Tag: चंद्रपूर जिल्हा

  • Jiwati Taluka : बीआरएस पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

    Jiwati Taluka : बीआरएस पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    जिवती – चंद्रपूर जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनांनी प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजुरा विधानसभेत बीआरएसला मिळणारा वाढता पाठिंबा जनभावना बदलल्याचे सूचित करतो. 12 ऑक्टोबर 2023 रोजी, BRS ने त्यांचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली जिवती तालुक्यात एक मोठा निषेध मोर्चा काढला होता. Jiwati taluka

     

    “अब की बार, किसान सरकार” (यावेळी शेतकऱ्यांसाठी सरकार) अशा घोषणा देत हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या टोकाला असलेला जिवती तालुका 21 वर्षांपूर्वी स्थापन झाला असला तरी विकासाच्या बाबतीत अजूनही मागे आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुख्य रस्ते, आरोग्य सेवा, पिण्याचे शुद्ध पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. परिसरातील शिक्षण व्यवस्थेतही सुधारणेची नितांत गरज आहे. शेतजमिनीचे पट्टे मिळावेत ही येथील लोकांची प्राथमिक मागणी आहे. तालुक्यातील जमीन परिवर्तनाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकरी अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. Bharat rashtra samiti

     

    या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसने जिवती तालुक्यातील वनविभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करून स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करण्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू केला. जिवती तालुक्यातील रहिवाशांनी आपल्या मूलभूत मागण्यांची निकड अधोरेखित करत या अनिश्चित काळासाठीच्या उपोषणाला मोठ्या संख्येने आकर्षित केले. Agitations

     

    जिवती तालुक्यातील लोकही सिंचन प्रकल्प, तरुणांना रोजगार वाढविण्यासाठी उपाययोजना, गावागावात पाण्याचे नळ बसवून शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे, निवारागृहे, ग्रामीण रुग्णालये, बसस्थानक, न्यायालये, वसतिगृहे, बीएसएनएल मोबाईलची उभारणी आदी मागण्या करीत आहेत. टॉवर, खेळाची मैदाने आणि लायब्ररी. या मागण्या या प्रदेशातील सर्वसमावेशक विकास आणि प्रगतीची इच्छा दर्शवतात. Protest march

     

    भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांनी जिवती तालुक्याला भेडसावणाऱ्या प्रदीर्घ समस्यांकडे लक्ष वेधले असून रहिवाशांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे. या आंदोलनांचा चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर काय परिणाम होतो हे पाहणे बाकी आहे.

  • Crime Prevention : विविध गुन्ह्यात फरार आरोपी देशी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Crime Prevention : विविध गुन्ह्यात फरार आरोपी देशी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.  मात्र, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नियुक्तीमुळे या समस्येला सामोरे जाण्याची आशा आणि दृढनिश्चय नव्याने निर्माण झाला आहे.  सक्रिय दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसह, मुमक्का सुदर्शन जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध मोहिमा राबवत आहे. Crime rates

     

    याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करीत त्याच्याजवळून एक देशी कट्टा व 2 जिवंत काडतुसे जप्त केली. Chandrapur district

     

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 14 फेब्रुवारीला पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाला अटक केली, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार एक इसम देशी कट्टा बाळगत आहे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांनी आपल्या टीम सह त्याठिकाणी धडक दिली असता त्या इसमाला ताब्यात घेण्यात आले. Crime rates

     

    पोलिसांनी 32 वर्षीय नौशाद कुरेशी यांच्याजवळून 1 देशी कट्टा व 2 जिवंत काडतुसे जप्त केली, आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याच्यावर घुग्गूस, राजुरा, वरोरा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.

     

    विशेष म्हणजे आरोपी नौशाद कुरेशी हा विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा होता, मात्र तो कुणाच्या हाती लागला नाही, अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात नौशाद अडकला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, नागेशकुमार चतरकर, किशोर शेरकी, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, गोपाल आतकुलवार व नितीन रायपुरे यांनी केली.

     

  • चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

    चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला तापमान 9 अंशावर, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

    News34 chandrapur

    चंद्रपूर — जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात घट झाली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. सकाळी पारा 9 अंशावर घसरला असून त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यासोबत शेकोटीचा आधार घेतला.

     

    जिल्ह्यात उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा हे तिन्ही ऋतू आपला रंग जोमात दाखवितात, पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सुरुवात झाली मात्र त्यानंतर थंडी ची चाहूल लागली नव्हती.

     

    वर्षाच्या शेवटच्या महिन्यात थंडी ने कहर करायला सुरुवात केली असून ग्रामीण असो की शहरी भाग नागरिकांना आता थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी हा महत्वपूर्ण आधार मिळाला आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/नागपूर – चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आल्या नंतर मोठ्या प्रमाणात दारु परवाणे वाटप करण्यात आले आहे. मात्र हे परवाणे वाटप करत असतांना काही ठिकाणी शासन नियमांचे उलंघन झाले आहे. या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दारु दुकानांना परवाणा देत असताना शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

     

    चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आली आहे. याला आता दोन वर्ष पुर्ण होत आले. चंद्रपूरात दारु बंदी असताना सर्रासरित्या अवैध दारु विक्री सुरु होती. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध दारुविक्रीच्या व्यवसायात गुंतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील दारुबंदी उठविण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हाची दारु बंदी हटविली होती. त्यानंतर अनेक दारु दुकानांना परवाणा देण्यात आला. मात्र यात नियमांची पायमल्ली करण्यात आली असल्याचा आरोप झाला. या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.

    दरम्यान आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, मागच्या सरकाने दारु बंदी उठविण्याचा चांगला निर्णय घेतला होता.

