Tag: आंदोलनाचा इशारा

  • पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

    पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

    News34 chandrapur

    पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, सोबतच चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र त्यांच्या विधानसभा मतदार संघातील पोम्भूर्णा येथील तालुका क्रीडा संकुल अनेक समस्यांनी ग्रासले आहे, त्या समस्या दूर करा अन्यथाया आंदोलनाचा करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पवन बंकावार यांनी प्रशासनाला दिला आहे.

     

    ग्रामीण भागातील मुले क्रीडा क्षेत्रात निपुण व्हावे यासाठी पोम्भूर्णा येथे क्रीडा संकुलाचे निर्माण करण्यात आले मात्र देखभाली दुर्लक्ष होत असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मैदानावर येणाऱ्या मुलांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

     

    मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष पवन बंकावार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात क्रीडा संकुल असलेल्या समस्येवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये क्रीडा संकुल सकाळी व सायंकाळी 5 वाजता सुरू करण्यात यावा, लाईट पहाटे 5 वाजता सुरू करण्यात यावे, पूलअप साठी सिंगल बार व डबल बार लावण्यात यावा, रनिंग ट्रक दुरुस्त करावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, एक केअर टेकर ठेवण्यात यावा अश्या विविध मागण्याचे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बंकावार यांनी तहसीलदार व तालुका क्रीडा अधिकारी यांना दिले.

     

    प्रशासनाने तात्काळ क्रीडा संकुल असलेल्या समस्या सोडवाव्या अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

    निवेदन देतेवेळी पवन बंकावार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पोंभुर्णा, छत्रपती कस्तुरे, प्रशांत गोंगले, गौरव चंदेल, प्रमोद ढाक, सूरज ढोले, अज्ञान कुरेशी, लोकेश गावरे, स्वप्नील गोरांतवार, रितेश कोटरांगे आदि उपस्थित होते.

  • अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

    अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील डॉ. अंबेडकर, इंदिरानगर, भानापेठ, जलनगर, अपेक्षा नगर या प्रभागात अमृत योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर आणावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महानगरपालिकेला तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, बबन काळे, योगेश्वर काळे, श्याम रहांगडाले, विजू आत्राम, चंद्रसेन पटले, विवेक दापेवार, लीला शेंडे, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     

    निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेचे काम 2023 च्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

     

    निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. ज्या ठिकाणी पाईप लाईन दिलेली आहे अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.

  • वनाधिकारी व BVG कंपनी विरोधात चंद्रपुरातील कामगार संघटना आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील वनविकास व्यवस्थापनातील ४० ते ५० वनमजूर व कंत्राटी कामगार येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. परंतु, १० वनकामगार आणि २५ कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता वनअधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून कमी केले आहे. तर दुसरीकडे काही नवीन कामगारांना कामावर घेण्यात येत आहे. हा जुन्या कामगारांवर अन्याय असून, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इंटक व सिटू संलग्नित वनमजूर व कंत्राटी कामगार निवारण संघर्ष समितीने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

     

    आठ ते नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना वनरक्षकाने ३१ ऑक्टोबर रोजी बैठक घेत १ नोव्हेंबरपासून कामावर येऊ नका असे आदेश दिले. २५ कामगार कामावरून कमी करण्यात आले असून,पुढील आठवडाभरात आणखी कामगारांना कमी करण्यात येईल, असे यावेळी या कामगारांना सांगण्यात आले. तर दुसरीकडे नवीन कामगार कामावर घेतले जात आहे.

     

    जुन्या कामगारांना कामावरून कमी करून नवीन कामगार घेणे अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, संघटनेने संचालक रेड्डी व उपसंचालक यांची भेट घेत कामावरून कमी करण्यात येऊ नये अशी मागणी केली. परंतु, अद्याप कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात आले नाही. त्यामुळे वनअधिकारी तसेच BVG कंपनीच्या विरोधात कामगारांमध्ये रोष आहे.

     

    कामावरून कमी केेलेल्या कामगारांना ९ नोव्हेंबरच्या आत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड वामन बुटले, सचिव नेताई घोष, ॲड. सुनीता पाटील यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती.