Tag: दिनेश चोखारे कांग्रेस नेते

  • Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

    Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १००० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला.

     

    या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश चोखारे यांनी केले. या मोर्चात कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी देणे, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान भरपाई देणे, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर करणे, कंपनीच्या अतिक्रमण हटवणे, कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देणे, कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करणे, स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य देणे आदी मागण्या करण्यात आल्या.

     

    आंदोलकांनी चेतावणी दिली की, जर कंपनीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ते आणखी तीव्र आंदोलन करण्यास तयार आहेत.

     

     

    यावेळी आयोजक माजी सदस्य ग्रामपंचायत घुघुस पवन अगदारी, सुधाकर बांदुरकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत घुघुस, हेमंत उरकुडे, शेखर तंगडपल्ली, प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, तोफिक शेख, सुरज बहुराशी, सिनू गुडुला,
    सुधाकर बांदुरकर, हेमंत उरकुडे, म्हातरदेवी सरपंच संध्याताई पाटील, पंचायत समिती सदस्य रजीता पवनकुमार आगदरी, पवन चांकपुरे, दिलीप ठाकरे, दिलीप मत्ते, बबन सावे, अमोल आत्राम, शंकर उईके, तुळशीराम दरेकर, सुरज बहुरिया, साखरवाही सरपंच नागेश बोंडे, घोनाडच्या सरपंच संगीता मत्ते, गणेश आवारी, संजय टिपले, दिनेश टिपले, हसिम खान, संतोष बांदुरकर, हितेश लोडे, दिनेश भोगले, भास्कर सोनेकर, सुधाकर वारारकर, रमेश काळे, श्यामराव उपरे, यांचे सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

     

     

    या मागण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

    * घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे.
    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे.
    * जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे.
    * विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा.

     

    * कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे.
    * प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे.

     

    * कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे. जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे.

     

    * स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य द्यावे.

  • चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश चोखारे

    चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले होते परंतु त्यावर काही तोडगा न निघाल्याने आज दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

     

     

    चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे. अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

     

    बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

     

    यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, किशोर वरारकर, मुन्ना साव, भटालीचे सरपंच किसन उपरे, रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टोंगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, वैभव शेंडे, अतुल मोहित्कर, आकाश जुंघरे, पवन चकंनापुरे, ईश्वर आखारे, राहुल शेंडे, प्रशांत सरोकार, सुधाकर वरारकर, रंगराव पवार, संतोष बंदुरकर, अकुंश कौरासे, पराग राजुरकर, संजय टिपले, सुमित भगत, शकर देशमुख, विनोद नाळे, राजू टेकाम, धनंजय शेंडे, दिनेश घागरगुंडे, प्रवीण मांढरे, संजय टिपले, सिद्धार्थ कवाडे, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.

     

     

    आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी यावेळी केली आहे.
    बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना करण्यात आली.

     

  • चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन

    चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.

     

    या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे.या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. परंतु प्रशासनाने कोणतीही दखाल न घेतल्याने १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे करणार आहेत.

     

    काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.

     

    चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल.

     

    या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

     

    चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

  • घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घुग्घूस शहर, ता. चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात संघटनेने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांबाबत सादर केल्या आहेत.

     

    या मागण्यांमध्ये घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

     

    लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे, जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे, विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा, कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे, कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे.

     

    जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले, लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे यांचा समावेश आहे.

     

    या सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा आणि न्याय द्यावा यासाठी भूमिपुत्रांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. भूमिपुत्रांच्या वरील मागण्यांवर योग्य ती सकारात्मक चर्चा न झाल्यास दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी संघटनेने दिली आहे.

  • काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    News34 chandrapur

    काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, काँग्रेसचे नेते दिनेश चोखारे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नागपूर येथील विधिमंडळ परिसरात झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, गोंदियाचे आमदार करोटे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेवराव किरसान, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भ्राह्मणवाडे, पवन अगदारी आदींची उपस्थिती होती.

     

    दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, दिनदर्शिका ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपल्याला दिवस, महिने, वर्ष यांची माहिती देते. दिनदर्शिकेमुळे आपले वेळेचे नियोजन चांगले होते. दिनदर्शिका प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी दिनेश चोखारे यांचे अभिनंदन केले.

