Tag: इको प्रो सत्याग्रह

  • चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी

    चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमीत्ताने इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृघले अंतर्गत आज सातव्या दिवशी चंद्रपुरच्या प्रदुषणमुक्ती करीता तसेच सिटीपीएसचे कालबाहय प्रदुषीत संच क्रमांक 3 व 4 त्वरीत बंद करण्याची तसेच चंदीगडच्या धर्तीवर ‘एअर प्युरीफायर टॉवर’ शहरात उभारण्याच्या मागणीसह अन्य मागण्या शासनाकडे करीत ‘‘प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालय व अधिकारी यांना (एमपीसीबी) साकडं घाला सत्याग्रह’’ आंदोलन करण्यात आले.

     

    चंद्रपूर शहर राज्यातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या यादीत वरच्या स्थानावर असल्याने, राज्याच्या विजेची गरज सोबतच खनिजांची गरज पुर्ण करून चंद्रपूरकरांच्या वाटयाला कायम प्रदुषण, आजार हेच मिळाले आहे. चंद्रपूरचे प्रदुषण कमी व्हावे म्हणुन वेळोवेळी अनेक आंदोलने, पाठपुरावा तसेच जनहित याचिकाच्या माध्यमाने अनेक संस्था-संघटना लढत असतात मात्र याकडे हवे तसे लक्ष शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे दिसुन येत नाही. प्रदुषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नोटीसा देणे, बॅक गॅरन्टी जप्त करणे या पलिकडे काही होताना दिसत नाही. यासाठी राज्यातील शहरा-शहरातील प्रदुषणाची तीव्रता बघता, बाधीत जनतेच्या हिताचा, आरोग्याचा विचार करता भविष्यात प्रदुषण विरोधात कार्यवाहीचे स्वरूप व अंमलबजावणी बाबत शासनाने वाढत्या प्रदुषणाविरोधात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

     

    2006 पासुन चंद्रपूरच्या प्रदुषणाबाबत अनेक अॅक्शन प्लान आले मात्र अमलबंजावणी हवी तशी झालेली नाही. अलिकडे जिल्हातील व शहरातील नदयाचे जलप्रदुषणाची समस्या गंभीर आहे. नागरी सांडपाणी पासुन तर उदयोगीक प्रदष्ुाीत पाणी सर्रास नदयात प्रवाहीत केले जात आहे. तसेच जिल्हयातील तलावाची स्थिती सुध्दा गंभीर असुन जलप्रदुषण ठिकठिकाणी होत आहे. यासाठी सुध्दा कृती आराखडे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाची जवाबदारी आहे, नगर विकास विभागाची जवाबदारी आहे. मात्र याबाबत कृती होताना दिसत नाही. यापुर्वी इको-प्रो ने शहरातील प्रदुषणाविरोधात ‘अन्नत्याग सत्याग्रह’, धरणे आंदोलन, पदयात्रा तसेच जनहित याचीकाच्या माध्यमाने सिटीपीएस संच क्रमांक 1 व 2 साठी लढा दिलेला आहे. रेलवे मालधक्का प्रदुषण विरोधातही संघर्ष केलेला आहे. भविष्यात प्रदुषणाच्या मागण्यासंदर्भात इको-प्रो सत्याग्रह आंदोलनाच्या भुमीकेत असणार आहे.

     

    महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे चंद्रपूरकरास प्रदुषणाच्या त्रासापासुन मुक्त करण्यास थातुरमाथुर उपाययोजना करण्यापेक्षा आवश्यक व कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीकरीता व प्रदुषणमुक्तीच्या मागण्यासाठी आज इको-प्रो तर्फे प्रतिकात्मक आंदोलन करीत विविध मागण्याकरीता एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रह’ करण्यात आले, येत्या काळात या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.

     

