Tag: निवडणूक निकाल 2023

  • चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास रचला

    News34 chandrapur

    चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गाला न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या महिला आमदार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत कामाची पावती मिळाली आहे. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे तब्बल २५ वर्षानंतर काँग्रेसचा स्वबळावर झेंडा रोवला आहे.

     

    यात सरपंचपदी प्रतिभाताई भानुदास शेरकुरे तर सदस्यपदी राहुल मारोती शेरकुरे, सिमा तुळशीदास मगरे, संगीता नागोराव नन्नावरे, रामचंद्र रघुनाथ उईके निवडून आले आहे.

     

    वरोरा जनसंपर्क कार्यालयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) तालुकाध्यक्ष रूपेश तेलंग, माजी सभापती कृ. उ. बा. स. वरोरा राजेंद्र चिकटे, हरीश जाधव संचालक कृ. उ. बा. स.,युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल नन्नावरे,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष अरुण शेरकुरे,भूषण पाटील, अमोल शेलकर, प्रभुदास पाटील, मधुकर पुसन्नाके, राजेंद्र मडवी, मारोती मिलमिले, किशोर मडावी, मिथुन आत्राम, निलेश गायकवाड, हनुमान घरात,अनिल शेरकुरे,विकास जांभुळे,मारोती चौखे,नामदेव मगरे,मनोहर रंदई,संजय काढमेघे,कैलास तुमसरे,चंपत ढोक,कवडू वाघ,सचिन शेंडे,स्वप्नील दडमल यांनी प्रयत्न केले.

  • ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा कौल देवेंद्र फडणवीसांना!

    News34 chandrapur

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या भाजपला मिळालंय.

     

    राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मनोज जरांगे – पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या उपोषणानंतर राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनोज जरांगे – पाटील यांनी भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, या टीकेचे धनी होऊन देखील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येनं मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं निवडणूक निकालांमधून स्पष्ट होतंय. त्याचबरोबर राज्यातल्या ओबीसी समाजाने देखील देवेंद्र फडणवीसांना पूर्वीपासून दिलेली साथ अजूनही सोडलेली नाही.

     

    उलट ओबीसी आणि मराठ्यांनीच भाजपचा हा मोठा विजय साकार केल्याचं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलंय. यामुळे राज्याचं खरं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच असल्याच्या विचाराला आता पुन्हा बळकटी मिळताना दिसतेय.
    ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या दुपारी 3.30 वाजता आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप ७१७ राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४०७, शिवसेना (शिंदे गट) २६२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) १८५, कॉंग्रेस २०७, शिवसेना (ठाकरे गट) ११४, आणि इतर 60 आहेत.

    आंदोलनातील टीकेचा परिणाम नाही

    मराठा आरक्षण आंदोलन काळात टीका होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जरांगे – पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्यांमध्ये 4 मंत्र्यांसह 2 माजी न्यायमूर्तींना पाठवण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या माजी न्यायमूर्तींंनीची जरांगेंना आरक्षण मिळवण्यासाठी लागणारा वेळ व त्यामागची कायदेशीर गुंतागुंत समजवून सांगितली.

     

    हे जाणून घेतल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा संदेश जनतेत गेला. हे सगळं होत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच अतिशय भरघोस यश भाजपच्या पारड्यात पडल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. निवडणूक निकालांमधून हे सिद्ध होत असून निकाल येण्यासाठी शिल्लक राहिलेल्या इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी घेतली आहे.

  • ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आघाडी

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपने जोरदार मुसंडी मारत निकालांमध्ये आघाडी मिळवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांना महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे भाजपने जिंकलेल्या ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवारांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य दिसून आलंय.

     

    त्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांना साथ दिल्याचं स्पष्ट होतंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फडणवीसांना काहींनी विरोध करूनही हे चित्र पुढे आल्याने भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलंय.

     

    ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या सकाळी १२ वाजेपर्यंत आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप २०२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) १२१, शिवसेना (शिंदे गट) ११५, कॉंग्रेस ६३, शिवसेना (ठाकरे गट) ५६, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट)६५, आणि इतर ६९

    इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी कायम राखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रचाराला ग्रामीण भागात साथ मिळाल्याचं दिसतंय.