Tag: नवा विश्वविक्रम

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांचा नवा विश्वविक्रम

    पालकमंत्री मुनगंटीवार यांचा नवा विश्वविक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव साता समुद्रापार पोहचविण्याचा विश्वविक्रम केला आहे, 20 जानेवारीला चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्राला 30 हजार दिव्यांनी प्रकाशमय करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चंद्रपूरचे नाव नोंदविले.

    येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याआधी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र संपूर्ण जगाला कळावे यासाठी हे अक्षरी मंत्र तब्बल 30 हजार दिव्यांनी सजविण्यात आले.

     

    चांदा क्लब मैदानावर 100 चौरस फूट जागेवर सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र साकारण्यात आले, त्यावर 30 हजार दिव्याच्या पणत्या लावत चांदा क्लब मैदान परिसर प्रकाशमय करण्यात आले.

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाने आयोजित केला होता.

     

    आज 21 जानेवारीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे पालकमंत्री मुनगंटीवार यांना नव्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

    20 ते 22 जानेवारी पर्यंत चांदा क्लब मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरात श्री रामाच्या नावाचा होणार विश्वविक्रम

    चंद्रपुरात श्री रामाच्या नावाचा होणार विश्वविक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 20 जानेवारीला चंद्रपुरात राम नामाचा विश्वविक्रम होणार आहे, यासाठी चांदा क्लब मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.

    22 जानेवारीला अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, मात्र त्याआधी चंद्रपुरात श्री रामाचा गजर होणार असून त्याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

    सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी शब्द हजारो पणत्यांनी सजनार आहे, यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे, भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे यांच्या देखरेखीत ही तयारी सुरू आहे.

     

    20 ते 22 जानेवारी दरम्यान चंद्रपुरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे, विशेष बाब म्हणजे सियावर रामचंद की जय या शब्दांना सजविणारे प्रथम मानकरी 18 पगड जातीचे नागरिक असणार.

  • खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून परंतु ही एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे हा प्रश्नचिन्ह आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

    प्रदर्शनातील उपस्थित जनतेकडून सांगण्यात आले की खिचडी अर्धी सुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते तेथील जनता सकाळी दहा वाजता पासून तरी पाच वाजेपर्यंत या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती परंतु त्या सर्व जनतेच्या वाटेला निराशा आली.

     

    कारण संबंधित स्टॉल वर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉल कडे बघून निराशेने परत जाताना बोलत होता जर द्यायचेच नव्हते तर बॅनर लाऊन‌ स्टाईल मारायची काय गरज होती.अशातच जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलवले परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉल पर्यंत पोहोचलीच नाही नेमकी खिचडी किती किलोची बनली हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का असा प्रश्न चंद्रपूरची जनता करू लागली आहे.म्हणून आपने या चंद्रपुरातील खिचडी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला.

     

    ढिसाळ नियोजनाची खिचडी?

    खिचडी बनल्यावर कृषी महोत्सव स्थळी नागरिकांची गर्दी उसळली, आधी रांगेत नागरिकांनी खिचडीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी जास्त असल्याने नागरिक ऐकायला तयार नव्हते, खिचडी मिळाली मात्र चम्मच चा त्या ठिकाणी अभाव आढळला, अनेक नागरिक जमिनीवर बसून खिचडी खाऊ लागले होते, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाचा अखेर अभाव दिसून आला. विविध प्रभागात नागरिक खिचडी ची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या पदरी निराशा पडली.