Tag: अयोध्या प्राण प्रतिष्ठापना

  • श्रीहरी बालाजी मंदिरात स्वच्छता अभियान

    श्रीहरी बालाजी मंदिरात स्वच्छता अभियान

    News34 chandrapur

    चिमूर:- गुणवंत चटपकार

    येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिरात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.

     

    आज दिनांक २१ जानेवारी रविवार सकाळी ७ वा.श्रीहरी बालाजी मंदिराच्या आवारात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या हाती झाडू व सफाईचा पोचा घेऊन साफसफाई करून मंदिर स्वच्छ केले. त्यात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी ‘अब की बार, फिर मोदी सरकार २०२४’ असे सांगत पुन्हा भाजप सरकारच्या विजयाचा संकल्प केला.
    दरम्यान आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी नप च्या सफाई कर्मचारी सोबत सवांद साधला.
    जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या.

     

    सदर स्वच्छता अभियानाला भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, देवस्थान ट्रस्टी नैनेश पटेल माजी सभापती प्रकाश वाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास धनोरे, युवा नेते समीर राचलवार ओबीसी नेते एकनाथ थुटे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, कुणाल कावरे, माजी सभापती सतीश जाधव जयंत गौरकर, नितेश दोडके, प्रकाश बोकारे,आशु झिरे, गोलू भरडकर, गोलू मालोदे विलास कोराम श्रेयस लाखे अमित जुमडे, सचिन डाहूले नरेंद्र हजारे विकी कोरेकर,भुषन सातपुते तसेच रोटरी क्लब चे पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Ekvira Mandir : एकविरा माता मंदिरात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राबविले स्वच्छता अभियान

    Ekvira Mandir : एकविरा माता मंदिरात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राबविले स्वच्छता अभियान

    Ekvira mandir चंद्रपूर – येत्या 22 तारखेला रामजन्मभूमी अयोध्या येथे श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे, त्यापूर्वी देशातील श्रद्धास्थान असलेले मंदिर स्वच्छ करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते.

    Ekvira mandir पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला साद देत चंद्रपुरात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 19 जानेवारीला सायंकाळी एकोरी वार्डातील एकविरा मातेच्या मंदिरात स्वछता अभियान राबविले.

    राजकीय : दिक्षाभूमीच्या विकासासाठी 56 कोटींचा निधी मंजूर

    देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्साह दिसून येत आहे, देशातील श्रद्धास्थान असलेली मंदिरे नागरिक स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छ करीत आहे, अनेक वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित होता, मात्र निकाल राम मंदिर च्या बाजूने लागल्याने अयोध्या मध्ये श्री राम यांचं भव्य मंदिराचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले आहे, 22 जानेवारीला श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

    देशात सर्वत्र राम मय वातावरण व्हावे यासाठी सर्वत्र मंदिराची स्वच्छता होत आहे, हे मात्र विशेष.

    यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना धार्मिक स्थळांची स्वच्छता करीत अभियान राबविण्याचे आवाहन केले.

    त्यांच्या आवाहनाला साथ देत चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व नेते यांनी जिल्ह्यातील विविध भागात असणारे धार्मिक स्थळात स्वच्छता अभियान राबविले.

    मोदी यांच्या या अभियानाला भाजप नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे.

  • Ayodhya : हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

    Ayodhya : हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

    Ayodhya चंद्रपूर / यवतमाळ – पुण्यभूमी अयोध्या नगरीत दि. 22 जानेवारी 2024 रोजी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या स्वर्णीम, ऐतिहासीक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान मिळाल्याने अतिव आनंद झाला, जीवन कृतार्थ झाले.

    23 हजार महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज नामंजूर

    Ayodhya या भव्यदीव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांमध्ये अतिव आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. मला मिळालेल्या निमंत्रणाबद्दल सर्व संबंधित आदरणीयांचा कायम ऋणी राहील. अशा भावना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.

    सर्व श्रीराम भक्तांनी 22 तारखेला श्रीराम ज्योती प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करावा असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे.

    देशात अति महत्वाच्या व्यक्तींना श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा चे निमंत्रण दिले जात आहे, त्या सूचित चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे नाव आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम व्यक्ती हंसराज अहिर यांना या दैदिप्यमान सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याने चंद्रपूरचे नाव सुद्धा या क्रमात आले आहे. भाजप पक्षात व इतर कार्यात हंसराज अहिर हे नेहमी सक्रीयतेने सहभाग घेतात, केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी नागरिकांचे काम प्राधान्याने केले होते, त्यामुळे अहिर हे नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. विशेष बाब म्हणजे अहिर ओबीसी आयोगाचे या अध्यक्ष झाल्यावर त्यांनी समाजबांधवांच्या अनेक समस्या अग्रक्रमाने सोडविल्या आहे. आजही ते विविध जनसुनावणी द्वारे ओबीसी बांधवांच्या समस्या सोडविण्याचे काम करतात.

  • उबाठा सेनेने हिंदुचा अपमान करणे थांबवावे – उपमुख्यमंत्री फडणवीस

    उबाठा सेनेने हिंदुचा अपमान करणे थांबवावे – उपमुख्यमंत्री फडणवीस

    Marathi news

    मुंबई – श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजप तर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवित आहे.

    16 जानेवारीला मुंबई येथील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदिरात स्वच्छता अभियान राबविले, यावेळी फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती होती.

     

    यावेळी फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला असता पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन केलं त्यानुसार आपण आपली श्रद्धास्थान स्वच्छ करायला हवे, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पूर्वी राज्यातील सर्व मंदिरे स्वच्छ असावी.

     

    सध्या राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे, ज्यांनी राम मंदिर व्हावं यासाठी आंदोलन केले त्यांच्यासाठी 22 जानेवारी हा दिवस दिवाळी सारखा सण आहे, मात्र ज्यांनी आंदोलनात साधा सहभाग सुद्धा घेतला नाही ते वारंवार टीका करीत आहे, माझं एकचं सांगणे आहे की उबाठा सेने ने हिंदुचा अपमान करणे थांबवावे.

  • हिंग्लाज भवानी मंदीरात हंसराज अहीर यांनी राबविली स्वच्छता मोहीम

    हिंग्लाज भवानी मंदीरात हंसराज अहीर यांनी राबविली स्वच्छता मोहीम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या महासोहळ्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व मंदीरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी जी यांनी केले असल्याने दि. 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील माता हिंग्लाज भवानी मंदीरात मातेचे दर्शन व पुजा अर्चना करुन मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

     

    या स्वच्छता मोहीमेमध्ये या परिसरातील माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, पंडीत मथुराप्रसाद पांडे, दशरथ सोनकुसरे, बाथोताई, रेखाताई चन्ने, संजय मिसलवार, आकाश पिसे, सुदामा यादव, पडवेकर ताई, मंदीराचे पुजारी संतोष जाधव, शालुताई कन्नोजवार, रेखाताई पाटील, पार्वताबाई आंबिलकर, वंदना कंदीकुरवार, वासंती मेडसिंगे, मिना पारपल्लीवार, इंगोले ताई, सावरकर ताई, नंदुरकर ताई व परिसरातील शेकडो नागरिक या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

     

    यावेळी हंसराज अहीर यांनी उपस्थितांना तसेच शहारातील विविध मंदीर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले.