Tag: गुन्हेगारी चंद्रपूर

  • crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

    crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

    crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला करीत हत्या केली.
    हाजी ची हत्या केल्यावर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले, पोलिसांनी आरोपिकडून 4 देशी बनावटीची बंदूक व चाकू जप्त केला.

    कोलकाता डॉक्टर अत्याचार : चंद्रपुरात निघाला डॉक्टरांचा मोर्चा


    Crime हाजी ची हत्या जुन्या संघर्षातून केली असल्याची माहिती आरोपीनी पोलिसांना दिली, आरोपीमध्ये दिग्रस येथील समीर शेख सह असे एकूण 6 आरोपीला अटक करण्यात आली.

    मुख्य आरोपी समीर शेख हा एक दिवसांपूर्वी आपल्या सहकाऱ्यासोबत चंद्रपुरात आला होता, त्यांनी हाजी ची रेकी करीत त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
    आरोपी हाजी वर हल्ला करताना अक्षरशः तुटून पडले होते, तो जिवंत राहू नये यासाठी चाकूने सपासप वार केले.

    खाकी चा वचक कमी झाला?


    Crime मागील 40 दिवसात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार व बॉम्ब हल्ल्याच्या घटना घडल्या, पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी कठोर पावले उचलायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही.
    विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर जिल्ह्यात वर्णी लागताच 2 ते 3 महिने जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णतः बंद होते, मात्र त्यानंतर सर्व अवैध धंदे पुन्हा सुरू झाले, सुगंधित तंबाखू तस्करी, अवैध कोळसा, सट्टा, देशी बंदुक व काडतुसे चा व्यापार अश्या अनेक अवैध धंद्याना उत का बरं आला? हा मोठा प्रश्न आहे.

    योजना : लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा

    स्थानिक गुन्हे शाखा गुन्हेगारीवर वचक ठेवण्यास अपयशी?

    जिल्ह्यातील गुन्हे, अवैध धंदे यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात घडणारे मोठे गुन्हे, बंदूक, काडतुसे यांची वाहतूक याबाबत यंत्रणा काय करीत आहे असे प्रश्न सध्या जनसामान्यांद्वारे विचारण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीची दखल गृह विभागाने घेतली असून चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असून काही वरिष्ठ अधिकारी यांची बदली होणार असे संकेत गृह विभागाने दिले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात 40 दिवसात गोळीबार, 40 काडतुसे, पेट्रोल बॉम्ब, बनावट बॉम्ब, बंदुका जप्त अश्या घटना घडल्या, बंदूक सारखी वस्तू जेव्हा जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी पोलिसांच्या यंत्रणेला कसलाही थांगपत्ता का लागला नाही?

    आधीचं चंद्रपूर

    पूर्वी चंद्रपूर पोलीस दररोज रात्री पेट्रोलिंग करायची, रात्री कुणी फिरताना दिसलं की पोलीस त्याला त्याचे नाव, नंबर कुठून आला, कुठे जात आहे? याबाबत शहानिशा करायची, रात्रीचे 10.30 वाजले की पोलिसांचे वाहन दुकानदाराला दुकान लवकर बंद करा असे निर्देश द्यायचे.

    आता रात्री विविध चौकात वाढदिवसाचे केक कापल्या जातात, त्याठिकाणी हुडदंग घालण्यात येतो, अनेजजन रात्री बेरात्री शहरात बिनधास्त फिरत असतात, कुणीही त्यांना थांबवित नाही, तो कदाचित गुन्हेगार सुद्धा असू शकतो, शहरात असे काही ठिकाण आहे जे मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू असतात, त्याठिकाणी काही कुख्यात गुन्हेगार आपले ठाण मांडून बसून असतात.

  • Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे.

    महत्वाचे – पीकविमा कंपनीला हायकोर्टाने बजावली नोटीस

    Chandrapur 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर शेख यांची बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे 5 जणांनी मिळून गोळ्या झाडत हत्या केली, 5 युवक चंद्रपुरात 4 बंदुका घेऊन शहरात फिरत असताना पोलीसांना याबाबत थांगपत्ता का लागला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या गोळीबाराच्या घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहे, चंद्रपूर शहरात 2, राजुरा व बल्लारपूर येथे प्रत्येकी 1 घटना घडली असून आतापर्यंत टोळी युद्धातून दोघांनी जीव गमावला आहे.

    राजकीय : बाबूपेठ वासीयांची प्रतीक्षा संपली, उड्डाणपुलाचे काम होणार पूर्ण, किशोर जोरगेवार यांनी आणला निधी

    विशेष बाब म्हणजे हाजी ची हत्या झाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात हाजी समर्थक व हाजी चे राजकीय समर्थकांनी गर्दी केली होती, जनप्रतिनिधी आता गुंडासमोर लोटांगण कसे घालतात हे यातून सिद्ध झालेले आहे, जनप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो मात्र गुंडांसाठी रुग्णालयात गराडा घालणे म्हणजे जनतेला हा काय संदेश जात आहे.

