Tag: चंद्रपूर ताडोबा महोत्सव

  • Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini : चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवात हेमा मालिनीचे आगमन

    Hema malini चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांचे गंगा नृत्य नाटिका सादरीकरणासाठी 3 मार्चला चंद्रपुरात आगमन झाले.

    Hema malini 1 मार्चपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित ताडोबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

    पालकांनो लक्ष द्या : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळ ची डबी

    यावेळी हेमा मालिनी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करीत वनाचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे अशी बाब त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    सोबतच त्यांना लोकसभा निवडणुकीची मथुरा येथून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. 3 दिवस चालणाऱ्या ताडोबा महोत्सवात बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या गंगा नृत्य करणार आहे, नदीचे रक्षण कसे करावे, त्यासाठी काय उपाययोजना असाव्या याबाबत गंगा नाटिका मध्ये नृत्याद्वारे संपूर्ण विश्लेषण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 3 दिवसीय ताडोबा महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आस्वाद चंद्रपूर वासीयांना मिळणार आहे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या वाघांची विशेषतः व त्यांची ओळख जगाला व्हावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश्य आहे, ताडोबा महोत्सवाचा प्रचार प्रसार सध्या जोमात सुरू असून यासाठी सौंदर्य स्पर्धा विजेत्यांनी आपल्या देशात ताडोबा अभयारण्याचा प्रचार सुरू केला असून त्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात ताडोबाचा वाघ काय आहे? किती संख्या वाघांची आहे याबाबत परदेशी पर्यटकांना सुद्धा संखोल माहिती मिळणार.

  • VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    VIP Festival : ताडोबा महोत्सवातील VVIP, VIP व प्रीमियम प्रेक्षक कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चांदा क्लब मैदानावर 1 ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सवाचे भव्य आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. Vip culture

     

    1 मार्च ला सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा अनुभव नागरिकांना बघायला मिळाला. Poor planning

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची तुडुंब गर्दी झाली, मात्र वनविभागाच्या कोट्यवधीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसला, नागरिकांना बसायला जागा नसल्याने त्यांनी जमिनीवर आपले बस्तान मांडत कार्यक्रम बघितला. Tadoba Festival

     

    ताडोबा महोत्सव कार्यक्रमात VVIP, VIP, GOLD व PREMIUM असे पासेस बनविण्यात आले होते मात्र ते पास सामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेचं नाही. Tadoba mahotsav

     

    याबाबत माहिती काढली असता VVIP रांगेत राजकीय पक्षाचे पुढारी बसलेले होते, VIP रांगेत नागरिक सह पत्रकार हे उभे होते, खुर्ची न मिळाल्याने अनेकजण vip रांगेत खालीच बसले. Vip Member

     

    चंद्रपूर मनपाच्या महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या नेत्याने VVIP पासेसचा गठ्ठा जवळ ठेवला होता, त्यांनी ते vvip पासेस आपले कार्यकर्ते व प्रभागातील श्रीमंत नागरिकांमध्ये वितरण केले. भावी महापौर यांच्या या कृत्याने सामान्य नागरिकांना पासेस मिळाले नाही त्यामुळे अनेकांना कार्यक्रम बघण्यापासून मुकावे लागले. Political vip

     

    नागरिकांच्या तोंडातून यावेळी एकच उदगार निघाले “हा कार्यक्रम प्रायव्हेट लिमिटेड आहे की शासकीय?” 3 दिवस चालणाऱ्या का कार्यक्रमाचे एकूण बजेट 9 कोटी रुपये म्हणजे दर दिवसाला 3 कोटींचा खर्च, इतके वर्ष ताडोब्यात असे कार्यक्रम झाले नाही तर मग यावर्षीचं हा इव्हेंट का आयोजित करण्यात आला, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

     

    जनतेच्या करातून केल्या जाणारी कोट्यवधी रुपयांची ही मोठी उधळण सध्या चंद्रपुरात सुरू आहे. विशेष म्हणजे जनविकास सेना व्यतिरिक्त या इव्हेंट ला कुणी ही विरोध दर्शविला नाही.

     

    जनतेच्या हक्कासाठी लढणारे पक्ष आज तोंडात मृग गिळून गप्प बसले आहे, निवडणुकीच्या वेळी याना जनता आठवते मात्र नागरिकांचा काहीएक फायदा नसलेल्या भव्य आयोजनाला यांचा विरोध दिसत नाही.

     

    पोलीस विभागाने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एक रस्ताचं महोत्सवासाठी बंद केला, एकंदरीत कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाने केलेला हा अयशस्वी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र त्याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षीपासून सुरू झालेल्या या इव्हेंट्मुळे शासकीय कर्मचारी सुद्धा वैतागला आहे, कार्यालयातील कामे सोडून त्यांना इव्हेंट्स मध्ये आपली हजेरी लावावी लागत आहे.

  • Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

    Bharat Mata : चंद्रपुरात पुन्हा विश्वविक्रम, 65 हजार 724 वृक्षांनी साकारलं भारत माता

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 2 मार्च रोजी ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वनविभागाने प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. वनविभागाने स्थानिक समुदायाच्या सहकार्याने रामबाग येथे 26 विविध प्रजातींची तब्बल 65,724 झाडे वापरून “भारत माता” हे नाव यशस्वीपणे तयार केले. Bharat Mata

     

    यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त करताना ताडोबा अभयारण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी ताडोबा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. Guinness book of world record

     

    झाडांचा वापर करून “भारत माता” नावाची निर्मिती केवळ राष्ट्रीय अभिमानाचेच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी भारताच्या वचनबद्धतेचा दाखलाही आहे. मंत्री मुनगंटीवार यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पार्कची स्थापना करण्याचा मनोदय व्यक्त केला. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या शब्दसंग्रहातून “ग्लोबल वॉर्मिंग” हा शब्द काढून टाकण्यासाठी भारताचे समर्पण प्रदर्शित करणे हे अंतिम ध्येय आहे. ताडोबा अभयारण्य आणि त्याच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरुकता वाढवणे हा ताडोबा महोत्सवाचा उद्देश आहे. Tadoba sanctuary

     

    हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून, वनविभाग आणि स्थानिक समुदायाने चंद्रपूरला पर्यावरण संवर्धनाचा चॅम्पियन म्हणून नकाशावर यशस्वीरित्या आणले आहे. भविष्यात, या प्रदेशातून उड्डाण करणारे कोणीही “भारत माता” या नावाच्या भव्य दर्शनाने स्वागत केले जाईल, जे भारताच्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून काम करेल. अशा उपक्रमांद्वारे, भारत हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांसह जगाला प्रेरणा देत आहे. ताडोबा महोत्सवाची विक्रमी कामगिरी ही पुढील पिढ्यांसाठी आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वनविभाग, स्थानिक समुदाय आणि संपूर्ण देशाच्या सामूहिक निर्धाराचा पुरावा आहे. Tadoba festival chandrapur

  • Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

    Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 1 मार्चपासून चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, 3 मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन सिनेअभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. Tadoba festival

     

    आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती. Chandrapur

     

    प्रसार माध्यमांशी यावेळी रविना टंडन यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की असे आयोजन भविष्यात सुद्धा व्हायला पाहिजे. Sustainable tourism

     

    चंद्रपुरात ताडोबा सारखे अभयारण्य संपूर्ण जगात प्रख्यात आहे, आज उदघाटन कार्यक्रमात मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला त्यांच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रकृती व ताडोबा ची प्रसिद्धी होणार. Tadoba tiger

     

    महाराष्ट्र आपल्या वन संपदेसाठी किती जागरूक आहे हा या माध्यमातून जगात संदेश जाणार. उदघाटन कार्यक्रम नंतर sand artist सुदर्शन पटनायक यांनी मातीच्या साहाय्याने वाघाची कलाकृतीची तयार केली, त्यानंतर प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. Tadoba mahotsav

     

    उदघाटन कार्यक्रमात नागरिकांची असंख्य संख्येत उपस्थिती होती.

  • Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार,  पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहे. सदर पत्रही त्यांनी पाठवले आहे.  Tadoba mahotsav

     

          वन विभागाच्या वतीने ताडोबा महोत्सव २०२४ चे आयोजन १ मार्च ते ३ मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. ताडोबा महोत्सव 2024 चे उद्दिष्ट ताडोबाची यशोगाथा साजरी करणे आणि ती जागतिक मंचावर प्रकाशित करणे हि आहे. मात्र सदर महोत्सव साजरा करत असतांना ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील प्राण्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेर्यात टिपून येथील सौंदर्य जगात पोहोचविणार्या वन्यजीव छायाचित्रकरांचा विसर पडता कामा नये. त्यासोबतच अनेक पत्रकार वृतांकनच्या माध्यमातून ताडोब्याच्या प्रसिद्धीसाठी काम करीत आहे. Forest conservation

     

    तसेच वन्यजीव संस्था वन विभागातील कर्मचारी – अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून वन्य प्राणी संरक्षणाचे ईश्वरीय कार्य करीत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या वनसंपत्तीचे संरक्षण केले आहे. यांच्या एकत्रित योगदानामुळेच आज ताडोबा व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावर पोहचले आहे. Wildlife conservation

     

    या सर्वांच्या सामुहिक योगदानाशिवाय ताडोबा महोत्सवाची संकल्पनाच अपुरी राहील त्यामुळे अश्या आयोजनात ताडोबाच्या प्रसिद्धीत, संरक्षणात उल्लेखनीय योगदान असलेल्या या सर्व घटकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सेवाकार्याची पावती देण्यात यावी अशा सूचना त्यांनी क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांना पाठविलेल्या पत्रातुन केल्या आहे.

