Tag: नितीन भटारकर

  • राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

    राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

    Marathi news

    चंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षणमुखानंद सभागृह येथे प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महिला निर्धार मेळावा आयोजित केला आहे.

     

    सदर मेळाव्यात मा. अजितदादा पवार साहेब, प्रफुल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण मंत्री व जेष्ठ नेते उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

     

    या मेळाव्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चना ताई बुटले तथा शहर जिल्हाध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात मुंबई करिता रवाना झाल्या आहे.

     

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत मुंबई जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दाखवून बसेस मुंबई करिता रवाना करण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चनाताई बुटले, शहर कार्याध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

  • तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.

     

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झालेले माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला, मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रपुरातील 2 पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले असून त्याचा आपल्या पक्षावर परिणाम पडला का या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दोन्ही पदाधिकारी नितीन भटारकर व राजीव कक्कड यांच्यावर मिश्किल टोला लगावत दोघांनी स्वतः मनपा निवडणुकीच्या मैदानात उभे रहावं, जनता तुमचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही, असे न झाल्यास मी जे बोललो ते खोटं असं समजावे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून अजित पवारांनी काढता पाय घेत वेगळा गट स्थापन करून ते शिंदे-भाजप सरकारमध्ये गेले, त्यानंतर चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत त्यामध्ये सामील झाले होते.

     

    अनिल देशमुख यांच्या आव्हानाला उत्तर देत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, अनिल देशमुख हे जेष्ठ नेते आहे त्यांचा आम्ही आदर करतो, आम्ही जर निष्क्रिय असतो तर पक्षातील 90 टक्के कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा नसता, आपण राज्याचे जरी नेते असले तर स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील नगर परिषदेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा फडकविण्यास अयशस्वी का ठरले? त्याचं कधी चिंतन केलं का? विशेष म्हणजे मंत्री असताना सुद्धा कधी नागपूर जिल्हा परिषद व नगर परिषदेवर ते अयशस्वी का ठरले याबाबत त्यांनी आधी विचार करावा.

     

    आम्ही मनपा निवडणूक लढावी असा त्यांचा आग्रह आहे, याआधी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे चंद्रपुरातील राजकारण सांभाळायला आम्ही सक्षम आहो.

  • चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष प्रगतीचा आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने बांधणी बाबत झालेल्या प्रगतीचा आढावा सादर करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या व विकास कामांबाबत आणलेल्ले निवेदने मंत्री महोदयांना देत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे किवा बैठक लावावी अशी मागणी केली.

     

    जिल्ह्यातील कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्त, वन्यप्राण्यांमुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, जिवती तालुक्यातील वन कायद्यामुळे विकास कामावर झालेला परिणाम, आदिवासी व मागासवर्गीय समाजातील घरकुल बांधकाम रखडल्या बाबत, ग्रामीण भागातील रस्ते व इतर रखडलेल्या विकास कामाबद्दलचे निवेदने मंत्रिमहोदयानी स्विकारत स्थानिक प्रश्न जिल्हास्तरावर सोडवू व इतर प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्याकडे बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी हमी दिली.

     

    यावेळी काही पदाधिकार्यांच्या नामदार आत्राम यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या. चंद्रपूर, मुल व घुग्गुस येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार असुन पक्षातर्फे ताकत देण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही धर्मराव आत्राम यांनी उपस्थितांना दिली. गोंदिया जिल्हयाच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मा. धर्मराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला.

     

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सहसचिव आबीदजी अली, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, कार्याध्यक्ष तणवीर शेख, भद्रावती शहर अध्यक्ष गितेश सातपुते, हर्षवर्धन पिपरे, रकीब शेख, रवि डिकोंडा, आकाश येसणकर, चंद्रकांत कुंभारे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नौशाद शेख उपस्थित होते.

