Tag: ओबीसी अन्नत्याग आंदोलन

  • राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाला यश

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता ओबीसी मंत्री मा. श्री अतुल सावे जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सामाजिक न्याय भवनात बैठक संपन्न झाली. संघटनेच्या १० पैकी ८ मागण्या मान्य करण्यात आल्या.

     

    उर्वरीत मागण्यासंबंधीदेखील लवकरच सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची आधार योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक कर्जासंबंधी तरतूद, विश्वकर्मा योजना, महाज्योती योजना यासंबंधीच्या मागण्या सदर बैठकीत मान्य करण्यात आल्या. शिक्षण, उद्योग विश्वास प्रगतीची आस असलेल्या ओबीसी बांधवांकरिता ही मोठी आनंददायी बाब आहे.

     

    या बैठकप्रसंगी माजी मंत्री डॉ परीनय फुके,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, सहसचिव शरद वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, विद्यार्थी अध्यक्ष श्वृषभ राऊत, परमेश्वर राऊत, रामदास कामडी,श्रीहरी सातपुते, ओबीसी योध्दा रविंद्र टोंगे ओबीसी सचिव सौ. वनिता वेद सिंहल, ‘महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    बैठकीनंतर रात्री उशिरा डॉ बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजूरकर यांचे हस्ते चिमूर येथील दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेले अक्षय लांजेवार , व अजित सुकारे यांच्या अन्नत्याग आंदोलन निम्बु शरबत पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली या वेळी चिमुरात असंख्य कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा 6 वा दिवस, आंदोलकाची प्रकृती खालावली

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्यायिक मागंन्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज दिनांक 12 डिसेंबरला उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुरती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

     

    चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्य सरकारने आश्वासन देऊन सुधा मागण्या पूर्ण नाही केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबर पासून सुरुवात झाली. चिमूर येथील दोन युवक अजित सुकारे व अक्षय लांजेवार यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवशी अक्षय लांजेवार यांची तब्बेत अचानक खालावली. वैदकिय अधिकारी डॉ गायधनी यांनी अक्षय लांजेवार याना तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, नामदेव किरसान, सूर्यकांत खनके यांनी दवाखान्यात भेट दिली. उपोषणाला सहा दिवस झाले असून सुधा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी की विरोधी पक्ष ओबीसींच्या न्यायिक मागण्याची दखल घेत नसल्याने ओबीसी समाजात तीव्र आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.

  • चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर च्या वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली.

     

    दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

     

    आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमुरच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मंजूर न झाल्याने भीक मांगो आंदोलन करून शासनाचा निषेध केला व आंदोलनात जमा झालेला निधी शासनाकडे जमा करणार आहेत.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर ला चंद्रपुरात येऊन 20 दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत आश्वासन देऊन आंदोलन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नसल्यामुळे दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून दुसऱ्या टप्प्याचे अन्न त्याग आंदोलन सुरू झाले.

     

    राष्ट्रीय महासंघाचे आंदोलन तीव्र होत चालले असून अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी साखळी उपोषण सोबत भीक मांगो आंदोलन घेण्यात आले. चिमूर येथील तहसील कार्यालय परिसरातील व्यवसाईकाकडून राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम लेंडे. जिल्हा उपाध्यक्ष राजू हीवजे. तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे यांचे नेतृत्वात पैसे रुपात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आर्थिक रुपात जमा झालेला निधी राज्य सरकार कडे जमा करणार असल्याची माहिती आंदोलन दरम्यान देण्यात आली.

     

    यावेळी रामभाऊ खुडसिंगे. प्रभाकर लोथें. प्रभाकर पिसे. श्रीकृष्ण जिल्हारे. श्रीहरी सातपुते. रामदास कामडी. नागेंद्र चट्टे. अविनाश अगडे. सविता चौधरी. भावना बावनकर. दुर्गा सायम. मंगला बोरकर शेवंता बोरकर. मीना चौधरी. रेखा मोहिनकर प्रीती दीडमुठे. प्रमिला ठाकरे व बहुसंख्यांक ओबीसी बांधव उपस्थित होते.

  • थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

     

    7 डिसेंबर 2023 पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्रीहरी सातपुते, अविनाश अगडे, पप्पू शेख, अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्न त्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी वाजवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

     

    यावेळी यामिनी कामडी, दुर्गा निवटे, विजया तरारे, सुनीता सहारे, कपिला चावरे, सुनीता मुरकुठे, रेखा चाचारकर, मंदा रंधये, पुज्या नन्नावरे व शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागन्यासाठी रविंद्र टोंगे. विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडलासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे, राष्ट्रिय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी. माधव डूकरे, अशोक सोनटकके, मारोती अतकरें, चिमूर चे तालुकाध्यक्ष उपस्थित होते

  • 7 डिसेंबर पासून चिमूर तालुक्यात ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार

    7 डिसेंबर पासून चिमूर तालुक्यात ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपुर मध्ये ओबीसींच्या मागण्या करिता रवींद्र टोंगे, विजय बलकी, आणि प्रेमानंद जोगी यांनी ११ सप्टेंबर २०२३ पासून सुरू केले होते, २९ ऑक्टोबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारची ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चां नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२३ ला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते परंतू ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबर २०२३ पासून अक्षय लांजेवार, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुकाध्यक्ष व अजित सुकारे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे.

     

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी मंत्री अतुल सावे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हाधिकारी मार्फ़त याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

     

    ओबीसींच्या मागण्या मध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा जात-निहाय सर्वे करण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने थांबविलेली मेगा नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, ओबीसी, विजा, भज,व विशेष मागास प्रवर्ग समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, ओबीसी, विजा, भज,व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे, वसतिगृहात प्रवेशीत नसणार्‍या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी, ओबीसी, विजाए भज,व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, म्हाडा व सिडको मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी, विजा, भज, व विशेष मागास प्रवर्ग संवर्गासाठी आरक्षण लागू करण्यात यावे, विजा, भज, इ.मा.व वि. मा. प्र. या प्रवर्गातील विध्यार्थासाठी ६०५ अभ्यासक्रमात सामाविष्ट नसलेल्या अभ्यासक्रमास स्कॉलरशिप तथा फ्रीशिप लागू करण्यात यावे, ८ लाख रूपये उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली येथे नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांना घेवून चिमूर क्रांतीभूमीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

  • चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

    चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे.

     

    ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्यांग आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे २९ ऑक्टोमबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर बैटक आयोजित केली होती. परंतु अजूनही समस्या सुटल्या नसल्यामुळे ७ डिसेंबर २०२३ पासून ओबीसीच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूरच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाजूला अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    या बाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या वतीने चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे व आमदार कीर्तीकुमार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे

  • ओबीसी आंदोलनातील नायकाचे जंगी स्वागत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.दरम्यान तब्बल 20 दिवस रवींद्र टोंगे यांनी ओबीसींच्या मागण्यांकरिता केलेला अन्नत्याग, ओबीसींच्या भावी पिढी करता सातत्याने लढत राहण्याची तयारी अन्नत्याग आंदोलनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला लढण्याची एक नवी जिद्द देत होती.

     

    रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देऊन सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोंगे यांना ‘आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सलग 20 दिवस उपोषण केल्यामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. तुम्ही समाजासाठी महत्त्वाचे आहात. तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता प्रकृतीकडे लक्ष द्या. तुम्ही रुग्णालयात उपचार करा’ असा सल्ला दिलानंतर ते चंद्रपूरातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने आज 2ऑक्टोबर ला त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आल्यानंतर चंद्रपूर लगतच असलेल्या त्यांच्या मूळ गावी वेंडली येथे रवाना केले.

