Tag: चंद्रपूर शिवसेना

  • Sandip Girhe : बल्लारपूर शहर कांग्रेस उपाध्यक्षाचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    Sandip Girhe : बल्लारपूर शहर कांग्रेस उपाध्यक्षाचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवसेना पक्षासाठी महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष सतीश नंदाराम यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला.. चंद्रपूर शिवसेना जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम झाला, जिथे नंदाराम यांचे गिर्हे यांनी शिवबंधन आणि दुपट्टा घालून स्वागत केले. Shiv sena

     

    पक्षप्रवेेेश वेळी उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात संघटना बांधणीत मोलाचा वाटा उचलला आहे. Uddhav balasaheb thackeray

     

    त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात पक्षाची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आकर्षित झाले आहेत. पक्षात नुकतीच झालेली ही भर म्हणजे चंद्रपुरात शिवसेनेचा सुरू असलेला वेग आणि विस्तार. अधिकाधिक व्यक्तींनी त्याची दृष्टी ओळखून स्वतःला त्याच्या तत्त्वांशी जुळवून घेतल्याने पक्षाचा विकास होत आहे. Sandip girhe

     

    संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली, पक्ष आपली वाढ सुरू ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यात अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी तयार आहे. लोकांची सेवा करण्याची आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची शिवसेनेची बांधिलकी अनेकांना ऐकू येत आहे, ज्यामुळे समर्थन आणि सदस्यसंख्या वाढली आहे. Shivsena ubt

     

    पक्ष विविध पार्श्वभूमीतील नेते आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करत असल्याने, चंद्रपूरमधील एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून पक्षाने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. सतीश नंदाराम यांचा शिवसेना पक्षात समावेश हा पक्षाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा आणि समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचे समान ध्येय असलेल्या व्यक्तींना एकत्र आणण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. संदीप गिऱ्हे यांच्यासारख्या नेत्यांनी नेतृत्व केल्याने शिवसेना चंद्रपुरात उज्ज्वल भवितव्यासाठी सज्ज झाली आहे. Leadership

  • Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

    Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 14 फेब्रुवारी रोजी दुर्गापुरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यालयाची स्थापना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक भागात शिवसेनेचे कार्यालय असावे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. Citizens

     

     

    शिवसेना पक्ष हा नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे. विविध भागात जनसंपर्क कार्यालये स्थापन करून, नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि पक्षाकडून मदत मागण्यासाठी एक समर्पित जागा उपलब्ध करून देण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी यावेळी केले. Public relations office

     

     

    दुर्गापूर पोलीस स्टेशनसमोर जनसंपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, माजी महानगरप्रमुख, प्रमोद पाटील व प्रा. शालीक फाले आणि परिसरातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

  • MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

    MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 25 जानेवारीला युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती.
    शिवा च्या हत्येनंतर सरकारनगर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी वेळेवर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. Justice for shiva wazarkar

     

    एक क्षुल्लक वाद आणि त्या वादातून शिवा वर 8 जणांनी हल्ला केला, आधी पोटात चाकू खुपसला नंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोवर शिवा चा मृत्यू झाला होता.

     

    शिवा च्या पोटात चाकू खुपसणारा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा हिमांशू कुमरे होय, चाकू चा वार झाल्यावर शिवा जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणारे स्वप्नील काशीकर, रिजवान पठाण, चैतन्य आसकर, नाजीर खान, रोहित पितरकर, सुमित दाते अन्सार खान हे होते.

     

     

    पोलिसांनी या प्रकरणी सर्व 8 आरोपीना अटक केली आहे, हिमांशू ने शिवा ला तुझ्या वडिलांची औकात काय? 300 रुपये रोजीने जाणारा तुझा बाप असे हिनवले होते, त्या कारणावरून हे हत्याकांड घडले. Shivsena chandrapur

     

     

    मात्र ज्याप्रकारे हे हत्याकांड घडलं त्यावरून सर्व नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून घटना घडविण्यात आली असा आरोप शिवा च्या कुटुंबानी केला आहे.