     

    दारुबंदी झाली तेव्हा 350 परवाने चंद्रपूर जिल्हात होते. दारुबंदी उठल्या नंतर अडिच वर्षात 733 परवाण्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी 75 मीटर पर्यंत शाळा नसावी, धार्मीक स्थळ नसावे ही अट असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात नवे परवाणे देण्यात आले आहे. त्यामुळे या विरोधात अनेक आंदोलने झाली आहे. यात महिलांच्या भावना तिव्र आहेत. त्यामूळे दारु दुकानांना नव्याने परवाणा देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

  • चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

    चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलच्या कामाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या हॉस्पीटलचे केवळ 30 टक्के काम झाले होते. मात्र गेल्या एक वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलच्या उभारणीकरिता घेतलेल्या नियमित बैठका आणि, शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता हॉस्पीटलचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

     

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबईवरून दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा, जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, टाटा कॅन्सर हॉस्पीटलचे डॉ. कैलाश शर्मा व त्यांची टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांची उपस्थिती होती.

     

    चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘27 जून 2019 ला या हॉस्पीटलच्या बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले. मात्र अडीच वर्षे या रुग्णालयाचे काम पूर्णपणे थंडबस्त्यात पडले. गेल्या वर्षीपासून या कामाला गती देण्यात आली असून एका वर्षात 30 टक्क्यांवरील बांधकाम आज 87 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. कॅन्सर हॉस्पीटल येत्या सहा महिन्यात सुसज्ज इमारत आणि अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज होऊन कॅन्सर पीडितांना उपचाराकरीता उपलब्ध करावा अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी कॅन्सर फाऊंडेशनच्या संचालकांनी कॅन्सर हॉस्पिटल येत्या सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले.

     

    हॉस्पिटलच्या गुणवत्तेत तडजोड नको’

    कॅन्सर हॉस्पीटलचे बांधकाम, उपकरणांची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ, त्यांचे वेतन आदींसाठी गॅप फंडींगचा विषय तात्काळ मार्गी लावा. तसेच हॉस्पीटलच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करू नये. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दर पंधरा दिवसांत कामाचा आढावा घ्यावा. जिल्ह्यातील कॅन्सर पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी या कामात आता प्राधान्याने पुढे जाण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

     

    आरोग्य तपासणीच्या माध्यमातून होणार कॅन्सरचे निदान

    मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांची वाढ ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील प्रदुषण हा सुध्दा एक घटक त्यासाठी कारणीभूत राहू शकतो. तसेच ब्रेस्ट कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आदी प्रकार आज मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करून कॅन्सरचे निदान करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

     

    सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांसह निर्मिती

    चंद्रपूर येथे 2 लक्ष 35 हजार चौरस फूट जागेवर 140 खाटांचे चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे बांधकाम होत असून हॉस्पिटलची मुख्य इमारत ग्राऊंड फ्लोअर अधिक चार मजले, रेडीएशन ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला, युटीलिटी ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला अशी राहणार आहे. याशिवाय रेडीएशन, किमोथेरपीकरीता अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित मनुष्यबळ आदी बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

     

    चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11, चंद्रपूर तालुक्यात 6, बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

     

    गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

     

    या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

    पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.

  • चंद्रपुरात भीषण अपघात, 4 गंभीर जखमी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – छोटा नागपूर येथील विचोडा समोर 3 ऑक्टोबर ला अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनाने चौघांना उडविले, 4 जणांची प्रकृती सध्या नाजूक आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्तीला लुटणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे, छोटा नागपूर परिसरातून अवैध रित्या मुरुमाची तस्करी सुरू आहे, आज या मुरुम तस्करी करणाऱ्या वाहन क्रमांक MH34 AB2444 या वाहनाने चार नागरिकांना उडविले, या अपघातात दोघांचे पाय निकामी झाले तर एकाचे हात व एक गंभीररीत्या जखमी झाले. गंभीर जखमीमध्ये मुलीचा समावेश आहे. अपघात करणारे वाहन हे नितीन नगराळे यांच्या नावावर आहे.

     

    छोटा नागपूर ते विचोडा मार्ग हा पूर्णतः खड्ड्यात गेला आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार भेटला आहे.

     

    सदर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे कंत्राट डोंगरे यांना मिळाले आहे पण अजूनही हा मार्ग खड्ड्यात आहे, आज अवैध मुरूम वाहतुकीमुळे हा प्रकार घडला मात्र प्रशासन या तस्करी वर गप्प आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्या वन निसर्गाने वेढलेला जिल्हा आहे, अनेक वन्यप्राणी या निसर्गात वास्तव्यास आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्यासाठी हे प्राणी शेतात जात पिकांची नासाडी करतात.

    या वन्य प्राण्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे वर्ष 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 13 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, सदर 12 प्रकरणात शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, विशेष म्हणजे काही प्रकरणात स्वतः शेतमालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

     

    याकरिता शेत मालकांनी शेतात जिवंत विजेचा प्रवाह सोडु नये जर असे केल्यास या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील शेत मालकांनी असा प्रकार करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात.

     

    जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे.

     

    घरी कोणी नसताना बघून त्यांच्याच ओळखीच्या 52 वर्षीय सुधाकर महादेव निमगडे या इसमाने वेळेची संधी साधून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात सावरगाव नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

     

    युवासेना राज्य सहसचिव व युवासेना युवती जिल्हाधिकारी चंद्रपूर रोहिणी विक्रांत पाटील यांनी आज युवासेना युवतीकडून चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात आरोपीला कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी या संदर्भात डेप्युटी एस पी मॅडम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

    यावेळी उपजिल्हा युवती अधिकारी धनश्री हेडाऊ, विपश्यना मेश्राम, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी बुटले ,युवती विभाग अधिकारी काजल मडावी उपस्थित होते.