     

    वेंडली या ओबीसी बहुल गावातील एका तरुणाने ओबीसींच्या न्यायिक मागण्यांकरिता तब्बल वीस दिवस अन्नत्याग उपोषण केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक हा गर्वाणवीत झाला होता झाला होता. आज 22 दिवसानंतर रवींद्र गावात आल्याने कुटुंबीय व नागरिकांनीं त्याचे जल्लोषात स्वागत करत त्याचे कौतुक केले.

     

    11 सप्टेंबर 2023 पासून रवींद्र टोंगे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात निघाला ओबीसींनीं महामोर्चा काढून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले होते.18 सप्टेंबर आंदोलनस्थळी भेट देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन मागे घेण्याची केली विनंती केली मात्र सरकार सोबत चर्चेचे कोणतेही कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने टोंगे यांनी आंदोलन सूरू ठेवण्याचा निर्धार पालकमंमंत्र्यांना सांगितला. त्यानंतर 19 सप्टेंबर ला टोंगे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने केली शासन निर्णयाची होळी केली.

     

    20 सप्टेंबर ला ओबीसी विद्याथ्यांच्या न्याय मागण्यासाठी ‘भीक मांगो’सत्याग्रह करण्यात आला.मात्र 22 सप्टेंबर ला रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविन्यात आल्यावरही त्यांनी रुग्णालयात सुद्धा अन्नत्याग करत उपोषण सुरूच ठेवले.

     

    पुढे 23 सप्टेंबर ला चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम, उपोषणस्थळी विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यावर 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारची प्रेतयात्रा काढत तीव्र निषेध व्यक्त केला. याची परिनीती पुढे जिल्हाभर 25 सप्टेंबर ला ओबीसी समाजातर्फे जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण करण्यात आले. 26सप्टेंबर रोजी विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवर यांनी उपोषण स्थळाला भेट देत ओबीसी मागण्या जाणून घेतल्या.

     

    28 सप्टेंबर ला राज्य ओबीसी शिष्टमंडळाची सरकारशी सकारात्मक झाल्यावर चर्चा आंदोलन मागे घेण्याचे महासंघाने दिले स्पष्ट संकेत, चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित करण्यात येऊन 30 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी जाहीर केले.

    कोण आहेत रवींद्र टोंगे?

    रवींद्र यांचा आधार नोंदणी ऑपरेटर ते आंदोलक असा प्रवास झाला आहे. रवींद्र हे चंद्रपूर तालुक्यातील वेंडली या गावातील आहे. रवींद्रकडे सहा एकर शेतजमीन आहे. त्यांच्या घरी पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाची एम.कॉमची पदवी घेतली. ‘टॅली’ चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आधार नोंदणी चालक म्हणून दोन वर्षे काम केले. खासगी कंपनीच्या माध्यमातून लेखापाल विभागात काम केले.

     

    ग्रामपंचायतीत माहिती प्रवेश चालक म्हणूनही काम केले. 35 वर्षीय या युवकाला पुढे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसायात जायचे आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही अशी भावना त्यांच्या अंगी होती. त्यातूनच ते ओबीसी महासंघाशी जुळले. त्या कार्याने वरिष्ठ प्रभावित होऊन मागील आठ वर्षांपासून ते ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टाई यशस्वी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईलअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली.

     

    चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. टोंगेविजय बलकीप्रेमानंद जोगी यांना लिंबू पाणी देऊन २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

     

    ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबरला भेट दिली होती. त्यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मागण्या चर्चेतून आणि संवादातून सोडविण्यात येतील, असा विश्वास देऊन श्री. टोंगे यांनी अन्नत्याग उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले होते.  श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळेच उपोषणाची सांगता होऊ शकली, अशी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे.

    ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत श्री. मुनगंटीवार सुरुवातीपासून अतिशय आग्रही आहेत. त्यांनी याबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला. त्यांच्याच पुढाकारातून शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. टोंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी चंद्रपुरात आणण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यशस्वी देखील ठरले.