    गुन्हेगारीचा कॅन्सर वाढू देणार नाही – सुधीर मुनगंटीवार

    या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुंडांना राजकीय संरक्षण देणे बंद करा असे निर्देश पोलीस विभागाला दिले आहे.

    चंद्रपुरातील टोळीयुद्धातून गोळीबाराच्या घटनेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले गेले. ही गंभीर बाब असून गुन्हेगारांना राजकीय नेतृत्वाने पाठीशी घालू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. गुन्हेगारी टोळ्या व गुंडांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात येणारे राजकीय नेत्यांचे कॉल्स प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या. गुन्हेगारीचा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात जाऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

  • shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

    shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

    shootout चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना 12 ऑगस्टला भर दुपारी बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे घडली.

    योजना : या महिलांनाच मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार

    घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, या गोळीबारात 2 जण जखमी झाले तर हाजी यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात 5 आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखा येथे आत्मसर्पण केले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
    विशेष म्हणजे जुलै महिन्यात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहे.

    घटना काय?

    Shootout दुपारच्या सुमारास हाजी व त्याचे सहकारी बिर्याणी खाण्यासाठी हॉटेल शाही दरबार येथे दाखल झाले, मात्र काही वेळाने त्यांच्यावर पाळत ठेवून असणारे युवक तिथे दाखल झाले आणि हाजीवर गोळीबार केला या गोळीबारात हाजी चा सहकारी शिवा यांच्या पायाला गोळी लागली, 2 गोळ्या हाजी वर झाडण्यात आल्या, त्यानंतर हाजीवर चाकू हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात हाजी सरवर शेख चा मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच रामनगर व स्थानिक गुन्हे शाखा त्याठिकाणी दाखल झाली, 5 आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले असून यामध्ये मुख्य आरोपी म्हणून समीर हे नाव पुढे आले आहे.

    आमदार जोरगेवार यांनी पोलीस यंत्रणेवर उपस्थित केले होते प्रश्नचिन्ह

    जुलै महिन्यात लागोपाठ 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, पोलीस प्रशासनाने पहिल्या घटनेनंतर कठोर पावले उचलायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही, जोरगेवार यांनी पोलीस विभागाला धारेवर धरल्यावर थातुरमातुर कारवाई केली मात्र ठोस कारवाई झाली नाही.

    आरोपी व मृतक हे दोघेही आधी मित्र होते, त्यांनतर दोघांनी मिळून गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं, मात्र या क्षेत्रात एकच वाघ असतो त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्वातून ही घटना घडली अशी माहिती पुढे आली आहे.

  • Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

    Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

    Chandrapur Police चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलीस विभागासमोर एक आव्हानात्मक काम आहे, मात्र पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बाहेर काढत प्रतिबंधक कारवाई करीत आहे.

    अवश्य वाचा : शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकले गढूळ पाणी

    Chandrapur police चंद्रपूर जिल्ह्यातील 6 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे, यामध्ये घुग्गुस येथील 2 व चंद्रपुरातील 4 गुन्हेगारांचा समावेश आहे.

    घुग्गुस येथील आमराई वार्डातील 33 वर्षीय वतन लक्ष्मण ताटपेल्ली (6 महिण्याकरिता हद्दपार) , 24 वर्षीय करन अर्जुन नाईक (1 वर्षाकरिता हद्दपार), 26 वर्षीय रोहन रणधीर कंजर (1 वर्षे) , 37 वर्षीय नरेश रामबाग कंजर (1वर्ष), 38 वर्षीय महेंद्र आनंदराव ढुमने (1 वर्ष), 43 वर्षीय मोहम्मद शोएब अब्दुल हासम (6 महिण्याकरिता हद्दपार) यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात भूस्खलन, 20 फूट खड्ड्यात पडली महिला

    आता पर्यंत चंद्रपूर पोलीस दलामार्फत 3 MPDA व 22 तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. आगामी सण उत्सव बघता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस कारवाई करीत आहे.

    नजरेत न पडणारी गुन्हेगारी

    विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या नजरेत न पडणारी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अवैध वाळू तस्करी, तंबाखू तस्करी, कोळसा तस्करी यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, गोंडपीपरी येथे वाळू तस्करी च्या वादातून गावकऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता.

    पोलिसांनी ही धडक मोहीम कायम ठेवल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी काही प्रमाणात संपुष्टात येईल, जिल्ह्यात खाकी वर्दीचा धाक यामाध्यमातून गुन्हेगारांच्या मनात घर करून बसायला हवा, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, घुग्गुस पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, रामनगर पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केली आहे.

    पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या गुन्हेगार दहशतीमध्ये आले आहे, मात्र येणाऱ्या काळात ही दहशत कायम ठेवण्यासाठी पोलिसांना अजून कठोर पावले उचलावी लागतील.

  • Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

    Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

    Chandrapur gambler चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून अनेक कुटुंबांना याचा तडाखा बसला आहे, प्रशासन सध्या नागरिकांच्या मदतकार्यात गुंतलेले आहे, या बाबीचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यात जुगार बहाद्दर सक्रिय झाले आहे, नुकताच दुर्गापूर पोलिसांनी माजी नगरसेवकसहित चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र आता तर राजकीय पदाधिकारी व सट्टा क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : तृतीयपंथीयांसाठी सरकारने योजना राबवावी – राहुल बालमवार मनसे

    जिल्ह्यातील अधिकृत व अनधिकृत जुगार खेळण्यासाठी राजुरा शहराचे नाव पुढे आहे, विशेष म्हणजे या भागात जुगार खेळण्यासाठी वणी, तेलंगणा येथील जुगार खेळाडू सहज पोहचतात.
    Chandrapur gambler अश्यात 22 जुलैला रात्रीच्या सुमारास माणिकगड रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या पडीत क्वार्टर च्या भिंतीला लागून काही इसम हे इमर्जन्सी लाईटच्या उजेडात जुगार खेळत होते अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
    माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक धाड मारली असता त्याठिकाणी काही इसमानी तिथून पळ काढला तर चौघे पोलिसांच्या तावडीत मिळाले.
    52 पत्त्यावर सदर ताब्यात घेतलेले इसम हे कट पत्ता खेळत होते, यामध्ये वणी येथील हाफिज रहमान खलील रहमान, 48 वर्षीय नरेश शामसुंदर मुंधळा रा.बालाजी वार्ड बल्लारशाह, 42 वर्षीय मतीन माबिन कुरेशी रा.गांधी चौक, राजुरा व सैफउद्दीन शाह रा.राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले.

    पोलिसांनी यावेळी दुचाकी वाहन mh34 bu 7956, mh34 bj 0238, mh34 bx 2971, mh34 cb 3494, mh34 bp 0597, mh34 cc 7296 व नंबर नसलेली दुचाकी, 3 मोबाईल रोख रक्कम 2 लाख 33 हजार 800 रुपये असा एकूण 6 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
    सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, त्यानंतर आरोपी व जप्त मुद्देमाल राजुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

  • बल्लारपुरात हत्येचा थरार

    News34 chandrapur

    बल्लारपूर – बल्लारपूरमध्ये, केवळ 1500 रुपयांची एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक युवक गंभीर जखमी झाला.

     

    6 नोव्हेम्बरला रात्री साडेदहा च्या सुमारास विद्यानगर वार्ड पंचशील चौकात दोन महिलांमध्ये आपापसात उधार घेतलेल्या पैशाच्या व्यवहाराबाबत वाद सुरू होता, त्यानंतर बचावासाठी गेलेल्या 2 युवकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलांनी युवकांवर हल्ला केला, लाठी काठ्यांनी दोन्ही युवकांवर वार करण्यात आला, या हल्ल्यात 32 वर्षीय ललित उर्फ नागेश रमेश तोडसाम चा जागीच मृत्यू झाला तर 24 वर्षीय अमोल देवगडे हा गंभीर जखमी झाला.

    20 वर्षीय शीतल ऋतिक गवई व आकांक्षा नामक महिलेकडून 1500 रुपये उधार घेतले होते, मात्र शीतल ते पैसे परत करीत नव्हती, सोमवारी रात्री आकांक्षा चा भाऊ चैतन्य पंचशील चौकातून जात असताना त्याला शीतल गवई भेटली त्यावेळी त्याने माझ्या बहिणीचे पैसे तू का देत नाही अशी विचारणा केली असता शीतल चा पती रितिक ने चैतन्य ला शिवीगाळी केली, त्याचवेळी ललित व अमोल त्याठिकाणी आले असता त्यांनी रितीक ला समजावले असता दोघात धक्काबुक्की झाली.

     

    परिसरातील नागरिकांनी सुरू असलेला वाद सोडविला, त्यानंतर रितीक घरी गेला त्याने घडलेला प्रसंग आई आशा गवई यांना सांगितला असता त्यांनी आपल्या सोबत सौराब खान यांना घेत माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून अमोल व ललित वर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशा गवई यांच्या सोबत असलेले रितीक गवई, शीतल गवई, सौराब खान, बंडू नगराळे यांनी सुद्धा अमोल व ललित वर काठी व दगडाने वार केला, यामध्ये ललित चा जागीच मृत्यू झाला तर अमोल हा गंभीर जखमी झाला, सध्या अमोल वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

     

    बल्लारपूर पोलिसांनी तोडसाम हत्या प्रकरणात 5 आरोपीना अटक केली आहे, ज्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.