     

    शिवा च्या कुटुंबाची पालकमंत्री मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते, सर्व आरोपीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

     

    29 जानेवारीला शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथे शिवा ला सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली, यावेळी आरोपीना फाशी ची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

     

    घटनाक्रम काय?

    25 जानेवारीला शिवा च्या मोबाईल वर हिमांशू ने कॉल करीत त्याच्या वडीलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले, आणि वाद चिघळला, शिवा याबाबत हिमांशू ला जाब विचारण्यासाठी गेला, सरकार नगर येथील शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचा माजी पदाधिकारी स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयासमोर वाद सुरू झाला.

     

    हिमांशु ने तब्बल 20 ते 40 युवकांचा घोळका जमवून ठेवला होता, शिवा आपल्या काही सहकाऱ्यासोबत त्याठिकाणी हिमांशू ला जाब विचारायला गेला, आधी बाचाबाची त्यांनतर शिवा ने हिमांशू च्या कानाखाली लावली आणि लगेच हिमांशू ने धारदार चाकूने शिवा वर हल्ला केला, या हल्ल्यात शिवा ठार झाला.

     

    पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत 8 आरोपीना अटक केली, मात्र पोलीस कस्टडी मध्ये असताना पोलिसांनी आपली मैत्री कायम ठेवत आरोपीना VIP ट्रीटमेंट दिली, ही बाब वरिष्ठांना कळताच त्यांनी तात्काळ काही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.

     

    Vip ट्रीटमेंट ही आरोपीसाठी काही नवी नव्हती, याआधी स्वपिल काशीकर ने गोंडपीपरी येथील कुलथा नदीच्या घाटावर स्थानिक सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्ष सहित गावकऱ्यांना मारहाण केली होती, त्यावेळी स्वप्नील काशीकर व इतर आरोपीवर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विविध कलम दाखल झाले होते, विशेष बाब म्हणजे गोंडपीपरी चे तत्कालीन ठाणेदार यांच्याशी त्यावेळी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्वप्नील काशीकर हा फरार आहे, आम्ही त्याच्या मागावर असून लवकर तो पोलीस कस्टडी मध्ये असेल असे सांगितले होते, मात्र आरोपी काशीकर याचा मोबाईल तेव्हा सुरू होता, पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही आणि सदर गंभीर गुन्ह्यात तो महिन्याभरात जामिनावर बाहेर आला होता.

     

    काशीकर याची पोलिसांसोबत चांगलीच मैत्री होती, याबाबत News34 कडे पुरावे सुद्धा उपलब्ध आहे.

    गंभीर गुन्ह्यात आरोपी सहज सुटतो, सामान्य नागरीक अश्या गुन्ह्यात अडकल्यावर त्याला आत गेल्याशिवाय पर्याय नाही, मात्र काहींचा अपवाद वगळता.

     

    जर काशीकर या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला नसता तर आज हे हत्याकांड कदाचित घडले नसते.

    यामध्ये दोष द्यायचा कुणाला? ज्याप्रकारे आज राजकीय क्षेत्रात गुंड पक्षप्रवेश करीत आहे, त्या पद्धतीने आज संघटित गुन्हेगारी घडत आहे, भाई ने बोल दिया तो काम करना पडेगा अशी अवस्था आज तरुणाईची झाली आहे.

     

    मागचा पुढचा विचार न करता तरुणाई काहीपण करायला तयार असते ही सुरुवात काही वर्षांपूर्वी चंद्रपुरात सुरू झाली होती व आजही ती सुरूच आहे. आज शिवाच्या मारेकऱ्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली मात्र या नेत्यांनी कधीतरी शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीला विरोध केला काय? यावर सामान्य नागरिकांना एकदा तरी विचार करायला हवा.

     

    शिवा च्या मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी होत आहे, मात्र तो कायदा काय आहे हे आपण जाणून घेऊया…

    टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय.

    हा कायद्याचा वापर कधी केला जातो?

    गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

     

    मोक्का कधी लावला जातो?

    गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

    कोणावर मोक्काची कारवाई होते ?

    हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.

    मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी अवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.

    शिक्षा काय?

    मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.

  • Chandrapur News :शिवा वझरकर हत्याकांडात राजकीय अँगल? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

    Chandrapur News :शिवा वझरकर हत्याकांडात राजकीय अँगल? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अरविंद नगर येथे राहणारा ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर यांची 25 जानेवारीला निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या प्रकरणी 3 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. Chandrapur yuvasena

     

    तुझा बाप 300 रुपये रोजीने पोह्याच्या ठेल्यावर काम करतो, तुझी औकाद काय? हे वाक्य आहे हिमांशू कुमरे याच, त्याने शिवा वझरकर याला या शब्दात हिनवले, यावरून दोघांचा मोबाईल वर वाद झाला.

     

    हिमांशू आपल्याला असा का बोलला, याबाबत जाब विचारायला गेलेला शिवा गेला पण तो परतलाच नाही, 25 जानेवारीला अग्रवाल कोचिंग सेंटर जवळील स्वप्नील काशीकर यांच्या कार्यालयात शिवा ची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. Ram nagar police station

     

    स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयात शिवा पोहचला त्याठिकाणी हिमांशू कुमरे आपल्या सहकाऱ्यांसोबत आधीच पोहचून होता, शिवा ने हिमांशू ला जाब विचारला असता आधी दोघांची बाचाबाची झाली, त्यानंतर वाद वाढत असताना दोघेही काशीकर याच्या कार्यालयाच्या बाहेर आले, आणि वाद मारहानी पर्यंत पोहचला.

     

    त्यामध्ये स्वप्नील काशीकर ने हिमांशू कुमरे ला कार्यालयात नेले हिमांशू जेव्हा बाहेर परतला त्यावेळी त्याच्या हातात धारधार शस्त्र होते.

     

    अचानक हिमांशू ने शिवा च्या पोटात धारदार शस्त्राने वार केला, यामध्ये शिवा खाली कोसळला, त्यानंतर हिमांशू, स्वप्नील काशीकर, रिझवान पठाण, चैतन्य आसकर, रोहित पितरकर, नाझीर खान, सुमित दाते, अन्सार खान यांनी लाथा-बुक्क्यांनी शिवा ला मारहाण करणे सुरू केले.

    शिवा सोबत आलेले हिवराळें यांनी तात्काळ शिवा ला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, पोलिसांनी आतापर्यंत या घटनेत 4 आरोपीना अटक केली असल्याची माहिती आहे.

     

    स्वप्नील काशीकर हा 2 दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता, गोंडपीपरी येथील कुलथा रेती घाटावर स्वप्नील ने सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्षला बेदम मारहाण केली होती, त्या प्रकरणात स्वप्नील काशीकर वर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, मात्र तो जामिनावर बाहेर आला कसा हा एक शोधाचा विषय आहे, स्वप्नील च्या जामीनामागे मोठं अर्थकारण दडल्याची माहिती आहे.

     

    स्वप्नील काशीकर याला वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पदावरून गोंडपीपरीच्या प्रकरणानंतर डिसेंबर महिन्यात पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी वझरकर हत्याकांडात दोषी असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, या हत्याकांडाला कसलेही राजकीय अँगल नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीवर कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे, आरोपीमध्ये हिमांशू कुमरे हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे.

     

  • आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    Mla Disqualification result  चंद्रपूर –  निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. Mla Disqualification result

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत महिलांचा संताप 

    यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे व त्याचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर थेट आक्षेप घेतला आहे.

    गिऱ्हे यांनी म्हटले आहे की, जर अध्यक्षांना शिवसेनेची २०१८ ची घटना (ज्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली) अमान्य असेल आणि ती घटनाबाह्य ठरवली असेल, तर त्याच घटनेवर आधारित पक्षप्रमुखांनी दिलेला ‘ए-बी’ फॉर्म घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार २०१९ मध्ये निवडून आले, हे कसे काय घटनाबाह्य ठरवले जात नाही? अध्यक्षांनी एकाच घटनेचे दोन वेगवेगळे निकष लावले आहेत. एकीकडे २०१८ ची घटना नाकारायची आणि दुसरीकडे त्याच घटनेच्या आधारावर निवडून आलेल्या आमदारांची वैधता मान्य करायची, हा न्याय विसंगत आहे. नार्वेकर यांच्या निकालावर आम्ही हा कायदेशीर प्रश्न उपस्थित करतो.

  • शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं जंगी स्वागत

    शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं जंगी स्वागत

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल येथे विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यात मेळावा तथा पदाधिकारी बैठकीला जातांना मुल शहरातील गांधी चौक येथे थांबून गांधिंजोंच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.

     

    त्या नंतर शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची साहेबांनी आस्थेने विचारपूस केली आणि नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी ला लागा मी स्वतः मुल शहरात येऊन लक्ष घालेन असे आश्वासन दिले.

     

    सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं मनोबल या वेळी वाढले असून सर्व पदाधिकारी यांना निवडणुका संधर्भात निर्देश दिले.

     

    यावेळी वेळी प्रामुख्याने युवासेना तालुका प्रमुख रितीक संगमवार,शहर प्रमुख आकाश राम,युवा शहर प्रमुख अमित आयालानी,मनोज मोहूर्ले,महेश चौधरी,सुनील काळे,नयन यलचलवार,हितेश निकोडे,युवी कोरडे,विनोद चलाख, गितेश घोडे,धनु लेंनगुरे,अनुराग आत्राम,संदीप रायपुरे,यश संगमवार,विशाल नालूरवार आदी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

    चंद्रपुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरात 17 डिसेंम्बरला शिवसेनेचे पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव पक्षाच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले.

     

    गडचिरोली दौरा आटोपताच सायंकाळी जाधव चंद्रपुरात पोहचले, शहरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याला जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना-भाजप युतीचा इतिहास सांगितला, वर्ष 86-87 मध्ये जेव्हा युती झाली त्यावेळी भाजपला राज्यात कुणी ओळखत नव्हतं त्यासाठी शिवसैनिक राबला, आज भाजप दिल्लीच्या तखतवर बसला आहे ते फक्त शिवसेनेमुळे, शिवसैनिक नसता तर राज्यात तुमची बिकट परिस्थिती असती मात्र भाजपने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी-कांग्रेस पक्षासोबत युती करीत सत्ता स्थापन केली पण आपल्या गद्दारानी भाजप सोबत जात ठाकरे साहेबांना धक्का दिला, ते म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादि व कांग्रेस सोबत गेलात म्हणून आम्ही वेगळे झालो मात्र अडीच वर्षे मंत्रिपद घेताना या गद्दाराना लाज वाटली नाही.

     

    कार्यक्रमापूर्वी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या भव्य बाईक रॅली ने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले, सदर बाईक रॅली शहराचे भ्रमण करीत मातोश्री विद्यालयात कार्यक्रम स्थळी दाखल झाली.

     

    आयोजित कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जीवतोडे, युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, युवासेना सरचिटणीस रोहिणी पाटील, जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हाप्रमुख उज्वला नलगे, प्रमोद पाटील, सुरेश पचारे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

  • चंद्रपुरातील ते देशी दारूचे दुकान तात्काळ हटवा – चंद्रपूर शिवसेना आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपुर :- जिल्ह्यातील चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्दीतील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातन अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आलेले मालक-हरीश भोजा शेट्टी यांचे सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यासंदर्भात चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला.

     

    आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल, चंद्रपुरच्या वतीने जिल्हा महामंत्री दिपक रेड्डी यांनी दि.06/09/2023 ला निवेदन देवून सदर विषयाची दखल न घेतल्यामुळे संदर्भीय पत्राच्या अनुसंगाने चंद्रपुर शहर मनपा येथील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातण अष्टभुजा देवीचे मंदिर असून येथे देशभरातून येणाऱ्या भक्त भाविक मोठ्या संख्यने पूजा अर्चना करण्यासाठी येत असुन मंदिरालगत नुकतेच नव्याने देशी दारूचे दुकान (मालक-हरीश भोजा शेड्डी ला. नं. 133/2023-24) देण्यात आले आहे.

