Tag: चंद्रपूर ताडोबा टायगर

  • चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रात सकाळी 2 वाघांचे मृतदेह आढळून आले, आतापर्यंत या महिन्यात तब्बल 4 वाघांचा मृत्यू तर 1 बिबट चा मृत्यू झाला.
    यामध्ये 1 बोर्डा,1 भद्रावती तर 2 कोळसा येथे वाघांचे मृत्यू झाले आहे.

     

    राज्यात सर्वाधिक जास्त संख्या असलेल्या वाघाचा जिल्हा म्हणून ताडोबा अभयारण्य याचं नाव येत, मात्र या ताडोब्यात वाघाला अधिवास क्षेत्र कमी पडत आहे, त्यामुळे वाघांच्या झुंजी वाढत आहे.

     

    कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी पाणघाट खातोडा तलाव क्षेत्रात आज सकाळी वनरक्षक गस्त करायला गेले असता त्यांना 2 वाघांचे मृतदेह त्याठिकाणी आढळून आले.

     

    2 वाघाचा मृत्यू हा झुंजीत झाला असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे, पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा T-142 नर असून त्याचे अंदाजे वय 6 ते 7 वर्षे आहे.

     

    दुसरा वाघ हा कमी वयाचा असून त्या वाघांचे अंशतः मास भक्ष्य केले आहे, दुसरा वाघ हा T-92 या वाघिणीचा मादी बच्चा आहे, त्याच वय हे अंदाजे 2 वर्षे आहे.

     

    दिनांक 20 जानेवारी ते 21 जानेवारीला रात्रीच्या दरम्यान वाघांची झुंज झाली असावी असा अंदाज आहे, सदरील वाघांचे मृतदेह TTC सेंटर येथे शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले असून 23 जानेवारीला मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार.

    दोन्ही वाघांचे DNA नमुने सुद्धा घेण्यात आले आहे, मोका पंचनामा करतेवेळी कोर चे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृंदन कातकर, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर, डॉ खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

  • चांदाफोर्ट ते गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत 8 वाघांचा मृत्यू

    चांदाफोर्ट ते गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत 8 वाघांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  चांदा फोर्ट ते गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. 2 दिवसांपूर्वी रेल्वेच्या धडकेत एका तीन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याने हा मुद्दा पून्हा एकदा चर्चेला आला आहे.2008 ते 2023 पर्यंत एकूण 6 वाघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला.त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने रेल्वे विभागाकडे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा अहवाल पाठविला असून वन्यजीव रक्षणाससाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.याबाबत रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दाखविल्याने येत्या काळात रेल्वेच्या धडकेने होणारे वन्यजीव मृत्यू थांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

     

    चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा आहे. चंद्रपूरच्या बाबपेठला चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आहे. येथून नागभीड ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्याला जोडतो. या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. येथून वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे. वाघ, बिबट, हरण, रानगवा, रानडुक्कर आदी वन्यजीवांचा यात समावेश आहे. रेल्वे मार्ग ओलांडत असताना अनेकदा रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होतो, हा एक गंभीर विषय आहे.

    पाच वर्षांत 6 वाघ 2 बिबट्यांचा मृत्यू
    ============

    2018 पासून 2023 पर्यंत चंद्रपूर येथील रेल्वे मार्गावरील अपघातात तब्बल 6 वाघ आणि 2 बिबट्यांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर वनवृतातील 3 तर वन विकास महामंडळाच्या क्षेत्रातील 3 वाघांचा समावेश आहे.नोव्हेंबर 2018 मध्ये लोहाराच्या जंगलात रस्ता ओलांडत असताना तब्बल तीन वाघांच्या बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वाघीण देखील जखमी झाली. यानंतर 10 ऑगस्ट 2022 ला राजुरा तालुक्यातील चनाखा येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला, 21 ऑक्टोबर 2022 ला राजुरा तालुक्यातील चूनाळा मार्गावर अपघातात वाघाचा मृत्यू झाला, 27 नोव्हेंबर 2023 ला नागभीड बाळापूर रेल्वे मार्गावर एक तीन महिन्याच्या वाघाचा मृत्यू झाला. तर 8 ऑक्टोबर 2019 मध्ये सावली चिखली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला तर 7 मार्च 2023 ला जीवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता.

     

    वनविभागाने सुचविल्या उपाययोजना
    =============
    वन्यजीवांच्या सुरक्षित संचारासाठी वनविभागाने काही पर्यायी सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी खुरटे जंगल आहे त्या रेल्वे रुळाच्या बाजूने सुरक्षा जाळी, लावण्यात यावे, प्राण्यांना येण्याजाण्यासाठी भूमिगत मार्ग काढण्यात यावे, रेल्वे रुळाच्या बाजूला निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात यावे जेणेकरून तिथे पाणी पिण्यासाठी वन्यजीव फिरकणार नाही, वळणरस्त्यावर रेल्वेची गती कमी करणे आदी उपाय योजना सुचविल्या आहेत.