  • Chandrapur Festival : उत्सव पुरे झाले जनतेच्या समस्येकडे लक्ष द्या – माजी नगरसेवक पप्पू देशमुख

    Chandrapur Festival : उत्सव पुरे झाले जनतेच्या समस्येकडे लक्ष द्या – माजी नगरसेवक पप्पू देशमुख

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा व उत्सव घेण्याची होड लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट चपराशापर्यंत सारेच्या सारे शासकीय अधिकारी-कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून उत्सव व स्पर्धांचे आयोजन करण्यात गुंतले आहेत. उत्सवांच्या आयोजनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करायला वेळ मिळत नाही.

     

    परिणामी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले. यावर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज दि.1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले. ‘उत्सव पुरे झाले आता जनतेची कामे करायला अधिक वेळ दिला पाहिजे’, अशी भूमिका देशमुख यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेटून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

     

    तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ? देशमुख यांचा प्रशासनाला ईशारा

    महानगरपालिकेने 7 वर्षात 250 कोटी रुपये खर्च करून चंद्रपूरकरांना अमृत योजनेचे पाणी बरोबर मिळत नाही, जागोजागी कचरा वाढला असून सांडपाणी वाहून देणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. मोठ्या प्रमाणात डासांची वाढ झाली.रस्त्याच्या मधे जागोजागी असलेल्या खड्ड्यांनी लोकांचे हाडे मोडकळीस आली.

     

    धुळीचे प्रदूषण,सरकारी दवाखान्याची दुरावस्था, रस्त्यावरील जीवघेणे अपघात,प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.जनतेच्या समस्या किंवा मागण्यांच्या बाबत राजकीय पक्ष,सामाजिक संघटना किंवा नागरिकांनी लेखी पत्र देऊन व वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या स्तरावर ठोस कार्यवाही होत नाही. एकीकडे जनतेच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो असा ईशारा देशमुख यांनी या पत्रातून दिला आहे.

    उत्सवाच्या आडून कोट्यावधीच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न ?

    जनतेच्या मनोरंजनाच्या नावाखाली उत्सव व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा अतिरेक होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा व उत्सव यावर अनेक कोटी रूपयांची उधळपट्टी होऊन राहिली. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शासकीय अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात करोडो रुपयांची लूट करीत आहेत. विविध उत्सव आणि स्पर्धांचे आयोजन करून जनतेच्या डोळायात धूळ फेकण्याचा, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी करित आहेत, असा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला.

  • Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य सरकारने धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ओसाड पाड्याचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या पवारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 20 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Forest conservation

     

    कोण आहे चैतराम पवार? जाणून घ्या chaitram pawar

     

    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनवासी चैत्राम पवार यांनी 1992 पूर्वीच्या उजाड आणि ओसाड असलेल्या मालरण प्रदेशात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अढळ आशावाद आणि गावातील आदिवासी बांधवांच्या पाठिंब्याने पवारांनी समृद्ध गाव निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला. बारीपाडाच्या यशाने जगभरातील तज्ञांचे लक्ष वेधून घेतले, 78 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ते दुसरे स्थान मिळवले. शिवाय, बारीपाडा प्रकल्पाला IFAD या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मान्यता मिळाली. Maharashtra vanbhushan award

     

    चैत्राम पवार यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये आपला प्रयत्न वाढवला आहे. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागात वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आहेत. Baripada

     

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या वनविभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल चैत्राम पवार यांचे कौतुक केले. राखीव वनक्षेत्र आणि परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन, पर्यावरण विषयक उपक्रमात पवारांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. 3 मार्च रोजी चंद्रपूर येथील ताडोबा महोत्सवात हा पुरस्कार सोहळा होणार असून त्यात चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Chandrapur tadoba festival

     

    ही मान्यता पवारांच्या समर्पणाचा आणि बारीपाड्याला समृद्ध समाजात रूपांतरित करण्यासाठी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचा दाखला आहे. चैत्राम पवार यांचा प्रवास ही एक प्रेरणादायी यशोगाथा आहे जी श्रमशक्ती आणि लोकांच्या अदम्य भावनेचे दर्शन घडवते. पर्यावरण आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना पहिला वनभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करताना महाराष्ट्राला अभिमान वाटतो. Tribal community