Tag: काळी-पिवळी

  • केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. अपघात घडल्यास जखमीना
    मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.
    कोणताही वाहन चालक जाणून बुजून अपघात करीत नाही.

     

    कळत नकळत सुद्धा अपघात होतात ही वस्तूस्थिती आहे. म्हणून अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात. परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे स्वतःच्या संरक्षना करीता काही वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

     

    आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा असल्याने असा कायदा रद्द करावा अशी मागणी काळी पिवळी ट्रक्स संघटना व चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

    (गाडी चालक मालक संघटनेला तालुका काँग्रेसचा पाठिंबा)

    मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या काळी पिवळी व चालक मालक संघटनेच्या समस्त चालक रस्त्यावर उतरले असून आंदोलन करून याबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केल्या जात आहे.

     

    ही मागणी रास्त असून चालकांवर अन्याय करणारी आहे. म्हणून मुल तालुका काँग्रेसने कांग्रेस नेते जिल्हा सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात पाठींबा दर्शविला आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष तथा संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक संदीप कारंमवार ,संदीप मोहबे उपस्थित होते.