Tag: ओबीसी जनजागृती अभियान

  • संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

    संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात 1 नोव्हेंबरला झाली असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात यावे व ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना आधार योजना लागू करण्यात यावी , न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी आणि अन्य ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मंजूर करून घेण्यासाठी “भेटीगाठी जनजागृती अभियान” रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला सायंकाळी 7 वाजता पांढरकवडा येथे कार्यक्रम होणार आहे.

     

    कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ऋषभ राऊत राहणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आहेत तर उदघाटन सुधाकर अडबाले शिक्षक आमदार, प्रमुख पाहुणे सरपंच सुरज तोतडे, बाजार समिती संचालक किशोर मत्ते, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, तसेच गावातील उपसरपंच समीर भिवापुरे, पोलीस पाटील सचिन टिपले,डॉ संजय घाटे, रणजित डवरे, अनिल डहाके, डॉ दिलीप कांबळे, ,दिनेश कष्टी ,गणेश आवारी, देवराव सोनपित्तरे,भाऊराव झाडे,देवा पाचभाई, गजानन कष्टी, ग्राम पंचायत सदस्य सदस्य कनय्या तोतडे, मोनिका वाटगुरे, अर्चना गावंडे, अर्चना रोगे, संगीता सोनटक्के,अरुण देऊलकर,एम व्ही पोटे,एस एम मालेकर, मनीषा बोबडे, उपस्थिती राहणार आहेत.

     

    कार्यक्रमला उपस्थित राहण्याचे आवाहन हितेश लोडे, किशोर लोनगाडगे, विजय मत्ते, वासुदेव गोबाले, परशुराम बरडे, वामन काकडे, रामदास काकडे, बापूराव रोगे, हनुमान रोगे, विजय बावणे, शिवाजी सोनटक्के, विजय वैरागडे, हेमराज तुराणकर, अशोक रोगे, बाबुराव कुकुडे, विजय मोहूर्ले, राजू वाटगुरे, राजू खंडाळकर, विजय काकडे , प्रकाश कुकडे विठ्ठल वाटगुरे, आशिष मंदाडे, स्वप्नील मोहूर्ले , दिलीप कावडे, विजय पाचभाई, अरविंद पाचभाई, श्रवण पिपलकर, पंढरी नक्षीने, एकनाथ पाऊनकार, निखिल तोतडे, सहदेव कोल्हे, विलास पाजारे, संदेश गावंडे, सुमित नगराळे, दिनेश मत्ते, मारोती मंदाडे, भास्कर वरारकर, सुभाष ढोले, विठ्ठल बोरपे, कवडू उपासे, गजानन मत्ते, कैलास रोगे, संतोष मोहूर्ले, आतिष टिपले,महादेव रणदिवे,अनिल रोगे, मधुकर पिपलकर, बंडू सोनटक्के, प्रवीण धोटे, सेनाजी हनुमते डोमाजी निखाडे, हरिदास टिपले, प्रकाश टिपले, गुलाब कोल्हे, वारलु मोहूर्ले, विठ्ठल नवघडे, यांनी केले आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यात ओबीसींच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान राबविणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.

     

    यासभेत ओबीसीच्या मागण्यांसाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दिनांक 29 सप्टेंबर ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले. उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नसल्यानें सरकारचा निषेधाचा ठराव करण्यात आला.

     

    ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम दिनांक 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे , ओबीसीत मोडणारे खासदार ,आमदार यांनी अजून पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये असे निवेदन सरकारला दिले नाही आहे , त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे आणि 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली ता चंद्रपूर गावापासून “ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान “सुरू करून जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुक्यात अभियान राबविण्यात येणार असून सामारोप चिमूर तालुक्यात करण्यात येइल.

     

    यावेळी सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खणके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी , प्रेमानंद जोगी, डॉ दिलीप कांबळे, शाम लेडे ,राजेश बेले, श्रीधर मालेकर,कृनाल चहारे, अरूण देऊलकर, एम वि पोटे, प्रा सुरेश विधाते, प्रा बबन राजूरकर, देवराव दिवसे, प्रदीप पावडे, दिनेश कष्टी, विनोद शेंडे, गणपती मोरें, अक्षय येरगुडे, देवा पाचभाई, शखील शेख, पांडूरंग गावतुरे बंडू लेनगुरे, नाझीर गुलाब कुरेशी, महेश खगार, विलास माथनकर सुधाकर काकडे सुनिल मचणवार,देवराव सोनपित्तरे, अवधुत कोटेवार, रणजित डवरे, भाऊराव झाडे, बाबूराव पारखी,गणेश आवारी, हितेश लोडे,मनिषा बोबडे, कुसुमताई उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.