     

    तसेच पदाधिकारी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, तिमोती बंडावार, माजी सरपंच अमोल ठाकरे, माजी नगरसेवक कुतुबुद्दीन सिटी, दिपक तुरारे, रोशन फुलझेले, समीर शेख, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, किसन झाडे, सुजित कावळे, महेंद्र बाग, योहान इरगुराला, गणेश तामटकर, प्रदीप लांडगे, संजय खेवले, भोजराज शर्मा, प्रशांत झांबरे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, ईश्वर बट्टे, रणजित ठाकूर, पियुष चांदेकर, अमर गोमासे, रोशन ढवळे, मनोज सोनी, राहुल देवतळे, पंकज जाधव, सिहल नगराळे, पवन बंडीवार, राजकुमार खोब्रागडे, सनी शर्मा, निलेश टोंगे, आसिफ शेख, राहुल भगत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अजित पवार गट सक्रिय

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेलजी व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत समाविष्ठ होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नाकरीता संघर्ष करीत आला आहे. यामुळे जनतेचे प्रश्न व अनेक विकासाची कामे सत्तेत मार्गी लावता येतात. असे प्रतिपादन श्री राजेंद्र जैन यांनी केले.

     

    चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक श्रमिक पत्रकार भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खा. श्री प्रफुल पटेलजी यांची आगामी काळात चंद्रपूर येथे होणाऱ्या बैठकी संदर्भात चर्चा करून आढावा घेण्यात आला.

     

    श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता व पदाधिकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा पक्ष लढवेल त्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांची निवड करून अजित दादा पवार, प्रफुल पटेलजी व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. पक्षात सर्व घटकाचा समावेश करून प्रामुख्याने युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन जिल्ह्यात पक्षाचा विस्तार व मजबुती करीता आपण सर्र्वांनी मिळून प्रयत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले.

     

    सदर कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष कोमील मडावी यांनी केले असुन प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले. तसेच स. आबीद अली, राजीव कक्कड, राकेश सोमानी, विलास नेरकर, महेंद्रसिंग चंदेल यांनी विचार मांडले यावेळी ग्रामीण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महीला पदाधिकारी उपस्थीत होते.

     

    यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, केतन तुरकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सहसचिव आबिद अली, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चिमुर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष अविनाश राऊत, राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी, महिला कार्यध्यक्ष चारूशीलाताई बारसागडे, नगरसेवक महेंद्रसिह चंदेल, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, रौनक ठाकूर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, भद्रावती तालुका अध्यक्ष राजू बोरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष गितेश सातपुते, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे, चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठूने, सचिव रमेश कऱ्हाडे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष नोगेश बघमारे, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, शहर अध्यक्ष रियाज शेख, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, कार्याध्यक्ष तणवीर शेख, गोंडपीपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रकीब शेख, सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत, घुग्गुस शहर अध्यक्ष रवी डिकोंडा, जिल्हा सचिव हर्षवर्धन पिपरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी नगरसेवक सरफराज शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष नौशाद सिद्धिकी, ओबीसी शहर अध्यक्ष विपिन झाडे, अश्विन उपासे, प्रविण काकडे, प्रशांत झामरे, अकबर खान, दामोधर नंनावरे, मनोज सैनी, अर्चनाताई बुटले, सलीम शेख, गोलू डोहने उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमोल ठाकरे, केतन जोरगेवार, रोशन फुलझेले, तिमोती बंडावार, अनुकूल खन्नाडे, राहुल आवळे, आकाश निरथवार, दिपक गोरडवार, संजय सेजूळ, अमर गोमासे, पियुष चांदेकर, समीर शेख, अमर धोंगडे, गणेश बावणे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, राजू रेड्डी, राकेश रेप्पेलीवार, सचिन मांडाळे, भोजराज शर्मा, राहुल वाघ, पवन जाधव, प्रतीक भांडवलकर, सनी शर्मा, ऋतिक मडावी, संदीप बिसेन, निशांत लिंगमपल्लीवार, अंकित ढेंगारे, पवन बंडीवार, चेतन अनंतवार यांनी अथक परिश्रम घेतले.