Tag: लोकशाही

  • Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

    Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

    News34 Chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या पटांगणात दिनांक 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत बहुजन विकास मंच चंद्रपूर द्वारा बहुजन समाजातील नागरिकांकरिता विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे सादरीकरण 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच शिवराय ते भिमराय असा प्रवास सांगणारा मी वादळवारा हा कार्यक्रम अनिरुद्ध वनकर यांच्यातर्फे सादर करण्यात आला. Upcoming election

     

    24 फेब्रुवारी रोजी निर्भय बनो या शीर्षकाखाली डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान डॉक्टर विश्वंभर चौधरी म्हणाले की, 2014 पासून देश हुकूमशाही कडे चाललेला दिसून येत आहे, लोकशाही जर बळकट करायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मोदी व शहांचा पराभव होणे आवश्यक आहे. Bahujan vikas manch

     

    आज भारतीय जनता पार्टी घाबरली असून त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांची गरज भासत आहे. देशातल्या अनेक स्वायत्त संस्था हाताशी घेऊन विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव केंद्रातील सरकार करीत आहे. समाजा समाजात द्वेष निर्माण करून हे सरकार सामाजिक असंतोष निर्माण करीत आहे. dr.Vishwambhar Chaudhary

     

    देशातील अनेक संस्था अदानी व अंबानीला विकून त्यांना आर्थिक बळकट करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशात आर्थिक असमतोल निर्माण होत आहे. एकीकडे देश बळकट होत चालल्याचे सांगून दुसरीकडे ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य देत असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहे हा विरोधाभास असून आज याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. Constitution

     

    यावेळी प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, आज या देशात संविधान टिकवायचे असेल तर हे हुकूमशाहीचे सरकार घालून बहुजनांचे नवीन सरकार आणण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षातील विविध माजी नगरसेवक व मान्यवरांचा  सत्कार देखील करण्यात आला.यावेळी मंचावर आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गोपाल अमृतकर अँड. प्रीतीशा साधना, तसेच बहुजन विकास मंचातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.
  • Mla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत यावे – आमदार प्रतिभाताई धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या देशातली परिस्थिती अत्यंत भयावह असुन केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ED,CBI सारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन विरोधी पक्षांना कमकुवत करुन आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. Unity राज्यातील व केंद्रातील सरकार हे समाजा समाजात द्वेष निर्माण करुन लोकशाहीचा अपमान करीत आहे. त्यामुळे आज संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बहुजन विचार मंच द्वारा आयोजित लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. Constitution

     

    बहुजन विचार मंच चंद्रपूर द्वारा आयोजित लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पटांगणावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले लिखित तृतीयरत्न या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रतिभा धानोरकर उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या कि, आजची राजकीय परिस्थिती भयावह असून देश हुकुमशाही कडे वळत आहे. Democracy

     

    आपल्याला आज संविधान रक्षणाची गरज असुन त्यासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट होईल. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाने बहुजन समाजाचा वारसा जोपासला जाऊन कला व गीतांमधून प्रबोधन होणार आहे तसेच डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे मत देखील यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. Mla pratibha dhanorkar

     

    तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी चंद्रपूरातील विविध समाजातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला. Political climate

     

    उद्घाटन प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. सूर्यकांत खनके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिरुध्द वनकर यांच्यासह विनोद दत्तात्रय, रितेश तिवारी, नम्रता ठेमस्कर, चंदा वैरागडे, अनिल नरुले, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बापू अन्सारी, सकिना अन्सारी, विना खनके, रमजान अली, अनुताई दहेगांवकर, शालिनी भगत, सचिन राजुरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन श्री. गोपाल अमृतकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. प्रितिशा साधना, राहुल सुर्यवंशी, रामचंद्र कोंद्रा, स्वप्नील शेंडे, मोनु रामटेके, श्याम राजुरकर यांनी विशेष प्रयत्न केले.