     

    रेल्वे विभागाने केले दुर्लक्ष
    =============
    2018 मध्ये वनविकास महामंडळाच्या क्षेत्रातील वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर वनविभाग आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक झाली. यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व उपाययोजना सांगितल्या मात्र तेव्हा रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

     

    आता रेल्वे विभाग सकारात्मक
    ===============
    मंगळवारी सकाळी एका वाघाच्या बछड्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात किती वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल देण्यात आला. याबाबत आता रेल्वे विभाग सकारात्मक असून वरीष्ठ पातळीवर लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

     

    सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

     

    याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

     

    अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

     

    सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

     

    चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

  • 13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  ऑगस्ट महिण्यापासून बेपत्ता असलेली ताडोबाची क्विन टि 12 माया वाघिणीचे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात शनिवारी गस्तीदरम्यान अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील चार महिण्यापासून टि 12 वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होणे बंद झाले होते. तेव्हापासून पर्यटक आणि वन्यप्रेमींमध्ये माया वाघिणीच्या अस्तित्वाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ह्या बाबतची ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ह्या विषयी अधिकृत माहिती दिली आहे.

     

    T-12 ही वाघिणी ही माया नावाने ताडोबात सर्वपरिचीत होती. ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य पांढरपवणी भागातील प्रबळ वाघिण होती. तिचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये जन्म झाल्याची नोंद आहे. जून 2014 पासून टि 12 वाघिणीने पाच वेळा शावकांना जन्म दिला आहे. सन 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये एकूण 13 शावकांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता वाढण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. ह्यातील काही शावकांचा नैसर्गिक दृष्ट्या मृत्यू झाला आहे.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमीत होणा-या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातुन शास्त्रशुध्द पध्दतीने होणा-या संशोधनामध्ये 2014 पासून या वाघांची नियमीत नोंद होत होती. परंतु मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुरू असलेल्या फेस 4 मध्ये तीची शेवटची नोंद झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ताडोबा तलावाजवळील पंचामध्ये गस्त करीत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचा-यांना तिचे शेवटचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर ती पूर्वीच्या गृह क्षेत्रात दिसत नव्हती. तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच पर्यटकांमध्ये तिच्या मृत्यू बाबत शंका घेतली जात होती. ताडोबातील तिच्या सध्याच्या अस्तित्वाविषयी पर्यटन प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

     

    त्यामुळे ताडोबाच्या व्यवस्थापानाने वन विभागामार्फत तिच्या गृहक्षेत्रामध्ये आणि लगतच्या वन परिक्षेत्रामध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्त करून शोध मोहीम सुरु केली होती. तिच्या गृहक्षेत्र म्हणजेच ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचा-यानी पिंजून काढले होते. या संसोधन प्रक्रियेत T-07, T-114, T-115, T-158, T-16, T-120, T. 138, T- 164, T- 168, T-181 आणि T-100 असे एकूण 11 विविध वाघ त्यामध्ये 6 माद्या आणि 5 नर निरीक्षणामध्ये आढळून आले.

     

    7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रियेमध्ये टि 12 (माया) वाघिणीचे अस्तीत्व आढळून आले नाही. त्यामुळे तिला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 16 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कौर क्षेत्रातील कार्यरत सर्व वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी वन्यजीव संशोधक, विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व कर्मचारी आणि रोजंदारी वनमजुर अशा सुामरे 150 वन कर्मचा-यांना 5 गटांमध्ये विभागून कौर क्षेत्रातील विविध ठिकाणी पायदळ गस्त करण्यात आली.

     

    यासोबतच कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा यांच्या सहायाने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनचे नेतृत्व ताडोबा-अंधारी व्याप प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांनी केले. ताडोबा अंधारी व्याध्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, कोर क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, जिवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर यांच्या उपस्थितीत सुरु होते.

     

    शनिवारी ताडोबा वनपरिक्षेतील ताडोबा नियतक्षेत्रातील (बीट) कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना काही अवशेष निदर्शनास आले अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश असल्याचे दिसून आले. ते सुमारे 100 चौ.मी. वनक्षेत्रात विखुरलेले होते. सर्व अवशेष एकत्र करण्यात आले. सदर अवशेष संसोधन आणि विश्लेषणासाठी पशुवैद्यकिय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञांद्वारे डिएन विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर अवशेष कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. पुढील शवविच्छेदन तपासणीसाठी अवशेष योग्य नव्हते. या क्षेत्रात आणि परिसरामध्ये कोणतेही मानवी हालचाल व कृती आढळून आली नाही.

     

    टि 12 माया वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाल वर्तविला आहे. गोळा केलेले काही नमुने तात्काळ नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCBS) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बंगलौर येथे विश्लेषणासाठी पाठविले जाणार आहेत. चालू असलेले वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीद्वारे T-12 वाघाच्या डीएनए नमुन्यांशी जुळले जाऊ शकतात आणि या संदर्भातील अहवाल 30 नोव्हेंबर 2023 प्राप्त होणार आहे. टि 12 वाघिणीच्या स्थितीबाबत अंतिम डीएनए विश्लेषण अहवालानंतर माया वाघिणीचे सत्य समोर येणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले आहे.

  • तो गुरांना घेऊन जंगलात गेला आणि वाघ समोर आला

    News34 chandrapur

    चिमूर – गुरांना जंगलात चराईसाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना रविवारी 29 ऑक्टोबर ला घडली.

     

    चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे राहणारे 45 वर्षीय मधुकर धाडसे असे मृतकाचे नाव आहे.

    दुपारच्या सुमारास विहिरगाव येथील गुराखी व गुरेढोरे मालक यांनी 8 जणांचा समूह बनवीत गुरे चराईकरिता विहिरगाव वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 859 मध्ये गेले.

     

    त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने मधुकर वर हल्ला चढवीत त्याला ठार केले, सदरची माहिती वनविभागाला मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या चमूने मधुकर चा मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालयात आणला, मृतक मधुकर हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.