंद्रपूर लोकसभा जागा जिंकण्याची संधी देण्याचा विचार करू शकते. त्यामुळे विधानसभेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होतो. Assembly Election

     

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा नवा उमेदवार येणार, की सुधीर मुनगंटीवार उमेदवार होणार? सध्या या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभेच्या जागेवर शिवसेना दावा करू शकते, असा अंदाज आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन बल्लारपूर येथे झाले. त्याच दिवशी भाजपने मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा कार्यक्रम शहरात आयोजित केला होता. Chandrapur lok sabha

     

    नेहा पेंडसेच्या कार्यक्रमाला आणि शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील विरोधाभासी गर्दीने शिवसेनेची ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत, तसतसे पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही जागांसाठी कशी रणनीती आखतात आणि स्पर्धा करतात हे पाहणे मनोरंजक असेल. Bharatiy janata party

     

    राजकारणातील नवे पर्व, कोण आहेत संदीप गिर्हे?

    चंद्रपूर शहरातील रामनगर भागातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या संदीप गिऱ्हे यांचे जीवन संघर्ष आणि चिकाटीने भरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन त्यांनी लहान वयातच शाळेत असतानाच शिवसेना पक्षात प्रवेश केला. Sandeep girhe

     

    शाखाप्रमुख म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या सध्याच्या पदापर्यंत, गिर्हे यांचा प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. राज्यात राजकीय बदल होऊनही संदीप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत ठाम राहिले. आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ठाकरे गटाने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात, तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लक्षणीय बळ मिळविले आहे. Shiv sena

     

    गिऱ्हे यांच्या संघटन कौशल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना थक्क करून सोडले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संभाव्य पाठिंब्याने संदीप गिऱ्हे यांना मोठा राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची संधी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गिऱ्हे यांच्यासारखा तळागाळातील कार्यकर्ता दिग्गज नेत्यांना आव्हान देणारा पाहिल्यास नवल वाटणार नाही. शेवटी, बदल हा गोष्टींचा नैसर्गिक क्रम आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देता, चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला आमदार निवडून आणण्याची दाट शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. Minister sudhir mungantiwar

     

    संदीप गिऱ्हे यांचे समर्पण आणि संघटनात्मक बांधणीसाठी धोरणात्मक दृष्टीकोन याने निःसंशयपणे या जिल्ह्यात पक्षाच्या वाढत्या प्रभावाला हातभार लावला आहे. शेवटी, संदीप गिऱ्हे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय शक्ती म्हणून झालेला उदय हा त्यांच्या अटूट बांधिलकीचा आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा पुरावा आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शिवसेना पक्ष आगामी निवडणुकीत मोठा प्रभाव पाडण्याच्या तयारीत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या मतदारांची साथ शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मिळत आहे, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला आलेला जनसमुदाय शिवसेनेची वाढती ताकद दाखवीत आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात बेधडक वक्तव्य करीत आहे, त्यांनी सत्तेपुढे गुढघे टेकले नाही, आजही त्यांच्या सोबतीला निष्ठवंतांची फौज उभी आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरे पॅटर्न चालणार असा अंदाज राजकीय विचारवंतांनी वर्तविला आहे.

  • चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

     

    विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली. कृषी पंपाना सध्या नियमित विजेची गरज आहे. आता शेतात धान उभा आहे आणि बाकी पिकांना ही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. याशिवाय उत्सवाचे दिवस आहे.

     

    गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने शेतीसाठी व उत्सवाच्या काळात या जिल्ह्याला सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे ही बाब ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्रांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर आणि वर्धा हे दोन्ही जिल्हे विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकाच्या दृष्टीने व नागरिकांना उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा होणे, गरजेचे असल्याची बाब या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.

     

    दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल, या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.

  • ढोल ताशांच्या गजरात नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत

    News34 chandrapur

    नागपूर : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

     

    विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार पंकज भोयर ,आश्विनी जिचकार, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर,बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर,चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे,निलेश किटे, सुभाष कासनगोटूवार,ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार आदींनी स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे व्यक्त केला.

     

    लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

     

    भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार

    आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.