Tag: ताडोबा महोत्सव

  • Chandrapur Festival : उत्सव पुरे झाले जनतेच्या समस्येकडे लक्ष द्या – माजी नगरसेवक पप्पू देशमुख

    Chandrapur Festival : उत्सव पुरे झाले जनतेच्या समस्येकडे लक्ष द्या – माजी नगरसेवक पप्पू देशमुख

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा व उत्सव घेण्याची होड लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट चपराशापर्यंत सारेच्या सारे शासकीय अधिकारी-कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून उत्सव व स्पर्धांचे आयोजन करण्यात गुंतले आहेत. उत्सवांच्या आयोजनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करायला वेळ मिळत नाही.

     

    परिणामी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले. यावर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज दि.1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले. ‘उत्सव पुरे झाले आता जनतेची कामे करायला अधिक वेळ दिला पाहिजे’, अशी भूमिका देशमुख यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेटून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

     

    तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ? देशमुख यांचा प्रशासनाला ईशारा

    महानगरपालिकेने 7 वर्षात 250 कोटी रुपये खर्च करून चंद्रपूरकरांना अमृत योजनेचे पाणी बरोबर मिळत नाही, जागोजागी कचरा वाढला असून सांडपाणी वाहून देणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. मोठ्या प्रमाणात डासांची वाढ झाली.रस्त्याच्या मधे जागोजागी असलेल्या खड्ड्यांनी लोकांचे हाडे मोडकळीस आली.

     

    धुळीचे प्रदूषण,सरकारी दवाखान्याची दुरावस्था, रस्त्यावरील जीवघेणे अपघात,प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.जनतेच्या समस्या किंवा मागण्यांच्या बाबत राजकीय पक्ष,सामाजिक संघटना किंवा नागरिकांनी लेखी पत्र देऊन व वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या स्तरावर ठोस कार्यवाही होत नाही. एकीकडे जनतेच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो असा ईशारा देशमुख यांनी या पत्रातून दिला आहे.

    उत्सवाच्या आडून कोट्यावधीच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न ?

    जनतेच्या मनोरंजनाच्या नावाखाली उत्सव व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा अतिरेक होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा व उत्सव यावर अनेक कोटी रूपयांची उधळपट्टी होऊन राहिली. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शासकीय अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात करोडो रुपयांची लूट करीत आहेत. विविध उत्सव आणि स्पर्धांचे आयोजन करून जनतेच्या डोळायात धूळ फेकण्याचा, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी करित आहेत, असा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला.

  • Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य सरकारने धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ओसाड पाड्याचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या पवारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 20 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Forest conservation

     

    कोण आहे चैतराम पवार? जाणून घ्या chaitram pawar

     

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनवासी चैत्राम पवार यांनी 1992 पूर्वीच्या उजाड आणि ओसाड असलेल्या मालरण प्रदेशात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अढळ आशावाद आणि गावातील आदिवासी बांधवांच्या पाठिंब्याने पवारांनी समृद्ध गाव निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला. बारीपाडाच्या यशाने जगभरातील तज्ञांचे लक्ष वेधून घेतले, 78 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ते दुसरे स्थान मिळवले. शिवाय, बारीपाडा प्रकल्पाला IFAD या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मान्यता मिळाली. Maharashtra vanbhushan award

     

    चैत्राम पवार यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये आपला प्रयत्न वाढवला आहे. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागात वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आहेत. Baripada

     

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या वनविभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल चैत्राम पवार यांचे कौतुक केले. राखीव वनक्षेत्र आणि परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन, पर्यावरण विषयक उपक्रमात पवारांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. 3 मार्च रोजी चंद्रपूर येथील ताडोबा महोत्सवात हा पुरस्कार सोहळा होणार असून त्यात चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Chandrapur tadoba festival

     

    ही मान्यता पवारांच्या समर्पणाचा आणि बारीपाड्याला समृद्ध समाजात रूपांतरित करण्यासाठी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचा दाखला आहे. चैत्राम पवार यांचा प्रवास ही एक प्रेरणादायी यशोगाथा आहे जी श्रमशक्ती आणि लोकांच्या अदम्य भावनेचे दर्शन घडवते. पर्यावरण आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना पहिला वनभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करताना महाराष्ट्राला अभिमान वाटतो. Tribal community

  • Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा अभयारण्यातील वाघ तर आपण बघितले असणारचं आता या वाघाची विविधता बघण्यासाठी वनविभागाने 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. Tadoba festivals

     

    1 मार्च ते 3 मार्च दरम्यान शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आयोजित महोत्सवाचे उदघाटन सिने अभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सव दरम्यान वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. Tadoba sanctuary

     

    आयोजित महोत्सव कार्यक्रम दरम्यान चांदा क्लब मैदान परिसरात नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. Chandrapur district

     

    1 ते 3 मार्च दरम्यान दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरोरा नाका चौक ते मित्रनगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सव करीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांसाठी बंद राहील. वरील दोन्ही मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. Wildlife enthusiast

     

    नागरिकांनी पोलीस प्रशासनाने सूचित केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. नागपूर कडून शहराकडे जाणारे वाहन वरोरा नाका उड्डाण पूल ते सिद्धार्थ हॉटेल, बस स्टॅण्ड, प्रियदर्शिनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान ते मित्र नगर चौक, संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश केल्या जातील. शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपूरा गेट ते प्रियदर्शिनी चौक ते बस स्टॅण्ड ते सिद्धार्थ हॉटेल मार्गे उड्डाण पूल वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक मित्र नगर चौक ते जिल्हा स्टेडियम मार्गे जिल्हाधिकारी निवासस्थान हुन बाहेर जातील.  Chandrapur vehicle parking

     

    ताडोबा महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने वाहनतळ नियोजित केले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब मैदान समोरील न्यू इंग्लिश/दरगाह मैदान, चर्च मैदान, कृषी भवन जवळील ट्रॅव्हल स्टॅण्ड जवळ नागरिकांनी आपले वाहन पार्क करावे. नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

    Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम व कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले. Tadoba andhari tiger project

     

    रामगावकर पुढे म्हणाले की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. Sustainable tourism

     

    हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. Wildlife conservation

     

    पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले. Tadoba tiger

     

    या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

     

    निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

     

    कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

     

    कार्यक्रमाच्या ३ ऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. रामगावकर यांनी दिली.
    आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.