Tag: अवैध वाळू माफिया

  • वाळू चोरीचा नवा फंडा

    वाळू चोरीचा नवा फंडा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – अवैध रेती उत्खनन व विक्रीची सवय जडलेल्या रेती तस्करांना येन केन प्रकारे चोरी केल्याशिवाय चैन पडताना दिसत नाही.

     

    रेती घाट लिलाव मोहीम लांबणीवर गेली मात्र उसंत नसलेल्या रेती चोरांनी बैलबंडीचा फंडा वापरुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे. तालुक्याबाहेर रेती जात नसली तरी बैलबंडया भाडयाने घेऊन शहरीभागात खूलेआम, बेभाव रेती पुरवून लुटमार सुरु असल्याचे चित्र दिसून येते. बैलबंडया वापरल्याने महसूल अधिकाऱ्यांची कटकट नाही. हा फंडा वापरुन मूल तालुक्यात दररोज शेकडो ब्रास रेती रेतीचोर काही ठिकाणी घरपोच तर काही ठिकाणी साठवणूक करीत असल्याची बोंब सुरू आहे.

     

    मूल तालुक्यात प्रस्थावित असलेल्या ९ रेती घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. लिलावाअभावी परवाना
    अभावी ट्रॅक्टर द्धारे रेतीघाट वाहतुक बंद आहे. मात्रं खाजगी बांधकामांसाठी रेती ची मोठी मागणी सुरू आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही रेती तस्करांनी बैलबंडया भाडयाने घेऊन बेभाव रेतीतस्करी सुरू केली आहे. मुल तालुक्यात प्रति बंडी ९०० रुपयावर रेती पुरविणे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज मोठ्या संख्येने बैलबंडीधारक तालुक्यातील अनेक घाटांवर उपसा करताना खूलेआम दिसतात. तालुक्यातील अनेक गावांमधून पहाटे व रात्रो रेती भरलेल्या बैलबंडयाचा लोंढा बघून रेतीचोर किती शातीर होऊन आपला फंडा चालवीत आहेत हे लक्षात येत आहे.

     

    गतवषीं सुदधा असाच प्रकार सुरु असताना महसूल अधिकाऱ्यांनी बैलबंडीधारकाना वेठीस धरले होते मात्र काही राजकिय व्यक्ती यात हस्तेक्षेप करीत असल्याची चर्चा होती. बैलबंडीधारकांना काही ठरावीक
    रक्कम एका फेरीमागे देऊन तेवढीच रक्कम या रेती चोरांच्या घशात जात असल्याचे बोलल्या जाते.

     

    मूल तालुक्यात दिवसाकाठी शेकडो ब़ास रेतीचे अवैध उपसा सुरू असून यात शेकडो बैलबंडीधारकांना फुस लावून गुंतविण्यात आल्याचे कळते. सकाळी ६ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान मुल शहरात सुद्धा रेती वाहतुक करणाऱ्या बंडीच्या टोळया हमखास आढळून येतात असे बोलले जाते.

  • उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

    उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

    Marathi News

    गुरू गुरनुले
    मुल – वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला मूल तालुक्यातून हायवामधून वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी आहे.

     

    हे आदेश न जुमानता मूल नदीतून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू मूल तालुक्यातून गेलेल्या उमा नदी पत्रातून हे वाळूमाफिया रात्रीच्या वेळेला पोकलँड साहाय्याने वाटेल तेवढी अवैध रेती मंगळवारी रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक मुल येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी पकडली रेती भरलेली गाडी 16 जानेवारी पहाटे अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास मिळालेल्या
    गोपनिय माहीतीच्या आधारे उपविभागीय अधिका-यानी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा सापळा लावून एक टक हायवा रेती भरलेले वाहन जप्त केले व वाहतूक करणाऱ्या हायवा मालकावर 3 लाख 25 हजार रुपये तात्काळ दंड ठोठावण्यात आलेले आहे.

     

    गाडी क्रमांक एम एच 33 -4485 असून मुल येथे प्रशासकीय भवन समोर जमा करण्यात आला आहे. याप्रसंगी सोबत महसूल विभागातील पथक नायब तहसिलदार राम नैताम अ. का. श्री तुनकलवार, विशाल जिडगिलवार व प्रवीण गेडाम शिपाई उपस्थीत
    होते. यांच्या नंतरही असीच कार्यवाही सुरू राहणार नदीपात्रात जाऊन बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या
    वाहनांवर कारवाई केल्यामुळे अवैध्य रेती उपसा करणाऱ्याचे माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

  • चंद्रपुरातील अधिकारी लावंताय महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना

    चंद्रपुरातील अधिकारी लावंताय महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीला तारडाचे सरपंच तरुण उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे एका महिला ग्रा.पं.सदस्याने विरोध केल्याने वाळू तस्करांनी या तिघांवरही प्राणघातक हल्ला करून जखमी केले. या प्रकरणात शिवसेना (उबाठा) वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकरसह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाला गोंडपिपरीचे एसडीओ, तहसीलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे आणि खनिकर्म अधिकारी नैताम तेवढेच जबाबदार असून, या सर्व अधिकाऱ्यांना या हल्ल्याप्रकरणी जबाबदार ठरवून गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

     

    गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा घाटावरून शासनाचे नियम डावलून रेती उत्खनन सुरू आहे. रेतीघाटधारक अक्षय चांदेकर हे पोकलेन, जेसीबी मशीने रेतीघाट पोखरत आहेत. दररोज रेती तस्करीच्या वाहतुकीमुळे तारडा गाववासीयांची झोप उडाली असून, तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे आणि एका महिला ग्रामपंचायत सदस्यांने नदीपात्राकडे धाव धेत रेती उत्खननाला विरोध केला. यावेळी या तिघांवरही अक्षय चांदेकर आणि त्याच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा मास्टर माइंड शिवसेना वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना अटक करण्यात आली तर काशीकर हा फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु, हा हल्ला पूर्वनियोजित असून, रेतीघाटधारक अक्षय चांदेकर यांनी महसूलचे अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे यांना हाताशी धरून हा हल्ला केल्याचा आरोप पुष्पा मोरे यांनी केला आहे.

     

     

    चांदेकर यांनी परवानगी मिळालेल्या क्षमतेपेक्षा दहा पट अधिक ब्रासरेतीचे उत्खनन केले आहे. रेती घाटावरील सीसीटीव्ही फूटेज आणि स्टॉक यार्ड, जीपीएस ट्रेकिंग याची चौकशी केल्यास या घाटावरील वाळूचोरीचे मोठे गौडबंगाल उजेडात येणार आहे.

     

    परंतु, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच लावण्यात आले नाही. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनेचे रेतीघाट धारकाकडून रेतीघाट पोकलेन आणि जेसीबीने पोखरला जात असल्याचा आरोप मोरे यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील रेतीघाटांवरून मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू असून, गुन्हेगारी वाढत आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच कुलथा घाटावरील घटना घडली असून, या महसूल अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच सरपंच आणि तंमुस अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

     

    अशी होते वाळू तस्करी…

    चंद्रपूर जिल्ह्यात आज असंख्य वाळू तस्कर सक्रिय आहे, नियमाप्रमाणे वाळू घाट घेतल्यावर 1 हजार ब्रास च्या ऐवजी हे तस्कर 10 हजार ब्रास वाळू उत्खनन करतात, प्रशासन द्वारा वाळू घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमरे व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टम बसविल्या जातो, मात्र वाळू तस्कर ज्या वाहनांवर जीपीएस सिस्टम लावला असतो ते वाहन शट डाऊन दाखविण्यात येते आणि दुसऱ्या वाहनाने वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यात येते.

     

    प्रशासनाची अर्थपूर्ण भूमिका…

    खनिज संपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात वाळू तस्कर तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खणीकर्म अधिकारी व स्थानिक यांच्याशी ओळखी करीत सलोख्याचे संबंध स्थापित करतात आणि मग सर्वांशी अर्थपूर्ण व्यवहार सुरू करीत हा गोरखधंदा सुरू करण्यात येतो.

    दरवर्षी शासनाला यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुना लागतो विशेष बाब म्हणजे प्रशासनातील अधिकारी महसूल विभागाला चुना लावण्याचे काम करीत असतो, त्यामुळे वाळू तस्कर कुणाच्याही नियंत्रणात नसतात, त्यामुळे मुजोरी व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधामुळे हे काहीही करायला तयार असतात हे विशेष.

