चंद्रपूर : वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.
पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर खालील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे:
सिंकदराबाद – दानापूर ट्रेन नं. १२७९१ / ९२, ग्रांड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. १२६१५ / १६, अहिल्यानगरी एक्सप्रेस ट्रेन नं. २२६४५ / ४६, जयपूर एक्सप्रेस ट्रेन नं. १२९७५/७६, राप्ती सागर एक्सप्रेस ट्रेन नं. १२५११ / १२, संघमित्रा एक्सप्रेस ट्रेन नं. १२२९५ / ९६, धनबाद कोल्हापूर दिक्षाभुमी एक्सप्रेस ट्रेन नं. ११०४५/४६, संतरागाछी एक्सप्रेस ट्रे १२७६७/६८ या रेल्वे गाड्यांच्या समावेश आहे.
या व्यतिरिक्त, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१-०२) नागपूरपर्यंत, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, बल्लारपूर – वर्धा पॅसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस (मुंबईसाठी सीधी ट्रेन सुरू होईपर्यंत) या ट्रेनांचा स्टॉपेज पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बल्लारशाह ते मुंबई डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तोवर ट्रेन क्र. 51196 लिंक कोचेस पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात ही ट्रेन थांबली होती. देशभरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून जनजीवन पुन्हा सुरू झाले आहे. पण ती गाडी असूनपर्यंत बंद आहे. ही गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अतिशय सोयीची आहे. त्यामुळे बल्लारशाह-चंद्रपूर ते मुंबई ही थेट रेल्वे आठवड्यातून तीन वेळा सुरू होईपर्यंत लोकांच्या सोयीसाठी ही लिंक एक्स्प्रेस अगोदर सुरू करणे आवश्यक आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, ही गाडी दोन वर्ग 3 कोच, 3 स्लीपर कोच आणि एक जनरल कोच असलेली होती. ही गाडी वर्धा ते सेवाग्राम एक्सप्रेस ट्रेन क्र. 12140 ने मुंबईसाठी निघायची. आणि परतताना मुंबई-बल्लारपूर लिंकचे डबे गाडी क्रमांक सेवाग्राम 12139 ने यायचे. रेल्वे बोर्डाने लिंक कोचेस बंद जरी केल्या असल्या तरी मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तवर हि सोय पूर्ववत देण्याची गरज आहे.
समस्त नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांना विनंती केली आहे की, ही ट्रेन पूर्ववत सुरू करावी या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. हि मागणी पूर्ण झाल्यास हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गाला न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या महिला आमदार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत कामाची पावती मिळाली आहे. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे तब्बल २५ वर्षानंतर काँग्रेसचा स्वबळावर झेंडा रोवला आहे.
यात सरपंचपदी प्रतिभाताई भानुदास शेरकुरे तर सदस्यपदी राहुल मारोती शेरकुरे, सिमा तुळशीदास मगरे, संगीता नागोराव नन्नावरे, रामचंद्र रघुनाथ उईके निवडून आले आहे.
वरोरा जनसंपर्क कार्यालयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) तालुकाध्यक्ष रूपेश तेलंग, माजी सभापती कृ. उ. बा. स. वरोरा राजेंद्र चिकटे, हरीश जाधव संचालक कृ. उ. बा. स.,युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल नन्नावरे,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष अरुण शेरकुरे,भूषण पाटील, अमोल शेलकर, प्रभुदास पाटील, मधुकर पुसन्नाके, राजेंद्र मडवी, मारोती मिलमिले, किशोर मडावी, मिथुन आत्राम, निलेश गायकवाड, हनुमान घरात,अनिल शेरकुरे,विकास जांभुळे,मारोती चौखे,नामदेव मगरे,मनोहर रंदई,संजय काढमेघे,कैलास तुमसरे,चंपत ढोक,कवडू वाघ,सचिन शेंडे,स्वप्नील दडमल यांनी प्रयत्न केले.
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार 3 नोव्हेम्बरला सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत कार्यलयावर जाऊन अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून ठिय्या आंदोलन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात हुकूमशाही सरकारच्या निषेध केला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. भारनियमना ऐवजी म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु २४ तास थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.
महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा देखील अनेकदा सुरळीत सुरु नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.
धानोरकर यांच्या या मागणीला कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आमदार धानोरकर यांनी बेधडक आंदोलन करीत वरोरा वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.
चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस फेम अभिनेता प्रिन्स नरुला यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी युथ आयकॉन असलेल्या प्रिन्स नरुलाची एक झलक टिपण्यासाठी चंद्रपूरकर तरुण, तरुणींनी मैदानावर एकच गर्दी केली.
येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षांपासून भरविण्यात येत असलेल्या भाऊचा दांडिया उत्सवाला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आह. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी नच बलिये तसेच रोडीज एक्स २, बिगबॉस ९ चा विजेचा प्रिन्स नरुला याने हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोदी गर्दी केली. त्याची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मैदानावरील युवतींमध्ये चुरस बघायला मिळाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते प्रिन्स नरुला याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. २२ ऑक्टोबर रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत प्रथमेश परब यांची उपस्थिती राहणार आहे.
२४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या दांडिया उत्सवात स्पर्धकांना अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी असून, लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहे
याप्रांगी माजी आमदार देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, डॉ. विश्वास झाडे, ऍड. विजय मोगरे, वारजूरकर, आदी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे.
भाऊच्या दांडियात अधिकाऱ्यांची उपस्थिती
या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक पाठक, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवार, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता गाडेगोणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चौव्हाण, कार्यकारी अभियंता कुंभे, कृषी अधिकारी शंकरजी तोटावार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गोडसेल्वार, दिलीप माकोडे, संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल, उद्योजक चंदू वासाडे, प्रा. कीर्तिवर्धन दीक्षित, प्रा. डोहे यांची विशेष उपस्थिती होती. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वरील अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते उमाकांत धांडे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस नेते महेश मेंढे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, डॉ. सागर वझे, मोनू चिमुरकर, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, अजय बल्की, सुरज बोबडे, रतन सिलावार, किशोर हेमके यांची उपस्थिती होती.
या दांडियात आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.
———————————————————
२१ ला प्रिन्स नरुला, २२ ला प्रथमेश परब
चंद्रपूर शहरात भाऊचा दांडियात धूम आहे. यामध्ये तरुणाईचे आकर्षक झालेले प्रिन्स नरुला हे २१ ऑक्टोबर व प्रथमेश परब हे २२ ऑक्टोबर रोजी येणार आहेत.
————————————————————–
मान्यवरांतर्फे बक्षिसांचा पाऊस
ग्रुप दांडियामध्ये स्वर्गीय राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन तर्फे १ लाख रुपये, कपल करिता स्वातंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलची पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुगलिया परिवारातर्फे ५० हजार रुपयाचे बक्षीस तसेच सोलो (मुलगा) गटाला संवाद प्रतिष्ठानतर्फे ५० हजार, सोलो (मुलगी) ५० हजार, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडून लहान ग्रुपचा मुलांना ११ हजार रुपये व लहान मुलींसाठी ११ हजार रुपये तसेच काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्याकडून ३५ वयावरील (पुरुष) ११ हजार रुपये, ३५ वयावरील (महिला) ११ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये एक शाळा एक गणवेश अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने या मागणीला मंजुरी दिली आहे. अनेकदा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचं प्रमाणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन विनंती केली होती.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने या मागणीला मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एकसमान गणवेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समरसता वाढेल, असा विश्वास आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विविध प्रकारचे गणवेश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष आणि मतभेद निर्माण होत होते. यावर उपाय म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एक शाळा एक गणवेशची मागणी केली होती.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समरसता वाढेल.
चंद्रपूर : “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले.
चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते.
दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत मागील वर्षी भाऊचा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या जाण्याने या उत्सवाचं आयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यावर आली.
यावेळी त्यांनी पुगलिया कुटुंबियांकडून दांडियातील स्पर्धकांकरिता दीड लाखांची बक्षिसे जाहीर केली. ग्रुप दांडियामध्ये नगरपरिषद चंद्रपूर निर्वाचित प्रथम अध्यक्ष स्व. राजमलजी पुगलिया यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे एक लाख चे प्रथम पुरस्कार व कपल डॉन्स मध्ये ज्या ग्रुपचा प्रथम क्रमांक येईल त्या कपल गृपला स्वतंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांची क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात आवड होती. तो वसा पुढे नेण्याकरिता मी पुढे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, काँग्रेस नेते गजानन गावंडे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, इंटक नेते के. के. सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, माजी महापौर संगीताताई अमृतकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, अनुसूचित जाती महिला नेत्या अश्विनीताई खोब्रागडे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल शेख रजा, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, माजी नगरसेवक अशोक नागापुरे, माजी नगरसेवक देवेंद्र बेले, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी, वसंत जिनींग संचालिका साधनाताई गोहोकार, शारदाताई ठाकरे, संध्याताई गोहोकर, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, भालचंद्र दानव, रतन शिलावार, नरेंद्र बोबडे, डॉ. सागर वझे, उमाकांत धांडे, सुरजकुमार बोबडे, मोनू चिमुरकर, सचिन घाटे, प्रमोद मगरे, बसंत सिंग, बाळू चिंचोलकर, सुनंदा धोबे, मीनाक्षी गुजरकर, शालिनी भगत, सौरभ ठोंबरे, मोनू रामटेके यांची उपस्थिती होती.
‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर २४ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल स्ट्रट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.
चंद्रपूर : “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला पत्रकार सत्य आणि न्यायाचे रक्षण करण्याचे काम करीत आहे. पत्रकारांनी संघटित होऊन समाजातील समस्यांवर आवाज उठवावा. पत्रकार हे समाजाचा खरा चौकीदार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
आज मूल येथे व्हाईस ऑफ मीडिया तर्फे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना समर्पित चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यशाळेत व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, शेतकरी नेते रवींद्र तुपकर, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर, जेष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांची उपस्थिती होती.
धानोरकर म्हणाल्या, “संघटना असल्याशिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत. व्हॉइस ऑफ मीडिया ही एक मजबूत संघटना आहे. ही संघटना गावागावात पोहोचली आहे. पत्रकारांनी या संघटनेचा लाभ घ्यावा.” पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते समाजातील विविध घटकांना एकत्र आणून नव्या विचारांचा प्रसार करतात. तसेच, ते समाजातील गैरव्यवहारांना उघडकीस आणून न्याय मिळवून देतात.
कार्यशाळेत पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. पत्रकारांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आली. तसेच, त्यांना पत्रकारितेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभाग घेतला.
चंद्रपूर : गोल बाजारातील महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांवर लादलेल्या अन्यायकारक कराच्या विरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. हि अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती.
सदर याचिकेचा निकाल अद्यापही न आल्याने मनपाने लादलेल्या गाळेधारकाराच्या करात व करावरील व्याजात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन गाळेधारकांवर लाखो रुपयाचा कर थकीत झाला. या विषयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पुढाकार घेऊन मनपा व गाळेधारक यांच्यात समन्वय घडवून आणून सदर विषयाचा तिढा सोडविला.
वारसान साठी असलेले हस्तांतरण शुल्क सुद्धा कमी करण्यात यावे. दुकान गाळेधारकांसाठी भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित व्हावा या दृष्टीने मनपातर्फे NASH प्रणाली सुरु करण्यात आली असुन नियमित कर भरणा करणाऱ्या गाळेधारकांना रेंटमध्ये ५ टक्के सुट मिळणार आहे.सदर योजना चांगली असुन गाळेधारकांनी याचा फायदा घ्यावा व भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादीत असल्याने नागरीकांनीही कर नियमित भरावा. असे आवाहनही त्यांनी केले.
मागील अनेक वर्षांपासून मनपाच्या अंतर्गत येणारे गोलबाजार येथील गाळे गाळेधारकांना देण्यात आले आहे. त्यावर नगरपरिषद अस्तित्वात असतांना कर आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये चंद्रपूर मनपा अस्तित्वात आली. मनपा अस्तित्वात आल्यानंतर गोलबाजारातील गाळेधारकांवर २०० पटीपेक्षा अधिक करवाढ केली.
या करवाढीविरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु सदर प्रकरणाच्या निकाल न लागल्याने गाळेधारकांचा कर वाढत गेला. मनपाने व्याजाच्या बोजा वाढविला. याप्रकरणी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक घेऊन सदर प्रकरणी तिढा सोडविण्याचा प्रयत्न फ़ेब्रुवारी २०२३ मध्ये केला होता. परंतु त्यावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रकरण मार्गी लागले नाही.
या प्रकरणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत देखील गाळेधारकांनी बाजू मांडली होती. त्यानंतर प्रधानसचिवाच्या दालनात आयुक्त व गाळेधारक प्रतिनिधी यांच्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली. त्यानंतर गाळेधारकांनी मनपा विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आज मनपा आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी न्यायालयात दाखल असलेली याचिका मागे घेण्यासंदर्भातील पत्र आयुक्तांना दिले.
आयुक्तांनीं विशेष बाब म्हणून सदर प्रकरणी ११६ गाळेधारकांवरील गाळ्यांच्या करावरील संपूर्ण १०० व्याज माफ करण्याचे पत्र गाळेधारकांना दिले. व उर्वरित गाळेधारकांच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून १५ दिवसात गाळेधारकांना न्याय देण्याचे आश्वासन आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, कर विभाग प्रमुख अनिल घुले, उपायुक्त बोबाटे, कर विभागाचे आत्राम, कुचनकर, राहुल चौधरी तसेच गाळेधारकांचे प्रतिनिधी सुरेश खनके, प्रशांत येनूरकर, अब्दुल इजाज, मोंटू मानकर यांची उपस्थिती होती.