     

    यामध्ये शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने दारूचा परवाना देण्यात आलेल्या सरकारी देशी दारूच्या दुकानात सर्रासपणे विदेशी दारू व बियरची विक्री केली जात असल्यामुळे दारू पिवून दारूच्या नशेत देवीच्या मंदिरात भक्त भाविक पूजा अर्चना करण्यासाठी ये-जा करीत असतांना अश्लील भाषेत शिविगाळ करुन अपशब्दात बोलत असतात.
    त्यामुळे मंदिर येणाऱ्या महिला, पुरुष, मुले, मूली व लहान बालकांना सदर प्रकरणापासून फार मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे.

     

    त्याकरिता पुरातण अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्याचे आदेश देवून देशभरातून येणाऱ्या भक्त भाविकांना पूजा अर्चना करणे सोइस्कर होईल याची दक्षता घेण्यात यावी.

     

    अन्यथा आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीने सदर प्रकरण हाताळावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला. यावेळी चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा महामंत्री दिपक रेड्डी, राजू रायपुरे, सुरेंदर अंचल, गोविन्द प्रसाद व पप्पू कोठारिया उपस्थित होते.

  • चंद्रपुरात शिवसेनेची होऊ द्या चर्चा मोहीम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेट देवून सर्वसामान्य नागरीक सोबत, होऊ द्या चर्चा ची मोहीम राबविली जात आहे. होऊ द्या चर्चा मोहीम च्या माध्यमातून थेट महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून थेट सर्व सामान्य नागरिकांची कशी फसवणूक होत आहे याबाबत जनतेशी थेट संवाद साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे.

     

    महागाईचे चटके, शासनाकडून पारित होणाऱ्या अनेक योजना यांचा दुजा भाव त्यापासून वंचित असणारा शेतकरी, शेतमुजर, कामगार ,आणि सर्वसामान्य जनता, शेतकऱ्याची आत्महत्या ,शिवस्मारक साठी दिलेले वचन ,कामगार कायद्यात होणारे बदल, महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग ,इंधन वाढ, महागाईने त्रस्त झालेली जनता , खाजगी करन धोरण, अश्या प्रकारे अनेक विषय सदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
    1 ऑक्टोम्बरला सी.एस.टी.पी.एस. मेजर गेट समोर ,दुर्गापूर चंद्रपूर, मित्र नगर चौक,रामनगर ,चंद्रपूर,  पडोली चौक,नागपूर रोड चंद्रपूर येथे होऊ द्या चर्चा या मोहिमेच्या माध्यमातून एका दिवशी तीन सभा घेण्यात आल्या. सभे दरम्यान अनेक नागरिकांनी प्रतिसाद देत केंद्र आणि राज्य सरकार वर अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आल्या.

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा चंद्रपूर च्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला थेट मुंबई येथील शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक मुंबई महानरपालिका पाटील साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात तसेच चंद्रपूर माजी महानगर प्रमुख प्रमोद भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात युवा सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव सौ.रोहिणी ताई पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत भाऊ सहारे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सुमित भाऊ अग्रवाल, जिल्हा समन्वयक विनय भाऊ धोबे, युवा सेना शहर प्रमुख शहाबाज शेख, वसीम भाई, ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊ डोयकावळे, तोसिफ खान, सोनू भाऊ ठाकूर,देवकुमार विश्वकर्मा, अशोक भाऊ चिलखरे, शिवसेना प्रणित कंत्राटी कर्मचारी सेना वीज निर्मिती क्षेत्र अध्यक्ष प्रफुलभाऊ सागोरे, सचिव प्रमोदभाऊ कोलारकर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला ताई नलगे,शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वर्षाताई कोठेकर, माजी जिल्हा संघटीका कुसुमताई उदार,नीलिमा ताई शिरे, शिवसेना पदाधिकारी व अनेक शिवसैनिकांच्या तसेच असंख्य जागृत जनसमुदायाच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.