     

    दिनेश चोखारे म्हणाले की, ही दिनदर्शिका २०२४ पर्यंतची आहे. यात प्रत्येक महिन्याची माहिती तसेच महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. दिनदर्शिका ही एक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण साधन आहे. या दिनदर्शिकेमुळे लोकांना वेळेचे नियोजन करण्यात मदत होईल.

     

    यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांनीही दिनदर्शिकेचे कौतुक केले.

     

    दिनदर्शिकेमध्ये दरवर्षीचा शुभेच्छा संदेश, ज्योतिष टिप्स, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका, कृषी संबंधित माहिती, शालेय अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या घटना, कला, साहित्य, संगीत, क्रीडा या विषयांवरील माहिती यांचा समावेश आहे.

     

    यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपूरसह वरोरा, मुल, पोंभुर्णा एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार

    चंद्रपूरसह वरोरा, मुल, पोंभुर्णा एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार असून, नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्य देणार असे आश्वासन उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दिली.

     

    चंद्रपूर बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसचे नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना भेटून याबाबत निवेदन दिले. यावेळी पवन अगदारी उपस्थित होते.

     

    चोखारे यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अलिकडच्या काळात जिल्ह्याची ओळख पुसली जात आहे. जिल्ह्यातील उद्योग कमी होत आहेत. त्या तुलनेत बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा, राजुरा, तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले नाहीत. बहुतांश एमआयडीसी परिसर ओसपडल्याचे दिसून येत आहे.

     

    चंद्रपूर शहर उद्योगांचे शहर आहे. कोळसा खाणी, वीज केंद्र, एमईएल, असे कारखाने शहराच्या सभोवताल आहेत. तरीही जिल्ह्याचे स्थान आणि वाढती बेरोजगारी टाळण्यासाठी शहरासाठी दाताळा मार्गावर एमआयडीसीची उभारणी करण्यात आली आहे. या एमआयडीसीतही काही उद्योग उभे झाले आहेत. मल्टीऑर्गनिक हा उद्योग सोडला तर डोळ्यात भरण्याएवढा मोठा उद्योग या परिसरामध्ये नाही. काही उद्योग एमआयडीसीत दिसत असले तरी अनेक जमिनी अद्यापही रिकाम्या आहेत.

     

    उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर स्वस्तात भूखंड मिळतात म्हणून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो लोकांनी विविध एमआयडीसीत भूखंड घेतले. आश्चर्याची गोष्ट अशी की या भूखंडधारकांचा उद्योग भूखंड बुक करण्यापलिकडे पुढे सरकलाच नाही. आज जर कोणीही अशा एमआयडीसीचा फेरफटका मारला तर उजाड माळरानापलिकडे या एमआयडीसीत काहीच दिसून येत नाही.

     

    शासनाला विविध शहरातील एमआयडीसीची खरोखरच प्रगती बघायची असेल तर ज्यांनी ज्यांनी येथील भूखंड बुक केले आहेत, त्यांच्याकडून अगोदर हे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. भूखंड परत घेतल्यानंतर नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्यक्रम द्यावा अशी विनंती चोखारे यांनी केली.

    या विनंतीवर बोलताना उद्योग मंत्री उदयजी सामंत म्हणाले की, योग्य ती चौकशी करून स्थानिकांना प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले. यावेळी सविस्तर चर्चा झाली.

  • विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

     

    बल्लारपूर येथील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नोटबुक वाटप करण्यात आले.

     

    पुढे बोलताना ते म्हणाले आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी वर्गाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करून समोर गेले पाहिजे. शिका, संघटित रहा, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागल्यास करा. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.

     

    यावेळी बल्लारपूर काँग्रेसचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, कोर्टीमक्ताचे सदस्य मनोज सोयाम, सामाजिक कार्यकर्ते महेश थेरे, वर्षा भोयर, मंदा मडावी, मुख्याध्यापक शंकर यादव, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दहेलकर, शिक्षिका पुष्पा आडे, रत्नमाला मोकासी, शालिनी गावंडे, आलम सर, वनिता आलाम, विलास गवारे, सय्यद, अर्चना धनराज डोंगे, विनोद गवारे, सुनील कोरे, अजय धोतरे, कवळजई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान, अरविंद सुरजगडे, सिद्धार्थ उंमरे, रविशंकर कोडाम, दिनेश केशकर, ऋषी आलम, पुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शुभांगी गाजरलावर, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, शिक्षक भोजराज चंदेलवार, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

     

  • काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप

    काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ​काँग्रेसने नेहमी गरिबांना साथ दिली आहे. विविध योजना त्यांचेसाठी चालू केल्या व त्या आजही सुरु आहे. त्या योजनांचा लाभ सर्वांना होत आहे. कॉग्रेसचा हात गरिबांसोबत तसेच तळागळातील जनतेसोबत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इटोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप कार्यक्रमात उद्धघाटक म्हणून ते बोलत होते.