    आज करण्यात आलेल्या एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रहाच्या मागण्या मध्ये सिटीपीएस कालबाहय संच क्रमांक 3 व 4 तात्काळ बंद करण्यात यावे, सिटीपीएस संच क्रमांक 5, 6 व 7 सुध्दा जुने संच होणारे प्रदुषण नियत्रणात आणुन टप्प्या-टप्प्याने बंद करण्याचा कार्यक्रम जाहीर करणे, चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणसाठी चंदीगडच्या धर्तीवर महानगरपालिकेकडुन प्रस्तावित ‘एअर प्युरीफायर टॉवर’ ला त्वरीत मंजुरी प्रदान करावी, वायु प्रदुषण व नदी प्रदुषण कृती आराखडयाची संबधीत विभागाकडुन त्वरीत अंमलबजावणी करणे, सिटीपीएस/वेकोली परिसरातील वाढलेली काटेरी झुडपे काढुन त्याठिकाणी सौर उर्जा प्रकल्प दोन्ही उदयोगाने सुरू करणे, चंद्रपूरात प्रदुषणाने बाधीत नागरीकांचे तपासण्या, उपचाराकरीता मोफत व प्रभावी योजना राबविणे, चंद्रपूर शहरात महानगरपालिकेने तसेच इतर प्रदुषीत नगर पालिका क्षेत्रात ‘हवा गुणवत्ता दर्शविणारी यंत्रणा’ उभारावी, महाराष्ट्र महानगरपालीका व नगर परिषद (सुधारित) कायदा 1994 मधिल कलम 67-अ नुसार ‘पर्यावरण सध्यस्थिती अहवाल’ त्वरीत तयार करावे, जिल्हा पर्यावरण समीती घोषीत करून नियमित सभा व कार्यान्वीत करणे आदी मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.

     

    आज इको-प्रो तर्फे संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या सत्याग्रह मध्ये नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजु काहीलकर, अब्दुल जावेद, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, कुणाल देवगीरकर, प्रितेश जीवने, सुधीर देव, भारती शिंदे, चित्राक्ष धोतरे आदी सहभागी होते.

  • चंद्रपुरात सराय बचाव सत्याग्रह

    चंद्रपुरात सराय बचाव सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ऐतिहासिक ‘सराई’ इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रोच्या वतीने हिवाळी अधिवेशन निमित्त सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृंघले अंतर्गत आज सहाव्या दिवशी सहावे आंदोलन ‘सराय’ बचाव सत्याग्रह” करण्यात आले.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक ‘सराई’ इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रो संस्थेसह शहरातील अनेक संस्था व इतिहास अभ्यासक यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. येथे इको-प्रो कडून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आलेले होते. ‘जागतीक वारसा दिन’ १८ एप्रील २०१८ पासुन ‘सराई स्वच्छता सराय इमार अभियानाची’ सुरूवात करून सलग १५ दिवस या संपुर्ण इमारतीची स्वच्छता इको-प्रोच्या सदस्यांनी केली होती. या स्वच्छता सत्याग्रह माध्यमाने चंद्रपूर शहर महानगरपालिका व शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीची छत पडल्याची घटना घडली होती, याकडे वेळीच लक्ष देण्यात ‘न आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल.

     

     

    या ऐतिहासिक इमारतीचे संरक्षण व संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घेउन या ऐतिहासिक ब्रिटीशकालिन वास्तुच्या इमारती मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे ‘ऐतिहासिक चंद्रपूर शहर पर्यटन माहीती केंद्र’ तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील या ऐतिहासिक इमारतीच्या ठिकाणी असे माहीती केंद्र तयार झाल्यास चंद्रपूरात येणाछया पर्यटकांना, नागरीकांना, विदयार्थ्यांना एकाच ठिकाणी शहरातील सर्वच ऐतिहासिक वास्तु, त्यांचे अंतर, इतिहास, कसे जावे याबाबत सविस्तर माहीती मिळु शकते. यामुळे शहरातील पर्यटन विकासाच चालना मिळेल. यासोबतच यामुळे या इमारतीचे सवर्धन सुध्दा शक्य आहे.

     

    सरायचा इतिहास

    या सराय इमारतीचे बांधकाम 1921 ते 1927 या दरम्यान पुरातन इमारतीचे भुमीपुजन २ ऑक्टो 1921 रोजी संपन्न झाले होते. स्वांतत्रपुर्व काळात स्वातंत्रलढयातील अनेक पुढारी येते थांबलेले आहेत. स्वांतत्रंलढयाच्या अनेक घटनांचे साक्षिदार असलेली ही इमारत आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. याकडे वेळीच लक्ष देण्यात ‘न’ आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल.

     

    या सत्याग्रह मागणी नुसार सराय वास्तू चे संवर्धन, दुरस्तीचे काम, परिसर विकास करून घाण, दुर्गंधी दूर करणे, सदर इमारत चंद्रपूर पर्यटन माहिती केंद्र तयार करणे या आहेत, याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आज इको-प्रो तर्फे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या “सराय बचाव सत्याग्रह आंदोलन मध्ये धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, सचिन धोतरे, सुरज कावळे, आकाश घोडमारे, चंदू ओशाखा, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण ढवळे, रोहित तळवेकर, भारती शिंदे, हर्षाली खारकर, महिमा मोहूर्ले आदी सहभागी होते.

