Tag: विविध योजना

  • शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर

    शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    भद्रावती:- भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात विखुरली असून शासनातर्फे त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

     

    महाराष्ट्र शासनाच्या निर्देषानुसार विविध विभागाचा आढावा घेण्यासाठी दि. 17 जानेवारी 2024 रोजी स्वागत सेलिब्रेशन येथे वार्षिक आमसभेचे आयोजन पंचायत समिती भद्रावती यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी तालूक्यातील शासनाच्या विविध विभागाच्या कामाचा आढावा आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

     

    शासनातर्फे देण्यात येणारा निधी व त्यातून होणारे विकास कामे वेळेवर झाले पाहिजे यासाठी या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहचतो कि नाही याचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरीकांना वेळेवर मिळाला पाहीजे. तसेच शेवटच्या घटकांना देखील शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याकरीता आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.

     

    यावेळी त्यांनी सन 2021-2022 व 2022-23 या दोन वर्षातील चालू असलेल्या विकास कामांवर देखील चर्चा केली. त्यासोबतच गावातील सरपंच व नागरीकांना येण्याऱ्यां समस्यांचे निराकरण तातडीने करावे असे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

     

    या सभेच्या बैठकीला मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना सांळुके, गट विकास अधिकारी सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी सावसाकडे तसेच भद्रावती तालुका शहर कॉग्रेस चे अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भास्कर ताजणे, पंचायत समिती माजी सभापती प्रविण ठेंगणे, सुधीर मुळेवार, पंचायत समिती माजी उपसभावती भोजराज झाडे, सरंपच संघटनेचे अध्यक्ष नयन जांभुळे, राजु डोंगे, महेश मोरे यासह सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, इत्यादी पदाधीकारी व शासकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

  • सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याच्या सर्वंकष विकासामध्ये जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आणि स्मशानभूमी यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात मॉडेल ठरावा, यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करता येईल, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (दि.21) दिले.

     

    जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना नियामक परिषदेची सभा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री कीर्तीकुमार भांगडीया, सुभाष धोटे, रामदास आंबटकर, श्री. शिंदे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर, डॉ. मनीषा कायंदे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

     

    जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण सुविधा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा  व पायाभुत सुविधा या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘नियमानुसार वार्षिक आराखडा तयार करून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी पुरवठा आणि रोजगार या विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे.

     

    पिण्याच्या पाण्याच्या 1302 योजना कार्यान्वित केल्या आहेत. पण आता जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा उदा. वॉल कंपाऊंड, वर्गखोली, सोलर सुविधा, खेळासाठी मैदाने, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासाठी दोन वर्षाचा वार्षिक आराखडा तयार करावा. मनपा व 17 नगरपरिषदेच्या शाळा व अंगणवाड्या उत्तम कराव्यात. गावातील स्मशानभूमी पूर्णत्वास नेता येईल. प्रदूषण व वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये भेदभाव होता कामा नये. सूक्ष्म नियोजन करून दोन वर्षाचा  आराखडा तयार करण्यात येईल. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, रुग्णालय, रस्ते स्मशानभूमी आदी कामे करता येतील. तसेच “मिशन जय किसान” अंतर्गत शेतीशी निगडित कामे देखील करण्यात येणार आहेत.

     

    पालकमंत्री श्री .मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जावा यासाठी जिल्ह्यामध्ये 5001 किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्यात येत असून देशात जिल्हा पाणंद रस्त्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहील, असेही ते म्हणाले. पर्यावरणासाठी योजना आखण्यात येत असून तेलंगणा राज्याने ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येनुसार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अमृत वृक्ष योजना राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा परिषदेने जागा तपासाव्यात.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाच्या विकासासाठी नियमाच्या चौकटीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने निधी वितरित केला जाईल. यासाठी विधानसभा सदस्यांना प्रत्येकी  15 कोटी तर विधानपरिषद सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 130 कोटी निधीचे वितरण करण्यात येईल. त्यासोबतच, 80 कोटी रुपये कॅन्सर हॉस्पिटल व  प्रादेशिक पाणीपुरवठयाच्या सोलरकरिता 20 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल असेही ते म्हणाले.