     

    या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण तालुका अध्यक्ष बल्लारपूरचे गोविदा पाटील उपरे यांचेसह ओबीसी नेते सचिन राजूरकर, इटोलीचे सरपंच तुळशीराम पिपरे, कटवलीचे सरपंच राजू ढुमणे, उपसरपंच नरेश बुरांडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता दरेकर, शाळा समितीचे अध्यक्ष नागेश दुधबडे, माजी सरपंच वासुदेव येरगुडे, धाडुजी दुधबडे, सदस्य दयालवार, आदी मान्यवरांची उपस्स्थिती होती.

     

    पुढे बोलताना चोखारे म्हणाले कि, सदर कार्यक्रमाचे माध्यमातून गरजू पर्यंत पोहचने व गोरगरीबाना वेळोवेळी साथ देणे हाच मुख्य हेतू ठेऊन काँग्रेस समोर जात आहे. आपण काँगेस सोबत उभे राहावे, आम्ही सदैव आपल्या सोबत असून कॉग्रेसचा हात गरिबांसोबत आहे . यासमोर गावातील विकासाला चालना देऊ. शाळेतील सोयीसुविधेसाठी सर्वोतोपरी प्रयन्त करू, येत्या काळात प्रशिक्षण कार्यक्रम राबवू त्यामाध्यमातून इतराना प्रशिक्षण मिळेल. असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमात शाळेतील विद्याथ्यांना बुक वाटप करण्यात आले.तसेच इटोलीसह बल्लारपूर तालुक्यातील १५ – २० गरजू महिलांना शिलाई मशीन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

     

    यात सुनीता विजय वाळके, संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर, अर्चना गजानन रेनकूटवार रा. कळमना बल्लारपूर,चंदा सुधाकर घोंडे रा. पळसगाव बल्लारपूर, मंजू रामचंद्र वासमवार वॉर्ड ना. ०४, नया वस्ती, कोठारी , अर्चना देविदास गडकर रा. काटवली , बल्लारपूर, प्रभा रुंभी उपरे रा. कवडजाई बल्लारपूर , छाया राजू कुनघाडकर, रा. मानोरा बल्लारपूर, सविता सतीश चलाक रा. इटोली बल्लारपूर, वनिता अविनाश पेंदोर रा. मोहाली तुकूम बल्लारपूर, सुवर्णा रामू मरस्कोल्हे रा. किन्ही बल्लारपूर, पूजा प्रशांत (मुन्ना) गेडाम रा. कोर्टीमक्ता बल्लारपूर, ज्योत्सना संजय गोंधळी रा. बामणी बल्लारपूर,पुष्पा मारोती काळे रा. आमडी , बल्लारपूर, मनीषा अतुल सोनटक्के रा. नवी दहेली बल्लारपूर, वर्षा राजू गजभिये रा. जुनी वस्ती, कला मंदिर बल्लारपूर या गरजू महिलांचा सहभाग आहे.

    या कार्यक्रमात बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक चिंद्यालवर यांनी केले.

  • चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश दादापाटील चोखारे

    चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश दादापाटील चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

     

    चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे.

     

    अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

     

    यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे,सुरज तोतडे सरपंच ,पांढरकवडा, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम,पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, भटालीचे सरपंच किसन उपरे,माजी उपसरपंच संजय टिपले , रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, गोविंदा बल्की, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टाँगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.

     

    धरणे आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी करत मागण्या पुर्ण न झाल्यास 15 जानेवारी 2024 रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
    यावेळी उपस्थित नेत्यांनीही बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

  • चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी भूमिपुत्र करणार धरणे आंदोलन

    चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी भूमिपुत्र करणार धरणे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे.

     

    या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ३ एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे करणार आहेत.

     

    काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.

     

    चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल.

     

    या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
    चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.