  • इको-प्रो चे झरपट व इरई नदी संवर्धन करीता “नदी बचाव सत्याग्रह”

    इको-प्रो चे झरपट व इरई नदी संवर्धन करीता “नदी बचाव सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर : इको-प्रो च्या हिवाळी अधिवेशन निमित्त एक दिवस एक आंदोलन सुरू असून आज चवथ्या दिवशी, चवथे आंदोलन चंद्रपूर शहरातील जीवनदायिनी असलेल्या झरपट व इरई नदीच्या संवर्धनाच्या मागणिकरिता या दोन नद्यांच्या संगमावर “नदी वाचवा सत्याग्रह” करण्यात आला.

     

    चंद्रपूर शहराच्या जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे झरपट व इरई या नद्याला अवकळा आल्या आहेत, प्राचीन काळी या नद्यांच्या काठावर लोकपूर, इंदूपुर व गोंड काळात चंद्रपूर शहर वसले, ते या नद्यांच्या प्रदेश पाहूनच, प्रचंड पुराचा धोका असताना सुद्धा ही शहरे वसली, मात्र गोंड काळात या नद्यांच्या पुरापासून वाचविण्यासाठी संपूर्ण शहराला वेढा बांधून किल्ला परकोट भिंत बांधली. या नद्यांच्या काठावर प्राचीन अंचलेश्वर, महाकाली मंदिर देवस्थान आहेत. कधीकाळी या शहराचे वैभव असणारे, आज या नद्या मात्र शहरातील सांडपाणी वाहून नेणारी तसेच उद्योगिक प्रदूषित जल वाहून नेणारी नद्या राहिल्या आहेत.

     

    2022 व 2023 ला नद्यांचे सर्वेक्षण मध्ये या जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा व पैनगंगा या नद्या प्रदूषित आहेतच, यापेक्षा गंभीर स्थिती मात्र झरपट व इरई या शहरातून वाहणाऱ्या नद्यांची झालेली आहे. खरे तर झरपट व इरई या नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत, या नद्यांचे उगम जंगल भागातून झाले असले, स्वच्छ प्रवाह उगमापासून असला तरी शहरात येताच उद्योग आणि नागरी वस्तीमुळे या प्रदूषित पाणी वाहून नेतात. नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये असे ग्रीन ट्रिब्युनल चे आदेश असताना, विविध अकॅशन प्लॅन, कृती आराखडे असताना सुद्धा ते फक्त कागदावरच आहेत.

     

    आज करण्यात आलेल्या नदी संवर्धन सत्याग्रह आंदोलन मध्ये इरई-झरपट नद्यांचा कृती आराखडयाची अंमलबजावणी केव्हा?, ‘चंद्रपूर शहराची जीवनदायिनी की ‘प्रदूषित नाला’, ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम केव्हा राबविणार?, दूषित व सांडपाणी नदीत सोडणे केव्हा थांबणार?, नदीत जाणारे प्रत्येक नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया संयंत्र केव्हा लागणार?, उद्योगाचे सोडले जाणारे सांडपाणीवर प्रक्रिया केव्हा होणार?, नदी पात्रातील अतिक्रमण केव्हा थांबणार?, नद्यांचे खोलीकरण केव्हा होणार?, नदी पात्रा लगतचे ओव्हर बर्डन समस्या केव्हा दूर होणार? या झरपट व इरई नद्या संवर्धन विषयक मागण्याचे फलक हातात घेऊन “वाचवा वाचवा नद्या वाचवा”, मुक्त करा, मुक्त करा, प्रदूषणापासून नद्या मुक्त करा”, “झरपट-इरई नदी कृती आराखडा ची अंमलबजावणी करा” आदी घोषणा देत इको-प्रो सदस्यांनी नदी पात्रात उभे राहून आंदोलन केले.

     

    इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रमोद देवांगण, सुरज कावळे, स्वप्नील मेश्राम, भूषण ढवळे, चंदू ओशाखा, अमित कुमरे, धीरज शेंडे, लोकेश भलमे, योजना धोतरे, प्रगती मार्कंडवार, प्रज्ञा नवले, लक्ष्मी गोखरे, हर्षाली खारकर, करिश्मा बुऱ्हाण, नेत्रदीपा चिंचोलकर, आकांशा गाऊत्रे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.