    या वाळू तस्करीला जबाबदार तस्कर नसून तर त्यांच्याशी हातमिळवणी करणारे प्रशासनातील अधिकारी आहे, ज्यादिवशी या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रारंभ होणार त्यादिवशी हे अवैध धंदे पूर्णतः बंद होणार.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
  • उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

    उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

    News34 chandrapur

    चिमूर – (गुणवंत चटपकार)
    चिमूर शहर व तालुक्याची जिवन वाहीनी असलेल्या उमा नदीचीचे पात्र रेती तस्करां करीता संजिवनी ठरली आहे. सोनेगाव सिरास गावा जवळील उमा नदीच्या घाटातुन मागील पंधरा दिवसा पासुन रात्रोच्या सुमारास रेतीचा उपसा करून रोज चिमूर व नेरी येथील पंचेविस ते तिस ट्रॅक्टर द्वारे तस्करी केल्या जात आहे.ज्यामुळे शासणाचा लाखो रूपयाचा महसुलास रेती तस्करांनी चुना लावलेला आहे.

    चिमूर तालुक्यात सर्व पक्षीय रेती तस्करांकडून रेतीचा उपसा व वाहतुक करून बक्कळ पैसा कमविल्या जात आहे.या तस्करांना राजकिय व प्रशासकिय आधार मिळाल्याने त्यांची मुजोरी वाढली असुन सामान्य नागरीकांना कुणीही जुमानत नाही.

     

    शेतकऱ्यांना,गावकऱ्यांना धमकावुन व प्रशासनाशी आर्थिक हितसंबध जोपासुन यांचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु आहे. चिमूर तालुक्यात उमा नदीच्या सोनेगाव सिरास जवळील पात्रात स्थळावर मोठ्या प्रमाणात रेती आहे.हे सर्व हेरून चिमूर नेरी येथील रेती तस्कर सामुहिक पणे या पात्रातुन अवैध रेती उत्खनन व वाहतुक करीत आहेत.ज्यामुळे पात्रात जवळपास पाच फुटावर खड्डे पडलेले आहेत.हि रेती तस्करी रोज रात्रो पहाटे पाच वाजे पर्यंत केल्या जाते.

     

    अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या साठी निर्माण करण्यात आलेल्या पांदण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात दुचाकीने जाताना जिव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक शेतकरी यावरून मार्गक्रमण करताना पडले आहेत.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या रेती तस्करीकडे महसुल विभाग जाणीव पुर्वक दुर्लक्ष करतात कि त्यांना माहीती नसते हा गंभीर प्रश्न आहे.या घाटातुन करण्यात आलेल्या रेती उपसा संबधी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांना माहीती देण्यात आली असुन या रेती तस्करावर कोणती कार्यवाही होईल याकडे नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.

  • राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया, अवैध वाळू उपस्याचा चंद्रपुरात बळी

    News34 chandrapur

    चिमूर –  वन विभागाच्या जंगलातून अवैध रेती उपसा करणाऱ्या चालत्या तरक्टर वरून मजदुर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास मुरपार मार्गावर घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

     

    चिमूर तालुक्यातील मुरपार – पीटीचूआ जंगलातील मुरपार मार्गावर अवैध रेती उपसा करून नेणाऱ्या ट्रॅक्टर वरून आकाश धनराज सोंनटक्के हा युवक ट्रॅक्टर वर बसून असताना चालत्या गाडीतून खाली पडल्याने ट्रॉलीचे मागचे चक्के त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदना करिता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    प्राप्त माहितीनुसार नाना मेश्राम यांचे मालकीचे बिना नंबर च्या ट्रॅक्टरने ट्रॅक्टर चालक रोशन रमेश जाधव रोज रात्री अवैध रेती उत्खनन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जास्तीत जास्त रेती उत्खनन करण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची माहिती मृत्काच्या नातेवाईकांनी दिली.

     

    मृतक आकाश धनराज सोनटक्के हा युवक 22 वर्षाचा असून आई वडिलांना एकटाच मुलगा होता. वडील अपंग असल्याने व आई शेतमजुरी करीत असल्याने उदरनिर्वाह भगविण्याकरिता आकाश नाना मेश्राम यांचे ट्रॅक्टर वर अवैध रेती उपसा करण्याचे काम करत होता.

     

    आकाशच्यां जाण्याने आई वडिलांवर संकट कोसळले आहे पण अवैध रेती उत्खनन बंद झाले नाही तर पुन्हा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. आता तरी महसूल प्रशासन. वनविभाग जागे होईल का.! की पुन्हा बळी घेण्याची वाट बघणार.